खेतिया : किरकोळ कारणावरून दोन गटात झालेल्या मारहाणीमुळे खेतियात तणाव निर्माण झाला आहे. बुधवारी व्यापा:यांनी आपली दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवल्यामुळे शहरात संचारबंदीसदृश स्थिती निर्माण झाली आहे. बडवाणीचे पोलीस अधीक्षक घटनास्थळी तळ ठोकून असून वाढीव पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. दरम्यान, परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या असून दोन्ही गटातील आठ ते दहा जणांना अटक करण्यात आली आहे. महिलेला ईल शेरेबाजी करण्याच्या वादातून हा प्रकार उद्भवल्याचे सांगितले जात आहे. 3 नोव्हेंबर रोजी सादिक युनूस व गोपाळ बागुल यांच्यात महिलेची छेड काढण्यावरून वाद झाला. त्या वादाचे पर्यवसान एकमेकांच्या घरात जाऊन मारहाण करणे, घरातील सामानाचे नुकसान करण्यार्पयत झाले. यासंदर्भात शहरात विविध अफवा उठल्या. अनेक ठिकाणी पळापळ झाली. त्यानंतर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. परंतु 4 नोव्हेंबर रोजी तणावात पुन्हा भर पडली. त्यामुळे व्यापा:यांनी आपली दुकाने बंद ठेवली. नागरिकांनीही बाहेर निघणे टाळले. परिणामी शहरात संचारबंदीसदृश परिस्थिती निर्माण झाली. अफवांचे पीक कायम राहिल्याने तणावात वाढच होत राहिली. पोलीस ठाण्याच्या तपासणीसाठी आलेले इंदूरचे डीआयजी दीपक आर्य खेतियातच असल्याने त्यांनी तातडीने वाढीव पोलीस बंदोबस्त मागविला. बडवाणीचे पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बहुगुणा, सेंधवाचे डीवायएसपी बघेल हे खेतियात तळ ठोकून आहेत. शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. तणावपूर्ण शांतता असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. याबाबत खेतिया पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. सादीक, पिता युनूस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोपाळ बागुल, अल्केश बागुल, जयदेव बागुल, प्रवीण बागुल, प्रल्हाद बागुल, भैया कोळी, श्रीराम बागुल, जितू कोळी, युवराज बागुल आदींसह इतर 10 ते 15 जणांविरुद्ध दंगलीसह इतर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी फिर्याद गोपाल अजरुन बागुल यांनी दिली. त्यावरून आरिफ, पिता सलीम, सादीक युनूस तेली, सद्दाम युनूस तेली, शरीफ सलीम, इम्रान कलीम, अझहरूद्दीन सलीम, आसिफ कलीम, वसीम कलीम, कलीम सुभान यांच्यासह जमावाविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही बाजूच्या जमावाने घरात घुसून तोडफोड केली. शिवीगाळ, महिलांना ईल शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी आठ ते दहा जणांना ताब्यात घेतले आहे. इतर फरारी आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथक पाठविण्यात आले आहे. शहरवासीयांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी पोलिसांनी पथसंचलन देखील केले.
खेतियात संचारबंदीसदृश स्थिती
By admin | Updated: November 5, 2015 00:07 IST