शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यू घटल्याने स्मशानभूमीत अंत्यसंस्कारांची संख्या ४ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:15 IST

रिॲलिटी चेक महिनाभरानंतर शांतता; नातेवाईक घेऊन जातात अस्थी लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मार्च-एप्रिल महिन्यात जिल्हाभरात कोरोनाने अक्षरशः हाहाकार ...

रिॲलिटी चेक

महिनाभरानंतर शांतता; नातेवाईक घेऊन जातात अस्थी

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मार्च-एप्रिल महिन्यात जिल्हाभरात कोरोनाने अक्षरशः हाहाकार माजविला होता. बाधित व संशयित तरुणांचे मृत्यूचे प्रमाण प्रचंड वाढल्याने स्मशानभूमीत अंत्यसंस्कारालाही जागा उपलब्ध होत नसल्याचे भीतीदायक चित्र होते. नेरी नाका स्मशानभूमीत दिवसाला ३४ पर्यंत अंत्यसंस्कार केले जात होते. मात्र, महिनाभरानंतर मृत्यू घटल्याने या स्मशानभूमीत आता दिवसाला चार ते पाच अंत्यसंस्कार होत असल्याने ही मोठी दिलासादायक बाब असल्याचे येथील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. शिवाय पुरेसा वेळ असल्याने मृतांच्या अस्थीही नातेवाईक घेऊन जात आहेत. महिनाभरापूर्वी मात्र चित्र वेगळे होते.

कोरोनाबाधित किंवा संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर शहरातील नेरी नाका स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतात. मार्च-एप्रिलदरम्यान बाधितांसह सारी या आजाराचे मृत्यू प्रचंड वाढले होते. त्यामुळे एका दिवसाला अंत्यसंस्कार मोठ्या प्रमाणात होत असल्याने स्मशानभूमीत जागेची अडचण निर्माण होत होती. या ठिकाणी नवीन सहा ओटे बांधण्यात आले होते. मात्र, तेही अपुरे पडत होते. अनेकांवर खाली अंत्यसंस्कार करावे लागत होते. या परिस्थितीत येथील कर्मचाऱ्यांची प्रचंड धावपळ उडत होती. पूर्ण चोवीस तास त्यांना स्मशानभूमीत काढावे लागत होते. या ठिकाणी शवदाहिनीचेही काम करण्यात आले असून, यातही अनेक मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

राख न्यायलाही यायचे नाही नातेवाईक

महिना-दीड महिन्यापूर्वी मृतांची संख्या प्रचंड असल्याने जागेची अडचण होती. एकूण अंत्यसंस्कारांपैकी ६० टक्के नातेवाईक राख घेऊन जात होते. मात्र, अनेकांचे नातेवाईक ही राख घ्यायला येत नव्हते. त्यामुळे कर्मचारी ओट्यावरून ती राख बाजूला काढून ठेवत होते. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत अधिक मृत्यू झाले. मात्र, दुसऱ्या लाटेपेक्षा पहिल्या लाटेत नातेवाईक समोरच येत नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. पहिल्या लाटेत कसलाच अनुभव नसल्याने शिवाय भीती असल्याने नातेवाईक समोर येत नसत, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. दुसऱ्या लाटेत मात्र भीती कमी असल्याने नातेवाईक पुढे येत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

मृतदेहही वेटिंगवर

कोरोना रुग्णसंख्या प्रचंड वाढल्याने रुग्णालयात रुग्णांना वेटिंगवर राहावे लागत होते. त्यातच मृतांचे प्रमाण दुसरीकडे प्रचंड वाढत असल्याने अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत आधीच नोंदणी करून ठेवावी लागत होती. मृतदेह अंत्यसंस्कारासाठी वेटिंगवर राहत होते. दिवसाला ३४ अंत्यसंस्कार होत होते. त्यामुळे स्मशानभूमीतील ओटे कमी पडत होते, अशा स्थितीत एका मृतावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर चार ते पाच तासांत त्यांची राख बाजूला काढून तातडीने दुसऱ्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागत असल्याने कर्मचारीच राख बाजूला काढून ठेवत होते. नातेवाईक त्यावेळेस आल्यास त्यांना अस्थी मिळत होत्या. कुणी न आल्यास कर्मचारीच ती फेकून देत होते.

गेल्या महिनाभरापूर्वी स्मशानभूमीत एका दिवसाला ३० ते ३५ अंत्यसंस्कार केले जात होते. हळूहळू हे प्रमाण आता कमी होऊन दहापेक्षाही खाली आले आहे. सुरुवातीला नातेवाइकांमध्ये प्रचंड भीती असल्याने ते अस्थी घेण्यासाठीही येत नव्हते. आता ही भीती कमी झाल्याने नातेवाईक समोर येतात, शिवाय गेल्या महिन्याच्या तुलनेत मृत्यूही कमी झाले आहेत.

- धनराज सपकाळे, स्मशानभूमी रक्षक.