शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

मृत्यूनंतर सरकारकडून शववाहिनीची मदत तातडीने मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 22:43 IST

मागणी सर्वच थरांतून आली पुढे

कासोदा, ता.एरंडोल : दि.३ रोजी बांभोरीच्या आदिवासी तरुणांच्या मृत्यूनंतर जळगावहून त्याचे प्रेत गावी आणण्यासाठी झालेल्या अवहेलनेनंतर सरकारकडून शेवटच्या प्रसंगी शववाहिनीची मदत मिळावी, अशी सर्वथरातून मागणी जोर धरु लागली असून आ.चिमणराव पाटील यांनी या गंभीर प्रश्नी सरकारचे लक्ष वेधणार असल्याचे सांगितले.राज्य सरकार जनतेच्या आरोग्यासाठी मोठा खर्च करते. आपतकालीन परिस्थितीत १०८ ही रुग्णवाहिका सेवा जीवनदायी ठरली आहे. राज्यात या गाड्यांची संख्या ९३७ एवढी मोठी आहे. त्यात २३३ लाईफ सपोर्ट अँम्ब्युलन्स तर ७०४ बेसिक लाईफ सपोर्ट आहेत. राज्यात १८११ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, तर उपकेंद्र १० हजार ५८० आहेत. जिल्हा रुग्णालये २३ आहेत, उपजिल्हा रुग्णालये वेगवेगळ्या खाटांचे मिळून ४६८ आहेत. यापासून गरजू लाभ घेत आहेत. पण रस्त्यावर एखादा अपघात झाला किंवा आपत्कालीन परिस्थितीत सरकारी रुग्णालयातील गाड्या, १०८ अँम्ब्युलन्स ही मोठी यंत्रणा किंवा राजकीय व्यक्ती, समाजसेवक आदी या गरजूंना आपापल्या परीने मदत करुन रुग्णालयापर्यंत पोहचवतात. परंतु इस्पितळात एखादा रुग्ण दगावला तर त्याचा मृतदेह घरी नेण्यासाठी सरकारकडून कुठलीही यंत्रणा नसल्याने गरीब कुटुंबातील नागरिकांना खासगी वाहनांची मदत घ्यावी लागते. आधीच घरात दुखा:चा डोंगर कोसळलेला असतो. कुटुंबीयांना त्यावेळी आधाराची गरज असते. यातही त्यांना शववाहिनी शोधावी लागते. गरिबांना तर यासाठी पैसा शोधावा लागतो. या गंभीर व दुर्लक्षित प्रश्नावर विचार करून आता सरकारने शववाहिनीची मदत द्यावी, अशी मागणी सर्वच थरांतून पुढे आली आहे.