शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
4
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
5
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
6
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
7
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
8
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
9
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
10
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
11
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
12
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
13
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
14
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
15
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
16
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
17
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
18
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
19
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
Daily Top 2Weekly Top 5

सहा तालुक्यात साडेचार हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:17 IST

जळगाव : शनिवार, २० मार्च रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील सहा तालुक्यातील चार हजार ५३४.३० हेक्‍टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान ...

जळगाव : शनिवार, २० मार्च रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील सहा तालुक्यातील चार हजार ५३४.३० हेक्‍टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक एक हजार ९०६ हेक्‍टरवर जळगाव तालुक्यात नुकसान झाले आहे. पिकांमध्ये मक्‍याला सर्वाधिक फटका बसला असून १३९१.२० हेक्‍टरवरील मका हातचा गेला आहे.

गेल्या महिन्यात १८ फेब्रुवारी रोजी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानी मधून बळीराजा सावरत नाही तोच पुन्हा २० मार्च रोजी संध्याकाळी अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. यामध्ये जिल्ह्यातील जळगाव, बोदवड, मुक्ताईनगर, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव या सहा तालुक्यात पिकांना मोठा फटका बसला आहे. याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यात आला आहे.

जळगाव, चाळीसगाव तालुक्यात अधिक नुकसान

शनिवारी झालेल्या अवकाळी पावसामध्ये सर्वाधिक नुकसान जळगाव तालुक्यातील झाले असून एक हजार ९०६ हेक्‍टर वरील पिके नष्ट झाली आहे. त्याखालोखाल चाळीसगाव तालुक्यात १५९२.९० हेक्‍टर वर नुकसान झाले. तसेच पाचोरा तालुक्यात ८६२.२० हेक्‍टर, बोदवड तालुक्यात ८९.४० हेक्‍टर, मुक्ताईनगर तालुक्यात ४६ हेक्‍टर, भडगाव तालुक्यात ३७.८० हेक्टरवर असे एकूण चार हजार ५३४.३० हेक्‍टरवर नुकसान झाले आहे.

सर्वाधिक फटका मक्याला

पिकांमध्ये सर्वाधिक फटका मक्‍याला बसला असून सहा तालुक्यात १३९१.२०हेक्‍टरवरील मका नष्ट झाला आहे. त्याखालोखाल रब्बी ज्वारीचे १०५४.५० हेक्‍टरवर नुकसान झाले आहे. ६११.२० हेक्‍टर वरील गहू, ५१८.३० हेक्‍टर वरील फळपिके, २५५.४० हेक्‍टरवरील भाजीपाला, २३५ हेक्‍टर वरील केळी, २०९ हेक्‍टरवरील बाजरी, २०२.३० हेक्‍टरवरील हरभरा , ५०.९० हेक्‍टरवरील कांदा, ४.१० हेक्‍टरवरील तीळ, २.४० हेक्‍टरवरील मूग असा विविध पिकांना फटका बसला आहे.

११२ गावातील सहा हजार ६८९ शेतकरी बाधित

सहा तालुक्यांमधील ११२ गावातील एकूण सहा हजार ६८९ शेतकऱ्यांचे या अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. हे सर्व नुकसान ३३ टक्क्यांच्या वर असून तसा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे.