शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात विवाहितेचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात टाकून पती व सासऱ्याने काढला पळचिंचखेडा येथील विवाहितेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 11:48 IST

विष पाजून ठार केल्याचा आरोप, रूग्णालयात तणाव

जळगाव : विष बाधा झाल्याने मृत झालेल्या रत्नाबाई ज्ञानेश्वर पाटील (वय २७, रा. चिंचखेडा, ता.जामनेर) हिचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात टाकून सासरच्यांनी पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी सकाळी घडला. रत्नाबाई हिला सासरच्यांनी विष पाजून ठार मारल्याचा आरोप भाऊ गोपाळ तुळशीराम पाटील व वडील तुळशीराम नथ्थू पाटील (रा.धानवड, ता.जळगाव) यांनी केला आहे. सासरच्यांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा माहेरच्या लोकांनी घेतला, त्यामुळे जिल्हा रुग्णालयात वातावरण तापले होते.याबाबत नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, धानवड येथील तुळशीराम नथ्थू पाटील यांची लहान मुलगी रत्नाबाई हिचा विवाह सात वर्षापूर्वी चिंचखेडा येथील ज्ञानेश्वर शंकर पाटील याच्याशी झाला होता. दोघांना मुलगा साई (वय ४) व मुलगी धनश्री (वय २) अशी अपत्ये आहेत. लग्नाच्यावेळी मानपान म्हणून पतीला २ लाख ५१ हजार रुपये रोख, पाच तोळे सोने दिले होते. तरीही लग्नानंतर काही दिवसातच मानमान, मुळ न लावणे या कारणावरुन रत्नाबाई हिचा छळ सुरु झाला. गेल्या काही महिन्यापासून तर माहेरुन पैसे आणावेत यासाठी जास्तच छळ सुरु झाला होता.मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रारत्नाबाई हिची आत्महत्या नसून खूनच असल्याचा आरोप करुन पती ज्ञानेश्वर शंकर पाटील, सासरा शंकर पाटील व सासु रुख्माबाई यांच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करावा व त्यांना अटक करावी, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला होता. जिल्हा पेठचे उपनिरीक्षक मनोज वाघमारे यांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतल्याने नातेवाईक संतप्त झाले होते. त्यांनी मृतदेह ताब्यात न घेता पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची भेट घेतली.पोलीस अधीक्षकांनी दिले गुन्हा दाखलचे आदेशमयत रत्नाबाई हिचे वडील तुळशीराम पाटील, भाऊ गोपाळ पाटील, भाऊसाहेब पाटील यांच्यासह अन्य नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची भेट घेऊन संपूर्ण घटनाक्रम कथन केला. शिंदे यांनी तत्काळ जामनेर पोलिसांशी संपर्क साधून पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांना जळगावला बोलावले. या प्रकरणी चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याचा आदेश शिंदे यांनी इंगळे यांना दिला. त्यानुसार सर्व नातेवाईक जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गेले. तेथे फिर्यादही तयार झाली, मात्र सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल होऊ शकला नाही. दरम्यान, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील हे देखील रुग्णालयात आले होते.भाऊ...माझा जीव धोक्यात आहे, मला घ्यायला लवकर येरत्नाबाई हिचा भाऊ गोपाळ याने सांगितले की, रत्नाबाई हिला दोन दिवसापासून जास्त त्रास होता. मंगळवारी दुपारी तिला पतीने बेदम मारहाण केली. तेव्हा सायंकाळी तिने फोन करुन पतीच्या त्रासाची माहिती दिली. तुला रात्रीतून जीवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली होती, त्यामुळे ती प्रचंड घाबरलेली होती. सकाळी तुला घ्यायला येतो असे तिला सांगितले असता बुधवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात तिचा मृतदेहच दिसला. विष प्राशन झाल्यामुळे नाही तर विष पाजल्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचा आरोप गोपाळ पाटील याने केला.शवविच्छेदन झालेच नाहीसायंकाळी उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा दाखल न झाल्याने नातेवाईकांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिला. दुसरीकडे रत्नाबाई हिच्या मुलांच्या नावावर शेतजमीन खरेदी करण्यासाठी काही जणांनी मध्यस्थी केली होती. ही प्रक्रिया देखील सायंकाळपर्यंत पूर्ण झाली नाही. त्यामुळे गुन्हा दाखल करण्याचा व शवविच्छेदनाचा निर्णय आता गुरुवारीच होणार आहे. त्यामुळे जामनेरचे निरीक्षक इंगळे व सहकारी सायंकाळी परत गेले.रुग्णालयात कोणी आणले माहितच नाही...रत्नाबाई हिला जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याची माहिती चिंचखेडा येथील काही लोकांनी दिल्यावरुन भाऊ गोपाळ, वडील ज्ञानेश्वर पाटील, भाऊसाहेब पाटील यांच्यासह माहेरचे लोक जिल्हा रुग्णालयात आले असता आपत्कालिन कक्षात मृतदेह आढळून आला. शवविच्छेदनगृहात मृतदेह नेण्याची तयारी सुरु होती. मृतदेहाजवळ कोणीच नव्हते. गावकºयांनी हा मृतदेह आणला असे काही जण सांगत होते तर काही जण सासरच्यांनी आणला असे सांगत होते. मात्र मृतदेहाजवळ कोणीच नव्हते. अखेरपर्यंतही कोणी आले नाही तर पती व सासराच मृतदेह टाकून निघून गेले, अशी माहिती रत्नाबाईचा भाऊ गोपाळ याने दिली.

टॅग्स :Jalgaonजळगाव