शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

कोरोनामुळे अंध व्यक्तींसमोर अंधार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:13 IST

- स्टार : ७५२ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : लॉकडाउन काळात अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले तर अनेकांचा रोजगार बुडाला. ...

- स्टार : ७५२

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : लॉकडाउन काळात अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले तर अनेकांचा रोजगार बुडाला. दुसरीकडे वर्षभरापासून अंध व्यक्तींना देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आधी मिळेल ते काम करून कुटुंबाचा व स्वत:चा उदरनिर्वाह सुरू होता. पण, आता हाताला काम नसल्यामुळे 'अंध व्यक्तींच्या आयुष्यात पुन्हा अंधार' आला आहे. शासनाकडून सुध्दा तुटपूंजी मदत मिळते. ती देखील वेळेवर मिळत नाही. परिणामी, आर्थिक अडचणींना सामना करावा लागतो, त्यामुळे शासनाकडून संजय गांधी योजनेच्या माध्यमातून दिली जाणारी मदत ही वाढवून मिळावी, अशी मागणी अंध बांधवांकडून होत आहे.

वर्षभरापासून जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूने कहर माजविलेला आहे. लाखाच्यावर कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर अनेकांनी कोरोनावर मात सुध्दा केली. पण, काहींना आपला जीव सुध्दा गमवावा लागला. दुसरीकडे अनेकांचा व्यवसाय ठप्प पडला. तर अनेकांचा रोजगारही गेला. जळगाव जिल्ह्यात ३० हजार दिव्यांग बांधव आहेत. मिळेल त्याठिकाणी काम करून स्वत:चा व कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र, गेल्या वर्षभरापासून अंध बांधवांच्या हाताला काम नाही. संजय गांधी योजनेच्या माध्यमातून हजार रूपये आर्थिक मदत मिळते. पण, ही तुटपूंजी रक्कम सुध्दा वेळेवर व नियमित मिळत नाही. त्यामुळे इतरांवर अवलंबून रहावे लागते. मागील वर्षी सामाजिक संस्थांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. मात्र, या वर्षी बोटावर मोजक्याच इतक्या संस्थांनी पुढाकार घेतल्यामुळे काही प्रमाणात मदत मिळाली. त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह केल्याची प्रतिक्रिया अंध बांधवांनी दिली.

----------------------------

आधारही एकमेकांचाचं !

सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतल्यामुळे दिव्यांग बांधवांना रेशनची मदत मिळाली. वडिलांचे गॅरेज आहे. पण, लॉकडाउनमुळे ते बंद आहे. आता ११ पर्यंत व्यवसायासाठी मुभा असल्यामुळे जे मिळेल त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे. नुकतीच एका बँकेत क्लर्क म्हणून निवड झाली आहे.

- मंगेश शेवाळे

=========

नोकरीसाठी प्रयत्न सुरू आहे. पण, मिळत नाही. लॉकडाउनमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वडिल सुध्दा दिव्यांग आहेत. भाउ कंपनीत कामाला आहे. भावावर संपूर्ण कुटूंब अवलंबून आले. संजय गांधी योजनेतून मिळणारी रक्कम वेळेवर मिळत नाही. ती रक्कमही कमी आहे. त्यामुळे मदतीची रक्कम ही वाढवून मिळावी.

=========

अंधत्वाचे प्रमाण ७५ टक्के आहे. भाजीपाला विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे. दिवसात जितकी विक्री होईल, त्यातून संसाराचा गाडा हाकला जातो. पत्नीची साथ मिळत आहे. दरम्यान, दिव्यांग बांधवांसाठी शासनाने मदत जाहीर करावी.

- यशवंत सोनवणे

==========

- दोन जणांचा मृत्यू

कोरोनामुळे अनेकांना जीव गमवावा लागला. दिव्यांग बांधवांना सुध्दा कोरोनाची लागण होवून त्यातील दोन अंध बांधवांचा मृत्यू झाला. कैलास शिंपी व साहेबराव पगारे असे मयत झालेल्या अंध बांधवांची नावे आहेत. दोघं शिक्षकी पेशात असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, जिल्ह्यातील आणखी काही दिव्यांग बांधवांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, त्याबाबत नोंद नाही.

==========

मुंबई, पुणे महानगरपालिकेने दिव्यांग बांधवांना उपजिविकेकरिता जी मदत लागते. ती मदत मंजूर केली व पाच टक्के निधीतून दिव्यांग बांधवांना वस्तु घेवून दिल्या. याच प्रमाणे जळगाव मनपा व जिल्हा परिषदेने दिव्यांग बांधवांचे पुर्नवसन कसे केले जाईल, यासाठी प्रयत्न केले पाहिजे.

- मुकूंद गोसावी, अशासकीय सदस्य, पाच टक्के निधी समिती.