शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

मृत्यूनंतर सरकारकडून शववाहिनीची मदत तातडीने मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 22:43 IST

मागणी सर्वच थरांतून आली पुढे

कासोदा, ता.एरंडोल : दि.३ रोजी बांभोरीच्या आदिवासी तरुणांच्या मृत्यूनंतर जळगावहून त्याचे प्रेत गावी आणण्यासाठी झालेल्या अवहेलनेनंतर सरकारकडून शेवटच्या प्रसंगी शववाहिनीची मदत मिळावी, अशी सर्वथरातून मागणी जोर धरु लागली असून आ.चिमणराव पाटील यांनी या गंभीर प्रश्नी सरकारचे लक्ष वेधणार असल्याचे सांगितले.राज्य सरकार जनतेच्या आरोग्यासाठी मोठा खर्च करते. आपतकालीन परिस्थितीत १०८ ही रुग्णवाहिका सेवा जीवनदायी ठरली आहे. राज्यात या गाड्यांची संख्या ९३७ एवढी मोठी आहे. त्यात २३३ लाईफ सपोर्ट अँम्ब्युलन्स तर ७०४ बेसिक लाईफ सपोर्ट आहेत. राज्यात १८११ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, तर उपकेंद्र १० हजार ५८० आहेत. जिल्हा रुग्णालये २३ आहेत, उपजिल्हा रुग्णालये वेगवेगळ्या खाटांचे मिळून ४६८ आहेत. यापासून गरजू लाभ घेत आहेत. पण रस्त्यावर एखादा अपघात झाला किंवा आपत्कालीन परिस्थितीत सरकारी रुग्णालयातील गाड्या, १०८ अँम्ब्युलन्स ही मोठी यंत्रणा किंवा राजकीय व्यक्ती, समाजसेवक आदी या गरजूंना आपापल्या परीने मदत करुन रुग्णालयापर्यंत पोहचवतात. परंतु इस्पितळात एखादा रुग्ण दगावला तर त्याचा मृतदेह घरी नेण्यासाठी सरकारकडून कुठलीही यंत्रणा नसल्याने गरीब कुटुंबातील नागरिकांना खासगी वाहनांची मदत घ्यावी लागते. आधीच घरात दुखा:चा डोंगर कोसळलेला असतो. कुटुंबीयांना त्यावेळी आधाराची गरज असते. यातही त्यांना शववाहिनी शोधावी लागते. गरिबांना तर यासाठी पैसा शोधावा लागतो. या गंभीर व दुर्लक्षित प्रश्नावर विचार करून आता सरकारने शववाहिनीची मदत द्यावी, अशी मागणी सर्वच थरांतून पुढे आली आहे.