शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

कर्जमाफीचा घोळ मिटता मिटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 00:24 IST

नवीन कर्ज नाहीच : व्याज व विमा भरण्याची सक्ती

बिडगाव, ता.चोपडा , जि.जळगाव: येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेत तब्बल तीनशेवर कर्जधारक शेतकरी आहेत. दोन कोटीच्या आसपास कर्जमाफीही झाली आहे. मात्र कर्जमाफीचा सुरू असलेल्या घोळामुळे अद्यापपर्यंत येथील एकाही शेतकऱ्याला कर्जमाफ होऊन नवीन कर्ज मिळाले नसल्याने संताप व्यक्त होत आहे.लाभ घेऊन नवीन कर्ज घ्यायचे असेल तर व्याज व विम्याची रक्कम भरा, अशी सक्ती केली जात आहे. शासनाने शेतकºयांच्या कर्जावरील व्याज भरण्याची घोषणा केली आहे. मात्र शासनाच्या आदेशाला धाब्यावर बसवत प्रत्यक्षात व्याजाची रक्कम भरल्याशिवाय नवीन कर्जच दिले जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे व शेतकºयांची दिशाभूल केली जात आहे.येथे एकूण २९९ कर्जधारक आहेत. त्यापैकी २० शेतकरी नोकरीला असल्याने वगळले आहेत तर ४० लाभार्थींचे दीड लाखापेक्षा जास्त कर्ज असल्याने त्यांना वरील रक्कम भरायची आहे. तेव्हा त्यांना एकूण ८५ लाखांचे हे कर्ज माफ होणार आहे. मात्र हे शेतकरी दीड लाखाच्या वरची रक्कम भरू शकत नसल्याने त्यांना नवीन कर्ज तर दूरच मात्र दीड लाखाचाही लाभही मिळू शकलेला नाही. ६३ शेतकºयांचा पती, पत्नी इतर कारणे असा मोठाच घोळ आहे. त्यांनाही योजनेचा लाभ नाही. १६२ शेतकरी दीड लाखापेक्षा कमी कर्जधारक आहेत. त्यांना तब्बल ८२लाख नऊ हजार रूपये कर्ज माफ झाले आहे. त्यांनाही कर्जमाफीपासून आतापर्यंतच्या व्याजाची रक्कम भरण्याची सक्ती केली जात आहे.शासनाने शेतकºयांच्या कर्जावरील व्याज भरण्याची घोषणा करूनही येथे व्याजाची सक्ती होत आहे. त्यामुळे शासनाची घोषणा फसवी ठरत आहे की सहकार प्रशासनाची मनमानी सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.१४ शेतकºयांना तर कर्जमाफीस पात्र असतानाही लाभच मिळाला नाही, लाभ का मिळत नाही याबाबत सचिव व एआर यांच्याकडून काहीच कारण न सांगता नावे दुरुस्तीसाठी पाठवली आहेत. एवढेच उत्तर दिले जाते.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जChopdaचोपडा