शहरं
Join us  
Trending Stories
1
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
2
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
3
तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
4
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
5
Gold Silver Price 25 August: सोन्याच्या दरात बंपर तेजी, एका दिवसात चांदी २६२७ रुपयांनी महागली; पाहा काय आहेत नवे दर?
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
8
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
9
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल
10
आता फक्त ३ मिनिटांत भरा ITR! 'या' कंपनीने लॉन्च देशातील पहिला AI प्लॅटफॉर्म; अंतिम मुदतही वाढली
11
Nikki Murder Case : "दोन्ही जावई मुलींच्या पार्लरमधून पैसे चोरायचे, काहीच काम करत नव्हते"; ढसाढसा रडले वडील
12
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
13
Ola Electric Share Price: ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
14
गणेश चतुर्थी २०२५: राहु काळ कधी? ‘या’ शुभ मुहूर्तावर स्थापन करा गणपती; पाहा, चंद्रास्त वेळ
15
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
16
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
17
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
18
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
19
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
20
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य

‘मृत्यू्’ इथले थांबत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या उपचार घेत असलेल्या रुग्णांचे प्रमाण स्थिर असले तरी कोरोना मृत्यूचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या उपचार घेत असलेल्या रुग्णांचे प्रमाण स्थिर असले तरी कोरोना मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. बुधवारीदेखील जिल्ह्यात तब्बल २२ जणांचा कोरोनाने बळी गेला. शहरातीर ८ जणांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे. त्यात एका ३० वर्षांच्या महिलेचाही समावेश आहे. तर शहरातील ३२ वर्षांच्या युवकाचाही मृत्यू झाला आाहे. महिला आणि कमी वयाच्या रुग्णांचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे. सध्या जिल्ह्यात एकूण कोरोनाबळींचा आकडा १९९८ एवढा झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यासोबतच मृत्यूंची संख्या देखील वाढत आहे. बुधवारी एकाच दिवसात जळगाव शहरात कोरोनाने ८ जणांचा बळी गेला आहे. त्यात ३२ वर्षांच्या पुरुषाचा देखील समावेश आहे. हा आजच्या दिवसातील सर्वात कमी वयाचा कोरोना बळी आहे. तरुणांचा देखील कोरोनाने बळी जाण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने जळगावकरांच्या चिंतेत भर पडली आहे.

जळगाव शहरात मृत्यू झालेल्यांमध्ये ७ पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. तर भुसावळ आणि चोपडा तालुक्यात प्रत्येकी ४ तर यावल, पाचोरा, रावेर, मुक्ताईनगर, धरणगाव आणि चाळीसगाव तालुक्यात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. एकूण २२ मृत्यूंपैकी ८ महिलांचा मृत्यू झाला.

बुधवारी ११४२ नवे रुग्ण आढळून आले तर ११३४ जण बरे झाले त्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात कोरोनाचे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ११ हजार ११८ एवढी झाली आहे.

जामनेरला कोरोना रुग्णांच्या संख्येत स्फोट

बुधवारी जामनेर तालुक्यात तब्बल २८७ नवे बाधित सापडले आहेत. त्यात ॲन्टिजेन चाचणीत तब्बल २५५ नवे बाधित सापडले आहेत. तर रावेरला १०४, भुसावळला ११४, चोपड्यात १०४ नवे रुग्ण आहेत. जळगाव शहरात देखील १८९ नवे बाधित आहेत. जळगाव ग्रामीणमध्येदेखील ३९ नवे रुग्ण आहेत.

१५ हजाराच्या वर झाल्या चाचण्या

बुधवारी एकाच दिवसात १५,१०५ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात १ हजार ९५४ रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. तर १३ हजार १५१ जणांची रॅपिड ॲन्टिजेन चाचणी करण्यात आली आहे. चाचण्यांची संख्या वाढल्याने जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट खाली आला आहे.