शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा अधिकार बजावा; राज ठाकरेंनी केले आवाहन
2
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
3
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
4
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
6
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
7
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
8
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 
9
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
11
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
12
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
13
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
14
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
15
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
16
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
17
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
18
मतदानाच्या आदल्या दिवशी विनोद तावडे-राज ठाकरे भेट; मराठी मतांच्या बेरजेसाठी भेट झाल्याची चर्चा 
19
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
20
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही

मृत्यूनंतर सरकारकडून शववाहिनीची मदत तातडीने मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2020 10:42 PM

मागणी सर्वच थरांतून आली पुढे

कासोदा, ता.एरंडोल : दि.३ रोजी बांभोरीच्या आदिवासी तरुणांच्या मृत्यूनंतर जळगावहून त्याचे प्रेत गावी आणण्यासाठी झालेल्या अवहेलनेनंतर सरकारकडून शेवटच्या प्रसंगी शववाहिनीची मदत मिळावी, अशी सर्वथरातून मागणी जोर धरु लागली असून आ.चिमणराव पाटील यांनी या गंभीर प्रश्नी सरकारचे लक्ष वेधणार असल्याचे सांगितले.राज्य सरकार जनतेच्या आरोग्यासाठी मोठा खर्च करते. आपतकालीन परिस्थितीत १०८ ही रुग्णवाहिका सेवा जीवनदायी ठरली आहे. राज्यात या गाड्यांची संख्या ९३७ एवढी मोठी आहे. त्यात २३३ लाईफ सपोर्ट अँम्ब्युलन्स तर ७०४ बेसिक लाईफ सपोर्ट आहेत. राज्यात १८११ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, तर उपकेंद्र १० हजार ५८० आहेत. जिल्हा रुग्णालये २३ आहेत, उपजिल्हा रुग्णालये वेगवेगळ्या खाटांचे मिळून ४६८ आहेत. यापासून गरजू लाभ घेत आहेत. पण रस्त्यावर एखादा अपघात झाला किंवा आपत्कालीन परिस्थितीत सरकारी रुग्णालयातील गाड्या, १०८ अँम्ब्युलन्स ही मोठी यंत्रणा किंवा राजकीय व्यक्ती, समाजसेवक आदी या गरजूंना आपापल्या परीने मदत करुन रुग्णालयापर्यंत पोहचवतात. परंतु इस्पितळात एखादा रुग्ण दगावला तर त्याचा मृतदेह घरी नेण्यासाठी सरकारकडून कुठलीही यंत्रणा नसल्याने गरीब कुटुंबातील नागरिकांना खासगी वाहनांची मदत घ्यावी लागते. आधीच घरात दुखा:चा डोंगर कोसळलेला असतो. कुटुंबीयांना त्यावेळी आधाराची गरज असते. यातही त्यांना शववाहिनी शोधावी लागते. गरिबांना तर यासाठी पैसा शोधावा लागतो. या गंभीर व दुर्लक्षित प्रश्नावर विचार करून आता सरकारने शववाहिनीची मदत द्यावी, अशी मागणी सर्वच थरांतून पुढे आली आहे.