शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

दीपनगरचा पाचव्या क्रमांकाचा वीज निर्मिती संच बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 15:24 IST

कोळशाच्या टंचाईमुळे दीपनगर येथील पाचशे मेगावॅट स्थापित क्षमतेचा संच क्रमांक पाच प्रशासनाला बंद करण्याची नामुष्की ओढवली आहे.

ठळक मुद्देदीपनगर केंद्राला कोळसा टंचाईचा फटकाकेवळ संच क्रमांक चार कार्यरतएक दिवस पुरेल इतका कोळसा शिल्लक

भुसावळ : कोळशाच्या टंचाईमुळे दीपनगर येथील पाचशे मेगावॅट स्थापित क्षमतेचा संच क्रमांक पाच प्रशासनाला बंद करण्याची नामुष्की ओढवली आहे. सध्या केवळ संच क्रमांक चार हा एकमेव संच कार्यरत आहे. राज्याची विजेची मागणी २० हजार मेगावॅटपेक्षा अधिक असताना कोळसा टंचाईमुळे संच बंद (शटडाऊन) करण्यात आल्याने आपत्कालीन भारनियमन वाढण्याची भीती आहे.बुधवारी दीपनगर केंद्रात १८ हजार मेट्रीक टन अर्थात केवळ एक दिवस पुरेल इतकाच कोळसासाठा शिल्लक होता.दोन दिवसांत या साठ्यातही घट झाली आहे. त्यामुळे कोळशाचा साठा केवळ सात ते दहा हजार मेट्रीक टनांवर पोहचला. यामुळे रविवारी पहाटे तीन वाजेच्या दरम्यान दीपनगर प्रशासनाने वीज निर्मिती करणारा संच क्रमांक पाच हा बंद करण्याचा निर्णय घेतला. दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात ५०० मेगावॅट स्थापित क्षमतेचे दोन संच कार्यरत असून २१० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक तीन सध्या एमओडीमुळे बंद आहे. १२१० मेगावॅट स्थापित क्षमतेच्या तुलनेत किमान ९८८ मेगावॅट वीजनिर्मिती होणे अपेक्षीत आहे.मात्र कोळशाच्या टंचाइमुळे संच क्रमांक पाच बंद करण्यात आल्याने सध्या केवळ संच क्रमांक चारमधून वीज निर्मिती होत आहे.आठ हजार मेट्रिक टन कोळशाची मागणी केली दोन ते तीन दिवसात पूर्तता होईल व संच क्रमांक पाच सुरु होईल.- राजेंद्र बावस्कर, दीपनगर वीजनिर्मिती मुख्य अभियंता

टॅग्स :BhusawalभुसावळJalgaonजळगाव