शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

सध्या रुग्ण संख्या जास्त, मात्र भविष्यातील संसर्गाला आळा - जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 23:37 IST

‘थ्री लेअर’ पद्धतीचा अमळनेरात यशस्वी प्रयोग

विजयकुमार सैतवालजळगाव : जिल्ह्यात कोरोनाची चाचणी करताना पॉझिटिव्ह रुग्ण व त्याच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करण्यासह पॉझिटिव्हचा संपर्क आलेल्या व्यक्तींच्याही संपर्कातील व्यक्तींची तपासणी हाती घेतल्याने अर्थात ‘थ्री लेअर’ पद्धतीचा अवलंब केल्याने आज रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. मात्र भविष्यात यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखता येणार आहे, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. विशेष म्हणजे ‘थ्री लेअर’ पद्धती अमळनेरात यशस्वी ठरल्याने व तेथील नागरिकांनी शिस्त पाळत सहकार्य केल्याने अमळनेर कोरोनामुक्त होऊ शकले, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पॉझिटिव्ह रुग्ण व संपर्कातील व्यक्तींची तपासणी केली जाते. मात्र जळगाव जिल्ह्यात प्रशासनाच्यावतीने त्याच्या पुढे पाऊल टाकत संपर्कातील व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांचीही तपासणी केली जात आहे व सध्या दररोज रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी वरील माहिती दिली.प्रश्न - एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत असताना अमळनेर कोरोनामुक्त कसे होऊ शकले?उत्तर - पॉझिटिव्ह रुग्ण व त्याच्या संपर्कातील व्यक्तींचीच तपासणी न करता तीन टप्प्यांमध्ये तपासणी हाती घेण्यात आली. संपर्कातील व्यक्ती अजून इतरांनाही भेटलेली असते. त्यामुळे त्यांचीही तपासणी झाल्यास संसर्गाला आळा बसणे शक्य होते. अमळनेरात हे यशस्वी ठरले. तसेच अमळनेरकर जनतेने प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिस्तीचे पालन केले. कोरोनाला रोखण्यासाठी जनतेचे सहकार्य महत्त्वाचे असून अमळनेरात हे सहकार्य मिळाल्याने तेथे कोरोनाला आळा बसला.प्रश्न - जळगाव, भुसावळात अमळनेर पॅटर्न शक्य होत आहे का?उत्तर - हो नक्कीच. अमळनेर येथे ही पद्धत अवलंबिल्याने तेथे संसर्ग थांबला. दोन आठवड्यात तेथे सकारात्मक परिणाम समोर आले. हीच पद्धत जळगाव, भुसावळ येथे राबवित आहे. त्यामुळे या ठिकाणी रुग्ण जास्त समोर येत आहे. मात्र भविष्यात या दोन्ही ठिकाणीही फैलाव रोखता येणार आहे.प्रश्न- मृत्यू दर कमी करण्यासाठी काय करता येऊ शकते?उत्तर- आपल्याकडे मृत्यू दर जास्त आहे, याला कारण म्हणजे नागरिक आजारी पडले तरी दवाखान्यात जात नाहीये. केवळ कोरोनाच नाही तर इतर व्याधींमुळेही मृत्यू होत आहे. नागरिकांनी काळजी घेत वेळीच दवाखान्यात गेले तर मृत्यू रोखता येऊ शकतात.दुहेरी मानसिकतेचे दर्शनजिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मृत्यू सारख्या घटनेत दुहेरी मानसिकतेचे दर्शन घडत आहे. एकीकडे कोरोनामुळे मृत्यू झाल्यास नातेवाईक मृतदेह ताब्यात घेत नाही तर दुसरीकडे अंत्ययात्रेला गर्दी होते. अमळनेर येथील एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर कोणी मृतदेह ताब्यात घेतला नाही म्हणून प्रशासनाच्यावतीने जळगावातच दफनविधी करण्यात आला. मात्र अमळनेर, भडगाव व इतर ठिकाणी अंत्ययात्रेला गर्दी केल्याने किती मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढला, हेदेखील समोर आले. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेत गर्दी टाळावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी केले.जिल्हाभरात सुविधाजिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना विषाणू संसर्ग तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली. तसेच रुग्णांचे जिल्ह्याच्या ठिकाणी येणे टाळून त्यांना जवळच सुविधा मिळाव्यात म्हणून जिल्ह्यात ठिकठिकाणी कोव्हीड सेंटर उभारण्यात आले. धरणगाव व चोपडा येथील रुग्णालयासह जिल्ह्यातील इतर उपजिल्हा रुग्णालयातील सुविधांसाठी कोट्यवधी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहे. भुसावळ येथील ट्रामा केअर सेंटर व चाळीसगाव येथील रुग्णालय लवकरच सुरू होणार आहे.तपासणी वाढविल्याने रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. मात्र या उपाययोजनांमुळे कोरोनाला थोपविता येणे शक्य होणार आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करीत प्रशासनाला सहकार्य केले तर आपण सर्व मिळून कोरोनावर हमखास मात करू शकू.- डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी.

टॅग्स :Jalgaonजळगाव