शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

नशिराबादला सामूहिक माघारीचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:14 IST

शासनाचा निर्णय लवकर जाहीर होत नसल्याने ग्रामपंचायत निवडणूक रद्द करावी या मागणीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या ८२ उमेदवारांची ...

शासनाचा निर्णय लवकर जाहीर होत नसल्याने ग्रामपंचायत निवडणूक रद्द करावी या मागणीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या ८२ उमेदवारांची सामूहिक माघार

घेण्याचा ऐतिहासिक निर्णय बैठकीत घेतला. सोमवारी सर्वच उमेदवार माघारीचा

झेंडा हाती घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

येथील लेवा पाटील सभा गृहात उमेदवार व राजकीय पक्ष कार्यकर्ते

यांची बैठक घेण्यात आली. प्रत्येकाने आपले विचार मांडले व अखेर सामूहिक

माघारीचा निर्णय घेण्यात आला.

याप्रसंगी बैठकीला

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील माजी सरपंच पंकज महाजन, विकास

पाटील, माजी उपसरपंच कीर्तिकांत चौबे, योगेश पाटील तालुकाध्यक्ष मुकुंद रोटे ,शिवसेनेचे विकास धनगर, चेतन बराटे, एमआयएमचे आसिफ मुबलीक सय्यद बरकतअली, शेख चाॅद शेख अजीज ,अब्दुल सईद गनी, आनंद रंधे, गणेश चव्हाण, भूषण पाटील, संदीप पाटील, योगेश कोलते, दीपक खाचणे, चंद्रकांत भोळे, सचिन महाजन, वसीम अहमद यांच्यासह आदी मान्यवर बैठकीला उपस्थित होते.

बैठकीत माजी सरपंच पंकज महाजन यांनी नगरपंचायत निवडणूक व्हावी

यासाठी सर्वांनी माघारीची वज्रमूठ हाती घ्यावी, असे आवाहन केले. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी गावाच्या हितासाठी आपण सर्वांनी एकत्र निर्णय घ्यावा सर्वच उमेदवारांनी माघारी घेतली तरच कार्यवाही होईल, असे सांगून उपस्थिताना मार्गदर्शन केले. माजी सरपंच विकास पाटील उपसरपंच कीर्तिकांत चौबे, आनंद रंधे, चेतन बराटे यांच्यासह अनेकांनी आपले मत मांडले.

इन्फो

शाब्दिक चकमक अन्‌ गोंधळ

माघारीचा निर्णय घेण्यासाठी सर्वजण एकवटले आहे. वॉर्डात परिवर्तन घडावे. निवडणुकीत

ज्येष्ठांनी माघार घेऊन तरुणांना व नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी, असे

सांगण्यात आले. मात्र जनतेच्या केलेल्या विकासकामांच्या बळावरच निवडून येतो व

कार्य करतो असे प्रतिउत्तर आले यात सुरू असलेल्या शाब्दिक विपर्यास वरून वादाची ठिणगी पडली आणि एकच गोंधळ उडाला. चप्पल उगारण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे गोंधळात अधिक भर पडली मात्र उपस्थित पदाधिकाऱ्यांनी शांततेचे आवाहन केले. त्यामुळे वाद शांत झाला. दरम्यान, यावेळी

सूचना मांडताना शाब्दिक वादावादी झाली . पुन्हा शांततेत बैठकीत माघारीचा

निर्णय वर शिक्का मोर्तब करण्यात आले.

माघारीचा फुगा फोडण्याचा प्रयत्न...

सामूहिक माघारी करता सर्वजण तयार आहेत ना याकरिता प्रत्येकाला विचारणा केली जात

होती. त्यातील काही जणांनी माघार घेण्यास स्पष्ट नकार दर्शविला. त्यामुळे माघारीचा फुगा फोडण्याचा प्रयत्न होता. अखेर सर्व उपस्थितांनी गाव विकासासाठी एकत्र या राजकारण करू नका, मतभेद विसरा, असे सांगून गाव हितासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यानंतर सर्वांनीच पाठिंबा दर्शविला.

उपस्थिताना दिली माघारीची शपथ

सर्वांनीच पाठिंबा दर्शविलानंतर यातून कोणी फितुर होऊ नये याकरिता हात समोर घेत

माघारीची शपथ घेतली. माजी सरपंच पंकज महाजन यांनी माघारीची शपथ वाचन केले.

निवडणुकीच्या रिंगणात तब्बल ८२ जणांनी उडी घेतली आहे. त्यात अनेक महिला

उमेदवारांचा समावेश आहे, मात्र बैठकीला दोनच महिला उमेदवार उपस्थित होत्या.

सोमवारी सकाळी १० वाजता सर्व उमेदवारांनी एकत्र जमून माघारी घेण्याचा निर्णय घेतला.

समिती गठित

उमेदवारांची माघारी कार्याच्या प्रक्रियेसाठी समितीत गठित करण्यात आली. त्यात जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्यासह गावातील विविध पक्षांचे पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.