शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

हा तर प्रवाशांच्या सहनशिलतेचा कळस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 22:03 IST

पॅसेंजर रेल्वे रद्द

सचिन देवजळगाव : खान्देशातील प्रवाशांच्या जीवनवाहिनी असणाऱ्या मुंबई-भुसावळ, भुसावळ-सुरत, भुसावळ-नाशिक व भुसावळ -नागपूर या पॅसेंजर रेल्वे प्रशासनाने भादली-भुसावळ दरम्यान असलेल्या तिस-या लाईनच्या तांत्रीक कामासाठी रद्द केल्या आहेत. सुरुवातीला दीड महिना रद्द केल्यानंतर, पुन्हा २३ दिवस मुदत वाढविल्यामुळे प्रवाशांमधुन रेल्वे प्रशासनाविरोधात संतप्त भावना व्यक्त करण्यात येत आहेत. रेल्वे प्रशाासनातर्फे आहे त्याच गाड्या वेळेवर सोडण्यात येत नसून,त्यात कुठल्याही तांत्रीक कामासाठी पॅसेंजरच रद्द करण्यात येत आहेत. मुंबईतील प्रवाशांप्रमाणे येथील प्रवासी कधी रेल रोको करत नसल्यामुळे, रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सहनशिलतेचा अंत पाहत आहे.. असा प्रश्न प्रवासी वर्गातुन उपस्थित होत आहे.जळगाव हे जिल्ह्याचे केंद्र असल्याने, दररोज हजारो प्रवासी कामानिमित्त जळगावला येत असतात. यामध्ये नोकरदार वर्ग व विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. खाजगी प्रवाशी गाड्यांना दुप्पट भाडे असल्यामुळे, बहुतांश प्रवासी रेल्वेच प्रवास करण्याला प्राधान्य देत असतात.मात्र, अलीकडे गेल्या सहा महिन्यांपासून रेल्वे प्रशासनाने विविध तांत्रीक कामासांठी इतर एक्सप्रेस गाड्या रद्द न करता, पँसेजरच रद्द करत आहेत. गेल्या वर्षी आॅक्टोंबर महिन्यापासून दर महिन्याला कधी आठ दिवस तर कधी पंधरा दिवस पॅसेंजर बंद ठेवण्यात येत आहे. यामुळे प्रवाशांना विशेषत: महिला प्रवाशांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. फेब्रुवारी महिन्यात तर रेल्वे प्रवाशाने प्रवाशांच्या सहनशिलतेचा ‘अंतच’ बघितला. १५ फेब्रुवारी ते तब्बल ३१ मार्च पर्यंत पाच पॅसेंजर रद्द केल्या होत्या. या पॅसेंजर १ एप्रिलपासुन सुरु करण्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले होते. मात्र, या गाड्या सुरु न करता, पुन्हा २३ एप्रिलपर्यंत मुदत वाढ दिली आहे.तर प्रवाशांनी आक्रमण भुमीका का घेऊ नये..दोन दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासनाने तिसºया लाईनच्या कामासाठी महाराष्ट्र, काशी व हुतात्मा एक्सप्रेस ६ एप्रिल ते १८ एप्रिल दरम्यान रद्द केल्या होत्या. आधीच पॅसेंजर रद्द आणि त्यांत एक्सप्रेसही रद्द केल्यामुळे नाशिकपासुन ते अमरावतीपर्यंत सर्व संघटना आक्रमक झाल्या होत्या. डीआरएम आर. के. यादवांकडे असंख्य तक्रारी गेल्याने, वरिष्ठ स्तरावरुन सायंकाळी हा निर्णय मागे घेण्यात आला. जर मुंबईत लोकल उशिरा आली तर मुंबईकर ज्या प्रमाणे आक्रमक भुमीका घेतात, त्याच प्रमाणे आता खान्देशातील प्रवाशानींही कायदेशिर मार्गाने आक्रमक भुमीका घेणे गरजेचे आहे..

टॅग्स :Jalgaonजळगाव