शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

हा तर प्रवाशांच्या सहनशिलतेचा कळस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 22:03 IST

पॅसेंजर रेल्वे रद्द

सचिन देवजळगाव : खान्देशातील प्रवाशांच्या जीवनवाहिनी असणाऱ्या मुंबई-भुसावळ, भुसावळ-सुरत, भुसावळ-नाशिक व भुसावळ -नागपूर या पॅसेंजर रेल्वे प्रशासनाने भादली-भुसावळ दरम्यान असलेल्या तिस-या लाईनच्या तांत्रीक कामासाठी रद्द केल्या आहेत. सुरुवातीला दीड महिना रद्द केल्यानंतर, पुन्हा २३ दिवस मुदत वाढविल्यामुळे प्रवाशांमधुन रेल्वे प्रशासनाविरोधात संतप्त भावना व्यक्त करण्यात येत आहेत. रेल्वे प्रशाासनातर्फे आहे त्याच गाड्या वेळेवर सोडण्यात येत नसून,त्यात कुठल्याही तांत्रीक कामासाठी पॅसेंजरच रद्द करण्यात येत आहेत. मुंबईतील प्रवाशांप्रमाणे येथील प्रवासी कधी रेल रोको करत नसल्यामुळे, रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सहनशिलतेचा अंत पाहत आहे.. असा प्रश्न प्रवासी वर्गातुन उपस्थित होत आहे.जळगाव हे जिल्ह्याचे केंद्र असल्याने, दररोज हजारो प्रवासी कामानिमित्त जळगावला येत असतात. यामध्ये नोकरदार वर्ग व विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. खाजगी प्रवाशी गाड्यांना दुप्पट भाडे असल्यामुळे, बहुतांश प्रवासी रेल्वेच प्रवास करण्याला प्राधान्य देत असतात.मात्र, अलीकडे गेल्या सहा महिन्यांपासून रेल्वे प्रशासनाने विविध तांत्रीक कामासांठी इतर एक्सप्रेस गाड्या रद्द न करता, पँसेजरच रद्द करत आहेत. गेल्या वर्षी आॅक्टोंबर महिन्यापासून दर महिन्याला कधी आठ दिवस तर कधी पंधरा दिवस पॅसेंजर बंद ठेवण्यात येत आहे. यामुळे प्रवाशांना विशेषत: महिला प्रवाशांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. फेब्रुवारी महिन्यात तर रेल्वे प्रवाशाने प्रवाशांच्या सहनशिलतेचा ‘अंतच’ बघितला. १५ फेब्रुवारी ते तब्बल ३१ मार्च पर्यंत पाच पॅसेंजर रद्द केल्या होत्या. या पॅसेंजर १ एप्रिलपासुन सुरु करण्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले होते. मात्र, या गाड्या सुरु न करता, पुन्हा २३ एप्रिलपर्यंत मुदत वाढ दिली आहे.तर प्रवाशांनी आक्रमण भुमीका का घेऊ नये..दोन दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासनाने तिसºया लाईनच्या कामासाठी महाराष्ट्र, काशी व हुतात्मा एक्सप्रेस ६ एप्रिल ते १८ एप्रिल दरम्यान रद्द केल्या होत्या. आधीच पॅसेंजर रद्द आणि त्यांत एक्सप्रेसही रद्द केल्यामुळे नाशिकपासुन ते अमरावतीपर्यंत सर्व संघटना आक्रमक झाल्या होत्या. डीआरएम आर. के. यादवांकडे असंख्य तक्रारी गेल्याने, वरिष्ठ स्तरावरुन सायंकाळी हा निर्णय मागे घेण्यात आला. जर मुंबईत लोकल उशिरा आली तर मुंबईकर ज्या प्रमाणे आक्रमक भुमीका घेतात, त्याच प्रमाणे आता खान्देशातील प्रवाशानींही कायदेशिर मार्गाने आक्रमक भुमीका घेणे गरजेचे आहे..

टॅग्स :Jalgaonजळगाव