शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

‘मृत्यू्’ इथले थांबत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या उपचार घेत असलेल्या रुग्णांचे प्रमाण स्थिर असले तरी कोरोना मृत्यूचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या उपचार घेत असलेल्या रुग्णांचे प्रमाण स्थिर असले तरी कोरोना मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. बुधवारीदेखील जिल्ह्यात तब्बल २२ जणांचा कोरोनाने बळी गेला. शहरातीर ८ जणांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे. त्यात एका ३० वर्षांच्या महिलेचाही समावेश आहे. तर शहरातील ३२ वर्षांच्या युवकाचाही मृत्यू झाला आाहे. महिला आणि कमी वयाच्या रुग्णांचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे. सध्या जिल्ह्यात एकूण कोरोनाबळींचा आकडा १९९८ एवढा झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यासोबतच मृत्यूंची संख्या देखील वाढत आहे. बुधवारी एकाच दिवसात जळगाव शहरात कोरोनाने ८ जणांचा बळी गेला आहे. त्यात ३२ वर्षांच्या पुरुषाचा देखील समावेश आहे. हा आजच्या दिवसातील सर्वात कमी वयाचा कोरोना बळी आहे. तरुणांचा देखील कोरोनाने बळी जाण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने जळगावकरांच्या चिंतेत भर पडली आहे.

जळगाव शहरात मृत्यू झालेल्यांमध्ये ७ पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. तर भुसावळ आणि चोपडा तालुक्यात प्रत्येकी ४ तर यावल, पाचोरा, रावेर, मुक्ताईनगर, धरणगाव आणि चाळीसगाव तालुक्यात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. एकूण २२ मृत्यूंपैकी ८ महिलांचा मृत्यू झाला.

बुधवारी ११४२ नवे रुग्ण आढळून आले तर ११३४ जण बरे झाले त्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात कोरोनाचे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ११ हजार ११८ एवढी झाली आहे.

जामनेरला कोरोना रुग्णांच्या संख्येत स्फोट

बुधवारी जामनेर तालुक्यात तब्बल २८७ नवे बाधित सापडले आहेत. त्यात ॲन्टिजेन चाचणीत तब्बल २५५ नवे बाधित सापडले आहेत. तर रावेरला १०४, भुसावळला ११४, चोपड्यात १०४ नवे रुग्ण आहेत. जळगाव शहरात देखील १८९ नवे बाधित आहेत. जळगाव ग्रामीणमध्येदेखील ३९ नवे रुग्ण आहेत.

१५ हजाराच्या वर झाल्या चाचण्या

बुधवारी एकाच दिवसात १५,१०५ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात १ हजार ९५४ रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. तर १३ हजार १५१ जणांची रॅपिड ॲन्टिजेन चाचणी करण्यात आली आहे. चाचण्यांची संख्या वाढल्याने जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट खाली आला आहे.