शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

दाभोळकर, पानसरे हत्येत भिडे-एकबोटेंचा हात असण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 22:46 IST

प्रा.जोगेंद्र कवाडे यांचा पत्रपरिषदेत आरोप

ठळक मुद्दे न्यायालयीन चौकशीपूर्वीच क्लिनचीट कशी? एका यंत्रणेद्वारे आरक्षणाबाबत विष पेरण्याचे काम सत्ताधाऱ्यांमुळेच कायदा-सुव्यवस्था धोक्यात

जळगाव : नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येमागे संभाजी भिडे गुरूजी, मिलिंद एकबोटे यांचा हात असावा, या दिशेने तपास झाला पाहिजे, असा खळबळजनक आरोप पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्टÑीय अध्यक्ष आमदार प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी बुधवार, १८ एप्रिल रोजी अजिंठा विश्रामगृहावर आयोजित पत्रपरिषदेत केला.यावेळी पक्षाचे गुजराथ महामंत्री सुरेश सोनवणे, दलित मुक्ती सेनेचे उत्तर महाराष्टÑ प्रमुख राजू मोरे, जळगाव शहर प्रमुख नारायण सपकाळे, रिपब्लिकन युथ फोर्सचे कल्पेश मोरे, अजिंठा हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष बाबूराव वाघ उपस्थित होते.सत्ताधाºयांमुळेच कायदा-सुव्यवस्था धोक्यातप्रा.कवाडे म्हणाले की, आरएसएस प्रणित भाजपाचे केंद्रात व राज्यात सरकार आहे. त्यामुळे सगळीकडे असहिष्णुतेचे वातावरण निर्माण झाले आहे. केंद्र व राज्यातील सत्ताधाºयांमुळेच कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. सध्याच्या सरकारची वाटचाल धर्मनिरपेक्षतेकडून धर्मवादाकडे सुरू आहे. धर्मवादातून जातीय व धार्मिक उन्माद निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सत्ताधारी करीत आहेत. कोरेगाव-भीमा प्रकरण असो की, कथुआ, उन्नाव येथील बलात्काराचे प्रकरण असो, आरोपींच्या समर्थनार्थ मोर्चे निघतात हे भयावह आहे. संविधानाच्या मूलतत्वांना पायदळी तुडवले जात आहे. लोकशाहीसाठी हे अत्यंत घातक आहे.शेतकºयांच्या प्रश्नांबाबत शासनाला गांभीर्य नाहीशेतकºयांच्या प्रश्नांबाबत केंद्र व राज्य शासन गंभीर नसल्याचा आरोप करीत प्रा.कवाडे म्हणाले की, सातबारा कोरा करणे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले. मात्र एकही वचन पाळले नाही. राज्यातील ९८ लाख शेतकºयांवर ३१ हजार ५०० कोटींचे कर्ज आहे. मात्र त्यांना सरसकट कर्जमाफी करण्यास टाळाटाळ केली जात आहे. दुसरीकडे नीरव मोदी १३ हजार कोटींचे कर्ज बुडवून पळून गेला. भांडवलदारांना अब्जावधीचे कर्ज माफ केले जात असल्याची टीका केली.न्यायालयीन चौकशीपूर्वीच क्लिनचीट कशी?प्रा.कवाडे म्हणाले की, दरवर्षी १ जानेवारीला भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभला मानवंदना देण्यासाठी लाखो लोक येतात. ते स्वत: गेली ३७ वर्ष नियमितपणे तेथे जात आहेत. असे असताना याच वर्षी झालेला प्रकार हा पूर्वनियोजित आहे. पूर्वनियोजित कट रचून बौद्ध जनतेवर हल्ला केला. याचे मुख्य सूत्रधार एकबोटे व भिडे असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच मुख्यमंत्र्यांनी भीमा-कोरेगाव प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या समितीमार्फत चौकशी करूनच कारवाई केली जाईल, असे जाहीर केलेले असताना नंतर मात्र चौकशीला सुरूवात देखील झालेली नसतानाही विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी भिडे गुरूजींना क्लिनचीट कशी दिली? असा सवाल त्यांनी केला.आरोपींना पाठीशी घालण्यासाठी लक्ष वळविण्याचा प्रयत्नभीमा-कोरेगाव प्रकरणात आरोपी असलेले भिडे व एकबोटे हे पूर्वाश्रमीचे आरएसएसचे पूर्णवेळ प्रचारक आहेत. हल्ला झाला त्याची पूर्वतयारी अनेक दिवस सुरू होती. एल्गार परिषदेचा त्याच्याशी तसूभरही संबंध नाही. मात्र आपल्या मर्जीतील लोकांना वाचविण्यासाठी प्रकरणातून लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न कबीर कलामंचच्या कार्यकर्त्यांवर छापे टाकून केला जात असून, सूडाचे राजकारण सुरू असल्याचा आरोपही प्रा.कवाडे यांनी केला. मात्र जनआक्रोश उफाळून आल्याशिवाय रहात नाही. अशावेळी सत्ता उध्वस्त होतात, असेही ते म्हणाले.राज्यघटनेला आरएसएसचा विरोधप्रा.कवाडे म्हणाले की, राज्यघटना लागू झाली, तेव्हापासून आरएसएसचा या संविधानाला विरोध आहे. कारण देशातील उच्च विद्याविभूषीत अस्पृश्य विद्वानाने या घटनेची संहिता लिहिली, हेच त्यांना खटकते. देशात दलितांवरील अत्याचारात वाढ होत आहे. हा समाज असुरक्षित झाला आहे. असे असताना अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची अवस्था मात्र दात व नख नसलेल्या वाघासारखी करून टाकण्यात आली आहे. त्यामुळे दलितांवर अत्याचार करणाºयांना आयती संधी मिळाली आहे. दलित समाज याविरोधात एकत्र झाल्याचे पाहिल्यावर केंद्र सरकारने याबाबत पुनर्विचार अर्ज दाखल केला. मात्र त्यांना आधीच राष्टÑपतींच्या सहीने अध्यादेश काढून स्थगिती देता आली असती, असा आरोपही त्यांनी केला.आरक्षणाबाबत विष पेरण्याचे कामप्रा.कवाडे म्हणाले की, आरक्षणाबाबत अनेक गैरसमज आहेत. सामाजिक व शैक्षणिक हा आरक्षणाचा मूल आधार आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा चुकीचा आहे. कारण आरक्षण हे गरीबी हटविण्यासाठी नाही. तर देशाच्या निर्णय प्रक्रियेत सहभाग मिळावा, यासाठी आरक्षण आहे. सफाई कर्मचाºयांचे १०० टक्के आरक्षण अनुसुचित जाती-जमातीसाठी आहे. त्यात वाटा मागितला का? आरक्षणाबाबत पद्धतशीर विष पेरण्याचे काम एक यंत्रणा करते आहे. आरक्षण हटवायचे असेल तर आधी जातीप्रथा हटवा. संविधान हटावची भाषा करणारे लोक देशभक्त असूच शकत नाहीत, असा आरोप त्यांनी केला.धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळणारमागील निवडणुकीत भाजपाला केवळ ३० टक्के मते मिळूनही पूर्ण बहुमताने सत्तेत आला. कारण ७० टक्के धर्मनिरपेक्षमते विभागली गेली. ती चूक यावेळी सुधारण्यात येणार असून काँग्रेससोबत सर्व विरोधीपक्ष एकत्र येऊन हे मतविभाजन टाळतील. त्यात नेतृत्व कोण करणार? हा मुद्दा नाही. सामुहिक नेतृत्वही असू शकेल, असे सांगितले.अर्थव्यवस्था डळमळीतसध्या अनेक राज्यांमध्ये नोटांची टंचाई निर्माण झाली आहे. अशाप्रकारचा आर्थिक गोंधळ देशाने कधी पाहिला नव्हता. याची सुरूवात नोटबंदीने झाली. अर्थव्यवस्था डळमळीत झाली की काय? अशी स्थिती निर्माण झाल्याची टीका त्यांनी केली.