शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

इच्छुकांची गर्दी, उमेदवार ठरेना

By admin | Updated: June 17, 2014 08:38 IST

विधानपरिषदेची पोटनिवडणूक लढविण्यासाठी खान्देश विकास आघाडी वगळता कुठल्याही पक्षाने उमेदवार जाहीर केलेला नाही.

 

जळगाव : विधानपरिषदेची पोटनिवडणूक लढविण्यासाठी खान्देश विकास आघाडी वगळता कुठल्याही पक्षाने उमेदवार जाहीर केलेला नाही. अर्थातच उमेदवारीसाठी अनेक इच्छुक आहेत, परंतु नेमकी उमेदवारी कुणाला द्यायची यावर भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खल सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मनीष जैन आणि भाजपातर्फे माजी आमदार डॉ.गुरुमुख जगवानी यांची नावे चर्चेत असतानाच या दोन्ही पक्षांमध्ये इतर नावेही पुढे येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जि.प.सदस्य मंगेश पाटील आणि संजय पवार यांनीदेखील निवडणूक लढविण्यासाठी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांकडे अर्ज दिला आहे. त्यासंदर्भात जिल्हाध्यक्ष गफ्फार मलिक यांनी पक्षाचे महासचिव यांच्याशी चर्चा केली आहे. पण पक्षाने जैन, पाटील व पवार यांच्यापैकी कुणाच्याही उमेदवारीची घोषणा अजूनही केलेली नाही, असे जिल्हाध्यक्ष गफ्फार मलिक म्हणाले. 
खाविआतर्फे नगरसेवक कैलास सोनवणे यांनी तयारी सुरू केली आहे. त्यांनी मतदारांची यादी ताब्यात घेऊन त्यादृष्टीने कामही सुरू केले आहे. 
डॉ.गुरुमुख जगवानी यांचे नाव पुढे असले तरी यानंतर गोविंद अग्रवाल, संजय जैन, माजी जि.प. सभापती पी.सी.पाटील, अनिल चौधरी यांनीदेखील पक्षाकडे निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. चौधरी हे लोकसभा निवडणुकीच्या वेळेस भाजपात दाखल झाले. त्यावेळेस भाजपाला त्यांची मदत झाली. आता पुढे विधानसभेची निवडणूक लढवायची आहे. यामुळे त्यांची कुठेतरी वर्णी लावावी लागेल, असा विचार भाजपातील श्रेष्ठींमध्ये आहे. त्यांच्यासाठी आमदार गिरीश महाजन यांचा आग्रह आहे. तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे डॉ.जगवानी यांच्यासाठीदेखील पक्षात पाठबळ लावले जात आहे. अर्थातच भाजपात दोन नेत्यांची दोन वेगवेगळी मते आहेत. 
भाजपाची जिल्हा बैठक होणार
यासंदर्भात भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, वेगवेगळ्य़ा नावांची चर्चा असली तरी अजून कुणाचेही नाव निश्‍चित केलेले नाही. येत्या एक दोन दिवसात भाजपाची जिल्हा बैठक होऊन त्यात दोन नावे निश्‍चित करून त्यासंबंधीची शिफारस राज्याच्या निवड समितीला केली जाईल.
आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ
विधानपरिषद निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने सूचना जारी केली आहे. त्यात नामनिर्देशनपत्र उमेदवार किंवा त्याच्या सूचकाला निवडणूक निर्णय अधिकारी रुबल अग्रवाल किंवा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी धनंजय निकम यांच्याकडे १७ पासून तर २४ तारखेपर्यंत सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त कुठल्याही दिवशी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी २५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी यांच्या कक्षात करण्यात येईल. उमेदवारी मागे घेण्यासाठी २७ जून ही तारीख असून, दुपारी ३ वाजेपर्यंत त्यासंबंधीची लेखी सूचना देता येईल. ११ जुलै रोजी सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान घेतले जाईल.