शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ तालुक्यावर दुष्काळाचे गडद सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 14:21 IST

नजर पैसेवारी मात्र ६१ टक्के : जिल्ह्यातून तालुक्यात सर्वात कमी ४९ टक्के पाऊस

ठळक मुद्देपाऊस ४९ टक्के, तर नजर पैसेवारी ६१ टक्केशासनाने बांधलेले ११२ शेततळे पाझर तलाव, नदीनाले अद्यापही कोरडेठाक

भुसावळ, जि.जळगाव : तालुक्यात यावर्षी जिल्ह्यातून सर्वात कमी केवळ ४९.६५ टक्के पाऊस पडला आहे. गेल्या २४ दिवसापासून पाऊस बेपत्ता आहे. त्यामुळे तालुका दुष्काळाच्या छायेत आहे . तरीही महसूल प्रशासनाने १६ सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या नजर पैसेवारीच्या प्रस्तावात तब्बल ६१.३७ टक्के नजर पैसेवारीचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग अस्मानी संकटासोबतच महसुली संकटात सापडला आहे.तालुक्यात यावर्षी शहरात ३ जून रोजी ४.५ मि.मी. व ७ जून रोजी १६ मि.मी. पाऊस पडला होता. हा पाऊस केवळ शहरात पडला होता, तर १९ जूनपासून संपूर्ण तालुक्यात पावसाला प्रारंभ झाला होता. त्यानंतर जुलै महिन्यात पिकांना दिलासादायक पाऊस पडला होता. आॅगस्ट महिन्यात मात्र पावसाने प्रथम १२ आॅगस्टपर्यंत त्यानंतर २५ आॅगस्टपासून पुन्हा दडी मारली. त्यामुळे उडीद, मूग, सोयाबीन, मका, ज्वारी फुलोऱ्यात व वाढमध्ये असताना पाऊस बेपत्ता झाल्यामुळे त्याचा फार मोठा फटका बसला. याचा उत्पन्नावर मोठा परिणाम झाला.तालुक्यात आतापर्यंत ३३२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. १०० टक्के पावसाच्या नोंदीसाठी ६६९.२० पावसाचे प्रमाण करण्यात आले आहे. त्यामुळे ५० टक्के ही पाऊस पडला नसताना महसूल विभागाने तब्बल ६१.३७ टक्के नजरपैसे वारी हा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग अस्मानी संकटात सोबतच महसुली संकटातही सापडला आहे.तालुक्यात भुसावळ, वरणगाव, पिंपळगाव व कुºहे (पानाचे) असे चार महसुली सजे आहेत. या सजांचा विचार केला तर पावसाळ्याच्या आतापर्यंत १०७ दिवसांपैकी भुसावळ शहरात ४२ दिवस पावसाने हजेरी लावली आहे, तर वरणगाव सजामध्ये ३४ दिवस, पिंपळगाव सजामध्ये २३ दिवस व कुºहे (पानाचे ) सजामध्ये २६ दिवस एवढेच हजेरी लावली आहे. त्यातही काही गावांमध्ये एक मि.मी.वर काही गावांमध्ये दोन मिलिमीटर तर काही गावांमध्ये केवळ पाच मिलिमीटर असा अल्पसा पाऊस पडला आहे. त्यामुळे तालुक्यात नदी नाल्यांना पूर तर सोडाच थोडेफार पाणी आले नाही. त्यामुळे शासनाने बांधलेले ११२ शेततळे पाझर तलाव, नदीनाले अद्यापही कोरडेठाक पडले आहेत. पाण्याची पातळी तळाला असल्यामुळे शेतकरी वर्ग रब्बी तर सोडाच खरीप हंगाम घेऊ शकत नसल्यामुळे पूर्णपणे दुष्काळाच्या संकटात सापडला आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईBhusawalभुसावळ