शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
3
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
4
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
5
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
6
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
7
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
8
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
9
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
10
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
11
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
12
Mangal Gochar 2026: ११ मे ते २१ जून 'या' तीन राशींसाठी सुवर्णकाळ; मंगळ देणार प्रगतीची मोठी संधी!
13
अरे देवा! मुलीचं मोबाईलचं व्यसन सोडवण्यासाठी आई-वडिलांनी ६५ हजार देऊन ठेवले ४ बाऊन्सर
14
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
15
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
16
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
17
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
18
८ महिन्याची गर्भवती, घरोघरी जात केला प्रचार; चक्कर येऊन पडली तरी हिंमत हरली नाही; आज बनली आमदार
19
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
20
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावला वीज ग्राहक मेळाव्यात तक्रारींचा 'करंट'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 00:22 IST

आमदारांचा निर्धार : वीज आणि पाण्यासाठी करणार मंत्रालयासमोर आंदोलन

चाळीसगाव : आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून गुरुवारी दुपारी राजपूत लोकमंगल कार्यालयात झालेल्या वीज ग्राहकांच्या मेळाव्यात तक्रारींचा पाऊस पडला. अ.भा. ग्राहक पंचायत आणि वीज वितरण कंपनीच्या संयुक्त विद्यमाने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शेतक-यांना शेतीसाठी पाणी आणि वीज मिळावी. यासाठी आपण कटिबद्ध आहोत. सद्य:स्थितीत तालुक्यात पाण्याची उपलब्धता चांगली असली तरी शासनाने वीज कनेक्शन खंडीत केल्याने बळीराजा चिंतातूर आहे. शेतक-यांसाठी प्रसंगी मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या मनोगतात दिला. मेळाव्याला वीज ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिका-यांसमोरच ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यात आले.मेळाव्याला वसंतराव चंदात्रे, कार्यकारी अभियंता संदीप शेंडगे, के बी साळुंखे, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा सुनील निकम, पं. स. गटनेते संजय भास्करराव पाटील, जि प सदस्य भाऊसाहेब जाधव, दिनेश बोरसे, सुभाष पाटील, पियुष साळुंखे, ग्राहक पंचायत अध्यक्ष रमेश सोनवणे, रावसाहेब पाटील, नगरसेविका संगीता गवळी, राजेंद्र चौधरी, भास्कर पाटील, मानसिंग राजपूत, नितीन पाटील, डॉ. अर्चना पाटील, बाळासाहेब राऊत, किसनराव जोर्वेकर, रविंद्र केदारसिंग पाटील, धनंजय मांडोळे, विवेक चौधरी, अनिल नागरे, वीज वितरण कंपनीचे अभियंता जि टी महाजन, एच ए जगताप, ए बी गढरी, व्ही व्ही बाविस्कर, जि एस जनोकर, जे बी सूर्यवंशी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक रमेश सोनवणे यांनी केले.यावेळी पुढे बोलतांना आमदार चव्हाण यांनी शासनाच्या चुकीच्या धोरणावर बोट ठेवले. ते म्हणाले, ज्यांच्या कडे वीज आहे त्यांना रात्रीची वीज मिळत असल्याने शेतक?्यांचे अतोनात हाल होत आहेत. शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे जर सर्वसामान्यांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागणार आहेत सरकारने शेतक?्यांना वीज कनेक्शन उपलब्ध न केल्यास थेट मंत्रालयासमोरच एल्गार करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

मेळाव्याचे उद्घाटन झाल्यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी कार्यकारी अभियंता यांच्यासोबत बसून ग्राहकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्या सोडविण्याच्या योग्य सुचना देखील अधिका-यांना केल्या. यामुळे मेळाव्याला जनता दरबाराचे स्वरुप आल्याचे पहावयास मिळाले.ग्राहकांची समस्या सोडविणे सोयीचे व्हावे म्हणून शहर व तालुक्यातील वीज कंपनीच्या १६ उपविभाग प्रमाणे अधिका?्यांचे टेबल लावण्यात आले होते. त्यात कोणत्या उपविभागात कोणती गावे समाविष्ट आहेत. याचे फ्लेक्स लावले होते. त्यामुळे विशेषत: ग्रामीण भागातील ग्राहकांची मोठी सोय होत होती. तसेच ग्राहकांसाठी आमदार मंगेश चव्हाण यांच्यामार्फत चहा व नाश्त्याची सोय करण्यात आली होती. ६६ तक्रारी, १० तक्रारींचा जागेवरच निपटारामेळाव्यात ६६ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यातील १० तक्रारी तत्काळ सोडविण्यात आल्यात तर १७ तक्रारी या येत्या ३ दिवसात सोडविण्यात येतील. १३ तक्रारी येत्या ७ दिवसात सोडविल्या जाणार आहेत. उर्वरित १७ तक्रारी या शासकीय धोरणाशी सबंधित असअसल्याची माहिती कार्यकारी अभियंता संदीप शेंडगे यांनी दिली. सूत्रसंचालन धनंजय मांडोळे यांनी केले.