शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मेहरूण तलावाची जैवविविधता धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 12:30 IST

१२ व्या शतकापासूनची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या मेहरूण तलावातील जैवविविधतादेखील मानवी अतिक्रमणामुळे धोक्यात आली आहे. शासनाच्या धोरणाप्रमाणे जिल्हा आणि गाव ...

१२ व्या शतकापासूनची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या मेहरूण तलावातील जैवविविधतादेखील मानवी अतिक्रमणामुळे धोक्यात आली आहे. शासनाच्या धोरणाप्रमाणे जिल्हा आणि गाव पातळीवर जैवविविधता समित्या स्थापन करून त्यांचे रक्षण करणे आवश्यक आहे. मात्र, यासंदर्भात स्थानिक स्वराज्य संस्था तसेच प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे तलाव परिसरातील जैवविविधता धोक्यात आली आहे. विविध वनस्पती, जलचर प्राणी, मासे, देशी- परदेशी पक्षी, वन्यप्राणी, सरपटणारे प्राणी यांचे अस्तित्व असलेल्या मेहरूण परिसरात मोठ्या प्रमाणावर आढळून येते. लांडोरखोरी राखीव वनक्षेत्र लागून असल्याने वन्यप्राण्यांचेदेखील या भागात वास्तव्य असते. मात्र, मानवी अतिक्रमण, प्रदूषण, सांडपाणी, रहिवासासाठी उभारलेले सिमेंटचे जंगल यामुळे या परिसरातील नैर्सगिक सौद्यर्य नष्ट होण्याच्या मार्गावर आहे़ शहरातील दोनशेवर विहिरींना जीवदान देणाऱ्या मेहरूण तलावातील नितळ पाणी इतिहास जमा झालेले आहे. जळगावच्या वैभवात भर घालणाºया या तलावात ड्रेनेजचे पाणी सोडले जात आहे. गटारीच्या पाण्यामुळे अनेक वनस्पती नष्ट होत असून, ५० टक्के पक्ष्यांनी या तलावाकडे पाठ फिरवली आहे. नैसर्गिक जलस्रोतही बदलल्याने या तलावाची वाटचाल गटाराच्या दिशेने सुरू झाली आहे. म्हणून सर्व पर्यावरण प्रेमी व जागरूक नागरिकांनी शहराच्या सौंदर्यात भर घालणाºया मेहरुण तलावाचे संरक्षण व जलसंवर्धन करणे तसेच मनपाने त्याची योग्य निगा व काळजी घेणे खूप गरजेचे आहे.- अशफाक पिंजारी, जिल्हाध्यक्ष आॅल इंडिया मुस्लीम ओबीसी आॅर्गनायझेशन

टॅग्स :Jalgaonजळगाव