शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

नऊ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गाळे प्रश्नावर आज होणार निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या नऊ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांच्या प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या नऊ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांच्या प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी बुधवारी होणाऱ्या महासभेत मनपा प्रशासनाने प्रस्ताव सादर केला आहे. आता या प्रस्तावावर नगरसेवक काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, प्रशासनाने आपले काम पूर्ण केले आहे. आता नगरसेवक काय निर्णय घेता यावर गाळे प्रश्नाचे भवितव्य ठरणार आहे.

शहरातील २३ मार्केट मधील सुमारे २७०० गाळ्यांची मुदत २०१२ मध्ये संपुष्टात आली होती. मात्र नूतनीकरण करण्याच्या मागणीसाठी गाळेधारकांनी न्यायालयात याचिका दाखल करून हा प्रश्न चिघळला होता. त्यात मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांनी गेल्या आठ वर्षांपासून महापालिकेच्या गाळे भाडे देखील भरलेले नाही. २७०० पैकी २६० गाळेधारकांनी थकीत भाड्याची रक्कम भरलेली आहे. तर उर्वरित गाळेधारकांनी अद्यापही भाड्याची रक्कम न भरल्याने महापालिका प्रशासनाने संबंधित गाळेधारकांना नोटीस देखील बजावली आहे. तर मनपा प्रशासनाने गाळे भाड्याची रक्कम ही अवाजवी असून गाळेधारकांना ही रक्कम भरणे अशक्य असल्याचे सांगत थकीत भाडे भरण्यास गाळेधारकांनी नकार दिला आहे. त्यात न्यायालयाने मनपा प्रशासनाला मुदत संपलेले गाळे ताब्यात घेऊन लिलाव करण्याचे आदेश डिसेंबर २०१७ मध्येच दिले होते. मात्र राजकीय दबावामुळे मनपा प्रशासनाने अद्यापही न्यायालयाच्या आदेशाचे पालन केलेले नाही. याबाबत न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली केल्याचे कारण देत न्यायालयात याचिका दाखल झाल्यास मनपा प्रशासन अडचणीत येऊ शकते. या भीतीने मनपा प्रशासनाने मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांना बाबतचे धोरण निश्चित करून आपला प्रस्ताव महापालिकेच्या महासभेपुढे सादर केला आहे. आता महासभेत नगरसेवकांनी हा विषय स्थगित ठेवला किंवा नामंजूर जरी केला तरी भविष्यात कोणीही न्यायालयात याचिका दाखल केल्या स त्यात नगरसेवक अडचणीत येण्याची शक्यता आहे. यामुळे बुधवारी होणाऱ्या महासभेत नगरसेवक काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.

बंडखोर नगरसेवकांच्या भूमिकेवर लक्ष

महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेची सत्ता आली आहे. त्यात भाजपचे २७ नगरसेवक फुटले होते. अद्यापही हे नगरसेवक भाजपचेच नगरसेवक म्हणून गणले जातात. शिवसेनेचे एकूण १५ नगरसेवक असून भाजपच्या बाजूने ३२ नगरसेवक आहेत. अशा परिस्थितीत बुधवारी होणार्‍या महासभेत ठरावाला बहुमताने मंजुरी साठी बंडखोर नगरसेवक यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. तसेच नगरसेवक काय निर्णय घेता याकडेही लक्ष लागले असून, भविष्यात ठरावाला विरोध केल्यास कायदेशीर अडचणी येऊ शकतात का ? याबाबत देखील नगरसेवक चाचपणी करताना दिसून येत आहेत.

भाजपने थांबवला होता प्रस्ताव, शिवसेनेने दिली परवानगी ?

मार्च महिन्यात झालेल्या महासभेतच हा प्रस्ताव सादर करण्यात येणार होता. मात्र तत्कालीन महापौर भारती सोनवणे व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव महासभेपुढे सादर होऊ दिला नव्हता. त्यानंतर आता महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेची सत्ता आली आहे आणि पहिल्याच महासभेत गाळेधारकांच्या धोरणाबाबतचा प्रस्ताव महासभेपुढे सादर करण्यात येणार आहे. मनपा प्रशासनाकडून हा प्रस्ताव आल्यामुळे शिवसेनेकडून या प्रस्तावाला मंजुरी दिली जाण्याची शक्यता आहे. तर अनेक बंडखोर नगरसेवक देखील या निर्णयाला पाठिंबा देऊ शकतात. भाजपची भूमिका अद्याप स्पष्ट नसली तरी कायदेशीर अडचणी येऊ नयेत म्हणून या प्रस्तावाला बहुमताने ही मंजुरी मिळण्याची शक्यता अधिक आहे.

गाळेधारकांचा मात्र विरोध, महासभेनंतर भूमिका ठरणार

मनपा प्रशासनाचा प्रस्ताव आला मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांचा विरोध आहे. हा प्रस्ताव मंजूर झाला तर गाळेधारकांनी तीव्र आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे. बुधवारी होणाऱ्या महासभेत यानंतर गाळेधारकांच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरणार असून, मनपातील पदाधिकाऱ्यांनी गाळेधारकांचे हित पाहूनच निर्णय घ्यावा असेही आवाहन गाळेधारक संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.