शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जळगावातील मृतांची संख्या ५०० वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील तीन कोरोना बाधितांचा शुक्रवारी मृत्यू झाला. यामुळे शहराची एकूण मृतांची संख्या ५०२ वर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील तीन कोरोना बाधितांचा शुक्रवारी मृत्यू झाला. यामुळे शहराची एकूण मृतांची संख्या ५०२ वर पोहोचली आहे. एप्रिल महिन्यात शहरात सातत्याने कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, नवे १४१ रुग्ण आढळले असून १५० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जळगाव ग्रामीणमध्ये २० बाधित आढळून आले आहेत.

जिल्ह्याच्या २२ टक्के मृत्यू हे जळगाव शहरात झाले आहेत. एकत्रित तालुक्याची आकडेवारी बघता तालुक्यात ६२० बाधितांचे मृत्यू नोंदविण्यात आले आहेत. अन्य कुठल्याही तालुक्यापेक्षा अडीच ते तीनपटीने ही संख्या अधिक आहे. शहरात बाधितांची संख्याही अधिक असल्याने ही स्थिती आहे. शुक्रवारी झालेल्या मृत्यूमध्ये ३८, ५४ वर्षीय पुरुष व ७० वर्षीय महिला रुग्णांचा समावेश आहे. यासह जिल्ह्यात भुसावळ, पाचोरा, चोपडा तालुक्यात प्रत्येकी ३ तर रावेर, बोदवड, चाळीसगाव, भडगाव या ठिकाणी प्रत्येकी २ व जळगाव ग्रामीणमध्ये एका बाधिताचा मृत्यू झाला आहे.

चाचण्या अशा

ॲन्टिजेन ६,४८१, बाधित ७७९

आरटीपीसीआर आलेले अहवाल : २२८८, बाधित २२८

आरटीपीसीआर पाठविलेले अहवाल : २५१८

हयात, ज्युपिटर रुग्णालयांना नोटिसा

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी पाहणी केल्यानंतर काही गंभीर त्रुटी आढळून आल्याने शहरातील हयात व ज्युपिटर या दोन रुग्णालयांना डॉ. चव्हाण यांनी नोटिसा बजावल्या आहेत. दोन दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. गंभीर रुग्ण असताना कंन्सलटंट डॉक्टर उपस्थित नसणे, दरपत्रक दर्शनी भागात न लावणे, ट्रेन स्टाफची कमतरता, सोशल डिस्टन्सिंग नसणे, कर्मचाऱ्यांनी मास्क व ग्लोव्हज परिधान न करणे आदी बाबी आढळून आल्या. दरम्यान, हयात हॉस्पिटलमध्ये बॉम्बे नर्सिंग ॲक्टचे प्रमाणपत्र उपलब्ध नव्हते, शिवाय इलेक्ट्रिक फायर ऑडिट झालेले नव्हते, असे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. दोन दिवसात खुलासा सादर न केल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.