शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

श्रीक्षेत्र कनाशी येथे ‘दाढ’ विशेष दर्शन व यात्रोत्सव निर्बंधांमुळे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:12 IST

कजगाव, ता. भडगाव : येथून जवळच असलेले श्रीक्षेत्र कनाशी येथे गुरुपौर्णिमेस ‘दाढ’ विशेषाच्या दर्शन सोहळ्यानिमित्त भाविकांना ‘दाढ’ दर्शनास ...

कजगाव, ता. भडगाव : येथून जवळच असलेले श्रीक्षेत्र कनाशी येथे गुरुपौर्णिमेस ‘दाढ’ विशेषाच्या दर्शन सोहळ्यानिमित्त भाविकांना ‘दाढ’ दर्शनास ठेवण्यात येत असते. ही यात्रा २३ व २४ जुलैला होती. मात्र, कडक निर्बंधांमुळे राज्यातील सर्व मंदिरे बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे येथील मंदिरदेखील बंद राहणार असून, गुरुपौर्णिमा, दाढ विशेष व यात्रोत्सव हे सारेच बंद करण्यात आले आहे. तसे पत्र कनाशी-देव्हारीच्या सरपंच लीलाबाई पाटील, मनीषा पाटील यांनी भडगावचे पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांना दिले आहे. यामुळे हजारो भाविकांना लागोपाठ दुसऱ्या वर्षी दर्शनापासून वंचित राहावे लागणार आहे. दरवर्षी येथे दर्शनासाठी देशविदेशातून पन्नास हजारांच्या वर भाविक येतात.

या ‘दाढ’ विशेषाची आख्यायिका अशी आहे की, बाराव्या शतकात पूर्ण परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी जीर्णोद्धारासाठी अवतार धारण केला. ते कलियुगातील श्रीकृष्णाचेच अवतार मानले जातात. श्री चक्रधर स्वामींचा जन्म गुजरातमध्ये झाला असला तरी त्यांनी महाराष्ट्र हीच आपली कर्मभूमी मानून आपल्या परिश्रमाने महाराष्ट्राला धर्मभूमीचे व मराठी भाषेला धर्मभाषेचे स्थान त्यांनी प्राप्त करून दिले. या थोर अवतारी युग पुरुषाने पायी भ्रमण करून शांती, समता, सहिष्णुता व मानवतेची शिकवण दिली.

गोदावरी परिसरातून स्वामींचे कनाशी येथे आगमन झाले. गावातील ब्राह्मणाच्या विनंतीवरून स्वामी त्यांच्या घरी गेले. ब्राह्मणाने मनापासून स्वामींची सेवा केली. सेवेमुळे प्रसन्न होऊन स्वामींनी त्यांना संतती, संपती व ऐश्वर्य संपन्नतेचा वर दिला. त्यामुळे आजही येथे येणारे व जाणारे भाविक श्रद्धेने नतमस्तक होऊन आपल्या मनातील इच्छा पूर्ण करतात.

एकदा चक्रधर स्वामींचे गुरू परब्रह्म परमेश्वर अवतार श्री गोविंद प्रभूंनी वार्धक्य अवस्थेत हलणारी दाढ हाताने काढली व समोर बसलेल्या येल्हाईसा ऊर्फ साधा या साध्याभोळ्या साध्वीला ‘घे मेली घे ना’ आपल्या नेहमीच्या शैलीत बोलून प्रसन्नतेने दिली. श्री नागोव्यास खामनीकर या सिद्ध पुरुषांची कवीश्वर कुलाचार्यपदी नियुक्ती झाल्यानंतर दाढेचा विशेष त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला, तेव्हापासून श्री खामणीकर पिढीमध्ये दाढेचा विशेष आला आहे. त्यामुळे भाविकांची नेहमीच गर्दी होत असते. पूर्वीपासून येथे अनेक साधू-संतांचे वास्तव्य आहे. प्रामुख्याने कवीश्वर कुलाचार्य प. पू. प. म. श्री. खामनीकर बाबांचा अग्रक्रमाने उल्लेख करावा लागेल. त्यांच्या दर्शनाने मन:शांती लाभते. मनोकामना पूर्ण होतात, असा भाविकांचा आजही विश्वास आहे. त्यामुळे महानुभाव परंपरेत या दाढ विशेषाचे फार महत्त्व आहे.

कडक निर्बंधांमुळे मंदिर बंद

कोरोना विषाणूमुळे संपूर्ण राज्यातील मंदिरे बंद करण्यात आली आहेत. यामुळे श्रीक्षेत्र कनाशी येथील मंदिरदेखील बंद आहे. या तीर्थस्थळी गुरुपौर्णिमेच्या ‘दाढ’ विशेषाला भाविकांची मोठी गर्दी असते. मात्र, गेल्या मार्च २०२० पासून मंदिर बंद असल्याने भाविक दर्शनासाठी आतुर झाले आहेत.

180721\18jal_8_18072021_12.jpg

सन २०१९ मध्ये गुरुपौर्णिमेस दर्शना साठी झालेली भाविकांची गर्दी