शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात विवाहितेचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात टाकून पती व सासऱ्याने काढला पळचिंचखेडा येथील विवाहितेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 11:48 IST

विष पाजून ठार केल्याचा आरोप, रूग्णालयात तणाव

जळगाव : विष बाधा झाल्याने मृत झालेल्या रत्नाबाई ज्ञानेश्वर पाटील (वय २७, रा. चिंचखेडा, ता.जामनेर) हिचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात टाकून सासरच्यांनी पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी सकाळी घडला. रत्नाबाई हिला सासरच्यांनी विष पाजून ठार मारल्याचा आरोप भाऊ गोपाळ तुळशीराम पाटील व वडील तुळशीराम नथ्थू पाटील (रा.धानवड, ता.जळगाव) यांनी केला आहे. सासरच्यांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा माहेरच्या लोकांनी घेतला, त्यामुळे जिल्हा रुग्णालयात वातावरण तापले होते.याबाबत नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, धानवड येथील तुळशीराम नथ्थू पाटील यांची लहान मुलगी रत्नाबाई हिचा विवाह सात वर्षापूर्वी चिंचखेडा येथील ज्ञानेश्वर शंकर पाटील याच्याशी झाला होता. दोघांना मुलगा साई (वय ४) व मुलगी धनश्री (वय २) अशी अपत्ये आहेत. लग्नाच्यावेळी मानपान म्हणून पतीला २ लाख ५१ हजार रुपये रोख, पाच तोळे सोने दिले होते. तरीही लग्नानंतर काही दिवसातच मानमान, मुळ न लावणे या कारणावरुन रत्नाबाई हिचा छळ सुरु झाला. गेल्या काही महिन्यापासून तर माहेरुन पैसे आणावेत यासाठी जास्तच छळ सुरु झाला होता.मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रारत्नाबाई हिची आत्महत्या नसून खूनच असल्याचा आरोप करुन पती ज्ञानेश्वर शंकर पाटील, सासरा शंकर पाटील व सासु रुख्माबाई यांच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करावा व त्यांना अटक करावी, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला होता. जिल्हा पेठचे उपनिरीक्षक मनोज वाघमारे यांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतल्याने नातेवाईक संतप्त झाले होते. त्यांनी मृतदेह ताब्यात न घेता पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची भेट घेतली.पोलीस अधीक्षकांनी दिले गुन्हा दाखलचे आदेशमयत रत्नाबाई हिचे वडील तुळशीराम पाटील, भाऊ गोपाळ पाटील, भाऊसाहेब पाटील यांच्यासह अन्य नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची भेट घेऊन संपूर्ण घटनाक्रम कथन केला. शिंदे यांनी तत्काळ जामनेर पोलिसांशी संपर्क साधून पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांना जळगावला बोलावले. या प्रकरणी चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याचा आदेश शिंदे यांनी इंगळे यांना दिला. त्यानुसार सर्व नातेवाईक जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गेले. तेथे फिर्यादही तयार झाली, मात्र सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल होऊ शकला नाही. दरम्यान, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील हे देखील रुग्णालयात आले होते.भाऊ...माझा जीव धोक्यात आहे, मला घ्यायला लवकर येरत्नाबाई हिचा भाऊ गोपाळ याने सांगितले की, रत्नाबाई हिला दोन दिवसापासून जास्त त्रास होता. मंगळवारी दुपारी तिला पतीने बेदम मारहाण केली. तेव्हा सायंकाळी तिने फोन करुन पतीच्या त्रासाची माहिती दिली. तुला रात्रीतून जीवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली होती, त्यामुळे ती प्रचंड घाबरलेली होती. सकाळी तुला घ्यायला येतो असे तिला सांगितले असता बुधवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात तिचा मृतदेहच दिसला. विष प्राशन झाल्यामुळे नाही तर विष पाजल्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचा आरोप गोपाळ पाटील याने केला.शवविच्छेदन झालेच नाहीसायंकाळी उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा दाखल न झाल्याने नातेवाईकांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिला. दुसरीकडे रत्नाबाई हिच्या मुलांच्या नावावर शेतजमीन खरेदी करण्यासाठी काही जणांनी मध्यस्थी केली होती. ही प्रक्रिया देखील सायंकाळपर्यंत पूर्ण झाली नाही. त्यामुळे गुन्हा दाखल करण्याचा व शवविच्छेदनाचा निर्णय आता गुरुवारीच होणार आहे. त्यामुळे जामनेरचे निरीक्षक इंगळे व सहकारी सायंकाळी परत गेले.रुग्णालयात कोणी आणले माहितच नाही...रत्नाबाई हिला जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याची माहिती चिंचखेडा येथील काही लोकांनी दिल्यावरुन भाऊ गोपाळ, वडील ज्ञानेश्वर पाटील, भाऊसाहेब पाटील यांच्यासह माहेरचे लोक जिल्हा रुग्णालयात आले असता आपत्कालिन कक्षात मृतदेह आढळून आला. शवविच्छेदनगृहात मृतदेह नेण्याची तयारी सुरु होती. मृतदेहाजवळ कोणीच नव्हते. गावकºयांनी हा मृतदेह आणला असे काही जण सांगत होते तर काही जण सासरच्यांनी आणला असे सांगत होते. मात्र मृतदेहाजवळ कोणीच नव्हते. अखेरपर्यंतही कोणी आले नाही तर पती व सासराच मृतदेह टाकून निघून गेले, अशी माहिती रत्नाबाईचा भाऊ गोपाळ याने दिली.

टॅग्स :Jalgaonजळगाव