शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

जळगावात महाविद्यालय परिसरात ३० टवाळखोरांवर कारवाईचा दंडुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 12:16 IST

पोलीस अधीक्षकांचे आदेश

जळगाव : मू.जे.महाविद्यालयात मुकेश सपकाळे या विद्यार्थ्याचा भरदिवसा खून झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालय परिसरात टवाळखोरी करणारे तसेच उपद्रवी ठरलेल्या ३० तरुणांवर गुरुवारी पोलिसांनी कारवाईचा दंडूका उगारला. शहर व जिल्हा पेठ पोलिसांनी संयुक्तरित्या बाहेती महाविद्यालयाच्या परिसरात मोहीम राबविली.मुकेश सपकाळे या तरुणाच्या खुनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयातील गुंडगिरी तसेच टवाळखोरांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी दिले आहेत. महाविद्यालय प्रशासनालाही त्यांनी काही उपाययोजना व खबरदारी सुचविली आहे. गुरुवारी शहरातील सर्वच महाविद्यालयाच्या परिसरात नाकाबंदी करण्यात आली.शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवीकांत सोनवणे, जिल्हा पेठचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप आराक व सहाय्यक फौजदार वासुदेव सोनवणे व आरसीपी प्लाटूनसह बाहेती परिसरात नाकाबंदी करण्यात केली असता टवाळखोर व उपद्रवी ठरणाºया ३० जणांवर कारवाई करण्यात आली. त्याशिवाय महाविद्यालयाचा विद्यार्थी नसतानाही परिसरात वावर करणे, ट्रीपल सीट, भरधाव वेगाने दुचाकी चालविणायांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.विचित्र राहणीमान, हेयरस्टाईल करणारे रडारवरनिरीक्षक रवीकांत सोनवणे यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई तर केलीच, शिवाय विचित्र राहणीमान, विचित्र नंबर प्लेट, हेयर स्टाईल करुन महाविद्यालय परिसरात फिरणाºया तरुणांना भरचौकातच फैलावर घेतले. काही जणांना तर तरुणींच्यासमोरच फैलावर घेण्यात आले. आजच्या या कडक मोहिमेमुळे टवाळखोरांचा उपद्रव थांबला होता. या मोहिमेत सातत्य असावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.टवाळखोरांच्या पालकांना बोलावणारमहाविद्यालय परिसरात टवाळखोरी करणाºया तरुणांवर कारवाई करुन त्यांची पोलिसांच्या पिंजरा वाहनात रवानगी करण्यात येणार आहे. पिंजरा वाहन हे आरोपींच्या वाहतुकीसाठी असून प्रत्येक पोलीस स्टेशनला एक याप्रमाणे सहा वाहने पुरविण्यात आली आहेत. ही वाहने महाविद्यालयाच्या बाहेर थांबविण्यात येणार आहे. टवाळखोरांना सर्वांसमक्ष शिक्षा करुन वाहनात टाकण्यात येईल, त्यानंतर त्यांच्या पालकांना पाचारण केले जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी दिली. पुणे येथे गणेशोत्सव विसर्जन मार्गावर मिनी कोठडी तयार करण्यात येते, त्याच धर्तीवर पिंजरा गाडी असणार आहे.सुपेकर पॅटर्नची अंमलबजावणीमहाविद्यालयातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी युवा सुरक्षा अभियान उपक्रम राबविला होता. तरुणांचे प्रबोधन करण्यासह सायबर क्राईम, टवाळखोरी, तरुणींची छेडखानी यावर उपाययोजना करण्यासाठी तरुणांना पोलिसांशी जोडले होते. महाविद्यालय व पोलीस यांच्यात एक समन्वयक नेमला होता. त्यामुळे गुन्हेगारी नियंत्रणात आली होती.अमलबजावणी केली जाणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव