शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

झेडटीसी परिसराला जोडणाऱ्या बोगद्यात अंधार,  अपघाताची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 15:47 IST

झेडटीसी परिसराला जोडणाऱ्या बोगद्यात अंधार आहे. यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.

भुसावळ : झेडटीसी परिसराला जोडणारा बोगदा काही दिवसांपासून नागरिकांसाठी खुला करण्यात आला. पूर्ण काम झालेले नसताना हा बोगदा खुला करण्यात आला. सध्या या बोगद्यात अंधार आहे. यामुळे येथे काळोख पसरला असून, अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. बोगद्यात अंधार असल्यानेही अपघाताला आमंत्रण दिल्यासारखे आहे. त्यामुळे या बोगद्यात रात्री अंधार राहात असून चोरी, लुटमार, विद्यार्थिनी व महिलांसोबत अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी तक्रार वाहनचालकांनी शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांच्याकडे केली.रेल्वेने बांधलेल्या या बोगद्याचे अंतर २०० मीटरपेक्षा जास्त आहे. आतमध्ये अजूनही दिवे बसविण्यात आले नाहीत. त्यामुळे बोगद्यातील काळोखातून वाहने ये-जा करतात. अंधार असल्याने पुढची वाहने दिसत नाहीत. अचानक ब्रेक लावल्यास मागून आलेली वाहने धडकण्याची शक्यता असते. अंधारात वेग कमी जास्त करण्याससुद्धा वाहनचालकांना अडचणी येत आहेत. रेल्वे प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देऊन बोगद्यातील दिवे चालू करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा संघटक विलास मुळे, उपजिल्हाप्रमुख श्याम श्रीगोंदेकर, उपजिल्हा प्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, तालुकाप्रमुख समाधान महाजन, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे.तालुक्यातील भुसावळ, वरणगाव व इतर परिसरात ये जा करण्यासाठी हा मार्ग रेल्वे कर्मचारी, ऑर्डनन्स फॅक्टरी कर्मचारी, आर्मी जवान, विद्यार्थी, महिला व नागरिक वापरतात. काम अपूर्ण असतांना बोगदा खुला करायला नको होता, वाहनचालकांची सुरक्षितता लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने त्वरित दिवे लावावेत अन्यथा शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात येईल, असे प्रा.धीरज पाटील यांनी कळविले आहे.

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ