शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

अधिकाऱ्यांच्या वादामुळे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 12:21 IST

अजय पाटीलमनपाची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. अजूनही अनेक कर्मचाºयांचे काही महिन्यांचे वेतन झालेले नाही. अशी परिस्थिती असताना केवळ शासनाकडून येणाºया निधीतूनच शहराचा विकास करावा लागत आहे.मनपाच्या काही अधिकाºयांच्या अंतर्गत वादामुळे शहर विकासाच्या अनेक महत्त्वाच्या फाईल दोन-दोन महिने मनपा प्रशासनाकडे पडून आहेत. आलेल्या निधीतून कामे मार्गी लागत नसल्याचा प्रकार मनपात सध्या ...

अजय पाटीलमनपाची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. अजूनही अनेक कर्मचाºयांचे काही महिन्यांचे वेतन झालेले नाही. अशी परिस्थिती असताना केवळ शासनाकडून येणाºया निधीतूनच शहराचा विकास करावा लागत आहे.मनपाच्या काही अधिकाºयांच्या अंतर्गत वादामुळे शहर विकासाच्या अनेक महत्त्वाच्या फाईल दोन-दोन महिने मनपा प्रशासनाकडे पडून आहेत. आलेल्या निधीतून कामे मार्गी लागत नसल्याचा प्रकार मनपात सध्या दिसून येत आहे. मंगळवारी मनपा उपायुक्त चंद्रकांत खोसे व आरोग्य अधिकारी उदय पाटील यांच्यात झालेल्या वादामुळे हा सर्व प्रकार समोर आला आहे. या वादामुळे अनेक महिन्यांपासून मनपामध्ये राजपत्रित अधिकारी व विरुद्ध मनपा अधिकारी असे दोन गट तयार झाल्याचेही दिसून येत आहे. काही शहरांमध्ये राजकीय पदाधिकाºयांमध्ये अनेकदा वाद असताना प्रशासनाचे अधिकारी मात्र या वादावर तोडगा काढत शहर विकासाचा गाडा हाकत असतात. मात्र, जळगाव महापालिकेत चित्र वेगळे दिसून येत आहे. या ठिकाणी प्रशासनातील अधिकाºयांमध्येच अंतर्गत राजकारण सुरू आहे. त्यामुळे शहराच्या विकासासंबंधी व काही समस्यांसंबंधीचे निर्णय होऊ शकणाºया फाईलींकडे दुर्लक्ष होत आहे. अधिकाºयांचा या वादामुळे शहरातील नागरिकांना का वेठीस धरले जात आहे? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. आधीच शहरातील नागरिकांना आवश्यक सोयीसुविधा मिळत नाही. त्यामुळे शासनाकडून येणाºया योजना व निधीच्या बाबतीत ‘खोडा’ घालण्याचा अधिकार मनपातील अधिकाºयांना कोणी दिला? उपायुक्त चंद्रकांत खोसे यांचे राजेश कानडे यांच्याशी मतभेद असू शकतात. तसेच दैनंदिन कामकाज करत असताना विभाग प्रमुखांसोबत काही मतभेद किंवा वाद असू शकतात. मात्र, त्यांच्या या वादामुळे ६ लाख जळगावकरांना सोयी सुविधांपासून वंचित ठेवू नये. स्वच्छता वॉर्ड स्पर्धेचे असो वा घनकचरा प्रकल्पाच्या ९ कोटी रुपयांच्या निधीबाबतच्या फाईल्स दोन महिने उपायुक्तांकडे पडून राहिल्याने स्वच्छ शहर सर्वेक्षणातदेखील जळगाव शहराला फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र, या सर्व प्रकाराबाबत मनपा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी चुप्पी साधली आहे. या वादावर त्यांनी तोडगा काढण्याची गरज आहे. अन्यथा मनपा राजपत्रित अधिकारी व मनपा अधिकाºयांचा या राजकारणामुळे जळगाव शहरातील सर्वसामान्य नागरिकांनाच अधिक फटका बसत राहील.

टॅग्स :Jalgaonजळगाव