शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

भाजप बंडखोरांच्या प्रभावाविषयी उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 20:34 IST

निष्ठावंतांवरील अन्यायाला नंदुरबारात पुन्हा एकदा फोडली वाचा ; अनिल गोटे ताकद पुन्हा अजमावतायत, बंडखोरी शमविण्यात यश न आल्याने आता विजयासाठी ‘संकटमोचका’च्या नेतृत्वाची कसोटी

मिलिंद कुलकर्णीजळगाव : उत्तर महाराष्टÑातील भाजप-शिवसेनेच्या ८ जागा निवडून येतील, असा दावा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केल्याने त्यांच्याकडे ही जबाबदारी असल्याचे स्पष्ट झाले. धुळ्यातील अनिल गोटे यांची बंडखोरी अपेक्षित होती. परंतु, नंदुरबारच्या डॉ.नटावदकर यांच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याची बंडखोरी अनपेक्षित आणि संवादाच्या अभावामुळे झाली आहे. आता या बंडखोरीचा त्रास भाजपला कितपत होतो, विजयाचे गणित त्यावर अवलंबून राहते काय, याची उत्सुकता आहे.लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात खान्देशातील उर्वरित दोन म्हणजे धुळे, नंदुरबार मतदारसंघात सोमवारी मतदान होत आहे. एक केंद्रीय राज्यमंत्री, एक विद्यमान खासदार आणि तीन आमदारांचे भवितव्य या निवडणुकीत ठरणार आहे. जिल्हानिर्मितीपूर्वी नंदुरबार हा धुळे जिल्ह्याचा भाग होता. आता लोकसभा मतदारसंघातही धुळे जिल्ह्यातील साक्री व शिरपूर हे आदिवासी बहुल विधानसभा मतदारसंघ जोडलेले आहेत. धुळ्याला नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य आणि बागलाण असे तीन विधानसभा मतदारसंघ जोडलेले आहे. अहिराणी पट्टा अशी या मतदारसंघाची ओळख म्हणता येईल.नंदुरबारात गेल्या निवडणुकीत भाजपचा पहिल्यांदा खासदार निवडून आला. त्यामुळे डॉ.हीना गावीत यांना दुसऱ्यांदा उमेदवारी अपेक्षित होती. त्याप्रमाणे ती मिळाली. मात्र निष्ठावंत कार्यकर्ते डॉ.सुहास नटावदकर यांनी बंडखोरी केली. त्यांना गेल्यावेळी दिलेले आश्वासन पक्षश्रेष्ठींनी पाळले नाही, असे सांगितले जाते. त्यांचा अर्ज भरताना भाजपतर्फे चारवेळा ही निवडणूक लढविलेले कुवरसिंग वळवी, भाजपतर्फे आमदार म्हणून निवडून गेलेले डॉ.नरेंद्र पाडवी हे उपस्थित होते. स्वत: डॉ.नटावदकर यांनी २००४ व २००९ मध्ये भाजपतर्फे निवडणूक लढवली होती. त्यामुळे पक्षाचे मातब्बर नेते हे नटावदकर यांच्याबाजूने उभे असल्याचा संदेश त्यातून गेला. डॉ.हीना गावीत या भाजपच्या जिल्हाध्यक्षदेखील आहेत. त्यांचे भाजपचे दुसरे आमदार उदेसिंग पाडवी यांच्यासह निष्ठावंतांशी चार वर्षात त्यांचे फारसे जमले नाही. कार्यकारिणीला स्थगितीसारखे प्रकार घडले. मूळ राष्टÑवादीतून आलेल्या नेते, कार्यकर्त्यांना भाजपमध्ये महत्व दिले जात असल्याची निष्ठावंतांची तक्रार होती. हे मतभेद संपविण्यात तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन, विद्यमान पालकमंत्री जयकुमार रावल आणि पक्षश्रेष्ठी यांना यश आलेले नाही, हेच बंडखोरीमुळे दिसून आले. काँग्रेसमध्ये बंडाचे वारे होते, पण भरत गावीत यांची पक्ष प्रभारी मल्लिकार्जून खरगे यांनी समजूत घातली.धुळयात अनिल गोटे हे महापालिका निवडणुकीपासून भाजपपासून दूर गेले होते. तेव्हा दिलेला आमदारकीचा राजीनामा रोखला गेला, पण यावेळी भाजपने त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केले. महापालिका निवडणुकीत गोटेंना आलेले अपयश पाहता त्यांची बंडखोरी दखलपात्र नसल्याचे भाजपने मानलेले दिसते. तात्विक मुद्यापेक्षा ते वैयक्तिक टीकाटिपण्णी अधिक करीत आहेत.उमेदवारापेक्षा पक्षाकडे पाहून मतदान करा, असा संदेश पक्षाकडून नेहमी दिला जात असतो. नटावदकर आणि गोटे यांच्या समर्थकांना असे मनविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यात कितपत यश मिळते, ते २३ मे रोजी कळेल.दिलवरसिंग पाडवी, कुवरसिंग वळवी, डॉ.नरेंद्र पाडवी, डॉ.कांतीलाल टाटीया, डॉ.सुहास नटावदकर अशी मोजकी मंडळी म्हणजे जनसंघ, भाजप अशी ओळख होती. दिलवरसिंग पाडवी हे राज्याच्या मंत्रिमंडळात होते. डॉ.नरेंद्र पाडवी हे विधानसभेत निवडून गेले होते. लोकसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार एक ते दोन लाखापर्यंतची मते मिळवित असतो, हा इतिहास आहे. विस्तारवादी भूमिकेतून भाजपने डॉ.हीना गावीत यांना २०१४ मध्ये तिकीट दिले. आणि भाजपच्या पहिल्या खासदार म्हणून त्या निवडून आल्या. पूर्वी नरेंद्र पाडवी यांनी बंड पुकारले, आता नटावदकरांनी पुकारले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव