शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

भुसावळ तालुक्यावर दुष्काळाचे गडद सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 14:21 IST

नजर पैसेवारी मात्र ६१ टक्के : जिल्ह्यातून तालुक्यात सर्वात कमी ४९ टक्के पाऊस

ठळक मुद्देपाऊस ४९ टक्के, तर नजर पैसेवारी ६१ टक्केशासनाने बांधलेले ११२ शेततळे पाझर तलाव, नदीनाले अद्यापही कोरडेठाक

भुसावळ, जि.जळगाव : तालुक्यात यावर्षी जिल्ह्यातून सर्वात कमी केवळ ४९.६५ टक्के पाऊस पडला आहे. गेल्या २४ दिवसापासून पाऊस बेपत्ता आहे. त्यामुळे तालुका दुष्काळाच्या छायेत आहे . तरीही महसूल प्रशासनाने १६ सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या नजर पैसेवारीच्या प्रस्तावात तब्बल ६१.३७ टक्के नजर पैसेवारीचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग अस्मानी संकटासोबतच महसुली संकटात सापडला आहे.तालुक्यात यावर्षी शहरात ३ जून रोजी ४.५ मि.मी. व ७ जून रोजी १६ मि.मी. पाऊस पडला होता. हा पाऊस केवळ शहरात पडला होता, तर १९ जूनपासून संपूर्ण तालुक्यात पावसाला प्रारंभ झाला होता. त्यानंतर जुलै महिन्यात पिकांना दिलासादायक पाऊस पडला होता. आॅगस्ट महिन्यात मात्र पावसाने प्रथम १२ आॅगस्टपर्यंत त्यानंतर २५ आॅगस्टपासून पुन्हा दडी मारली. त्यामुळे उडीद, मूग, सोयाबीन, मका, ज्वारी फुलोऱ्यात व वाढमध्ये असताना पाऊस बेपत्ता झाल्यामुळे त्याचा फार मोठा फटका बसला. याचा उत्पन्नावर मोठा परिणाम झाला.तालुक्यात आतापर्यंत ३३२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. १०० टक्के पावसाच्या नोंदीसाठी ६६९.२० पावसाचे प्रमाण करण्यात आले आहे. त्यामुळे ५० टक्के ही पाऊस पडला नसताना महसूल विभागाने तब्बल ६१.३७ टक्के नजरपैसे वारी हा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग अस्मानी संकटात सोबतच महसुली संकटातही सापडला आहे.तालुक्यात भुसावळ, वरणगाव, पिंपळगाव व कुºहे (पानाचे) असे चार महसुली सजे आहेत. या सजांचा विचार केला तर पावसाळ्याच्या आतापर्यंत १०७ दिवसांपैकी भुसावळ शहरात ४२ दिवस पावसाने हजेरी लावली आहे, तर वरणगाव सजामध्ये ३४ दिवस, पिंपळगाव सजामध्ये २३ दिवस व कुºहे (पानाचे ) सजामध्ये २६ दिवस एवढेच हजेरी लावली आहे. त्यातही काही गावांमध्ये एक मि.मी.वर काही गावांमध्ये दोन मिलिमीटर तर काही गावांमध्ये केवळ पाच मिलिमीटर असा अल्पसा पाऊस पडला आहे. त्यामुळे तालुक्यात नदी नाल्यांना पूर तर सोडाच थोडेफार पाणी आले नाही. त्यामुळे शासनाने बांधलेले ११२ शेततळे पाझर तलाव, नदीनाले अद्यापही कोरडेठाक पडले आहेत. पाण्याची पातळी तळाला असल्यामुळे शेतकरी वर्ग रब्बी तर सोडाच खरीप हंगाम घेऊ शकत नसल्यामुळे पूर्णपणे दुष्काळाच्या संकटात सापडला आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईBhusawalभुसावळ