चाळीसगाव : लॉकडाऊन असतानाही निर्बंध झुगारून विनाकारक बाहेर भटकणाऱ्यांना पालिका आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने रडारवर घेतले आहे. सकाळी ११ नंतर विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. शनिवारी अशा ५४ जणांकडून ५० हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
कोरोनाच्या संक्रमणाचा विळखा तोडण्यासाठी लॉकडाऊन अधिक कडक करण्यात आले. यासाठी पोलीस प्रशासन रस्त्यावर उतरले आहे. बाहेर भटकणारे, मास्क न लावणाऱ्यांना गाठण्यासाठी चार पथके केली गेली आहेत. पालिकेचे पथकही सक्रिय झाले असून संयुक्तपणे धडक कारवाई करण्यात येत आहे.
.....
चौकट
एकाच दिवशी ५० हजार दंडवसुली
शनिवारी एकाच दिवशी शहराच्या विविध भागांत विनाकारण बाहेर फिरणारे, मास्क न लावणाऱ्यांकडून पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, पोलीस उपनिरीक्षक विशाल टकले, सचिन कापडणीस, प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार, एपीआय निसार सय्यद यांच्यासह पालिकेच्या पथकातील दिनेश जाधव, प्रवीण तोमर, जितेंद्र जाधव, प्रशांत सोनावणे, रवींद्र जाधव, प्रसाद बाविस्कर यांनी ही कारवाई केली. ५४ जणांकडून दंड वसूल झाल्याने बाहेर फिरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
१... विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार असून धडक कारवाई सुरूच राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना काळात सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.
शुक्रवारीही २८ हजारांचा दंड
मास्क न लावलेल्या, विनाकारण फिरणाऱ्यांकडून शुक्रवारीदेखील पथकाने २८ हजार ८५० रुपये इतका दंड वसूल केला. एकूण ६७ जणांवर कारवाई केली गेली.
===Photopath===
240521\24jal_2_24052021_12.jpg
===Caption===
चाळीसगावला विनाकारण भटकणाऱ्यांना ‘दंडाची बेडी’