शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

भुसावळ तालुक्यावर दुष्काळाचे गडद सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 14:21 IST

नजर पैसेवारी मात्र ६१ टक्के : जिल्ह्यातून तालुक्यात सर्वात कमी ४९ टक्के पाऊस

ठळक मुद्देपाऊस ४९ टक्के, तर नजर पैसेवारी ६१ टक्केशासनाने बांधलेले ११२ शेततळे पाझर तलाव, नदीनाले अद्यापही कोरडेठाक

भुसावळ, जि.जळगाव : तालुक्यात यावर्षी जिल्ह्यातून सर्वात कमी केवळ ४९.६५ टक्के पाऊस पडला आहे. गेल्या २४ दिवसापासून पाऊस बेपत्ता आहे. त्यामुळे तालुका दुष्काळाच्या छायेत आहे . तरीही महसूल प्रशासनाने १६ सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या नजर पैसेवारीच्या प्रस्तावात तब्बल ६१.३७ टक्के नजर पैसेवारीचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग अस्मानी संकटासोबतच महसुली संकटात सापडला आहे.तालुक्यात यावर्षी शहरात ३ जून रोजी ४.५ मि.मी. व ७ जून रोजी १६ मि.मी. पाऊस पडला होता. हा पाऊस केवळ शहरात पडला होता, तर १९ जूनपासून संपूर्ण तालुक्यात पावसाला प्रारंभ झाला होता. त्यानंतर जुलै महिन्यात पिकांना दिलासादायक पाऊस पडला होता. आॅगस्ट महिन्यात मात्र पावसाने प्रथम १२ आॅगस्टपर्यंत त्यानंतर २५ आॅगस्टपासून पुन्हा दडी मारली. त्यामुळे उडीद, मूग, सोयाबीन, मका, ज्वारी फुलोऱ्यात व वाढमध्ये असताना पाऊस बेपत्ता झाल्यामुळे त्याचा फार मोठा फटका बसला. याचा उत्पन्नावर मोठा परिणाम झाला.तालुक्यात आतापर्यंत ३३२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. १०० टक्के पावसाच्या नोंदीसाठी ६६९.२० पावसाचे प्रमाण करण्यात आले आहे. त्यामुळे ५० टक्के ही पाऊस पडला नसताना महसूल विभागाने तब्बल ६१.३७ टक्के नजरपैसे वारी हा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग अस्मानी संकटात सोबतच महसुली संकटातही सापडला आहे.तालुक्यात भुसावळ, वरणगाव, पिंपळगाव व कुºहे (पानाचे) असे चार महसुली सजे आहेत. या सजांचा विचार केला तर पावसाळ्याच्या आतापर्यंत १०७ दिवसांपैकी भुसावळ शहरात ४२ दिवस पावसाने हजेरी लावली आहे, तर वरणगाव सजामध्ये ३४ दिवस, पिंपळगाव सजामध्ये २३ दिवस व कुºहे (पानाचे ) सजामध्ये २६ दिवस एवढेच हजेरी लावली आहे. त्यातही काही गावांमध्ये एक मि.मी.वर काही गावांमध्ये दोन मिलिमीटर तर काही गावांमध्ये केवळ पाच मिलिमीटर असा अल्पसा पाऊस पडला आहे. त्यामुळे तालुक्यात नदी नाल्यांना पूर तर सोडाच थोडेफार पाणी आले नाही. त्यामुळे शासनाने बांधलेले ११२ शेततळे पाझर तलाव, नदीनाले अद्यापही कोरडेठाक पडले आहेत. पाण्याची पातळी तळाला असल्यामुळे शेतकरी वर्ग रब्बी तर सोडाच खरीप हंगाम घेऊ शकत नसल्यामुळे पूर्णपणे दुष्काळाच्या संकटात सापडला आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईBhusawalभुसावळ