शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

कावळा : सृष्टीतील अन्नसाखळीचा एक भाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:13 IST

लेखक : शिल्पा गाडगीळ, पक्षीमित्र, जळगाव भारतातील विविध भाषांतील लोकसाहित्यातून अनेक पशू-पक्ष्यांचा संदर्भ मिळतो. त्यातीलच एक कावळा. ...

लेखक : शिल्पा गाडगीळ, पक्षीमित्र, जळगाव

भारतातील विविध भाषांतील लोकसाहित्यातून अनेक पशू-पक्ष्यांचा संदर्भ मिळतो. त्यातीलच एक कावळा. हा विविध भूमिकांत दिसून येतो. आपल्याकडे कावळ्याच्या दोन प्रजाती आढळतात. एक डोम कावळा (Large -billed Crow). निरीक्षणानुसार हा गाववेशीवर, स्मशान परिसर आणि तलावाकाठी दिसून येतो. भरवस्तीत हा दिसत नाही. याला अपवाद असू शकतो.

दुसरा जो सर्वदूर आढळतो तो कावळा (House Crow). हा मनुष्य वस्तीत राहणारा पक्षी. हा कावळा रानात सहसा दिसत नाही. तो

दिसला म्हणजे जवळपास कुठेतरी गाव, पाडा आहे, मनुष्यवस्ती आहे, असे खुशाल समजावे. हा पक्षी सर्वभक्षी आहे. जिवंत- मेलेले किडे, प्राणी, पक्षी, उष्टे- खरकटे सगळे खातो. छोटे- मोठे थवे करून राहणारा त्यामुळे याची संख्याही भरपूर आहे आणि आपल्या देशात सगळीकडेच हा कावळा आढळतो. या कावळ्याचे दिसणे, ओरडणे, त्याचा गलका, त्याची घरटे बांधण्याची पद्धत हे कुठला न्‌ कुठला तरी संदेश देतात, असा समज रूढ आहे. काही प्रमाणात कधी- कधी जुळतो, असे म्हणता येईल.

पितृपक्ष या काळात या पक्ष्याला घास देण्याची प्रथा आहे. कावळ्याला हा घास दिला म्हणजे आपल्या मृत आप्तांना तो पोहोचतो ही श्रद्धा आहे. ती वर्षानुवर्षे पाळली जाते. असा घास दिसला की, उपाशी कावळे झेपावतात व क्षणात घास पळवतात. खाऊन- खाऊन पोट भरले की, त्यांच्या फेऱ्या कमी होतात. आले तरी ते घासाला स्पर्श करीत नाहीत, की चोच लावीत नाहीत. मग आपली घालमेल सुरू होते. काही चुकले का? मग अनेक कबुल्या दिल्या जातात... हे करू... ते करू. चुकलो माफी असावी; पण घास खा.

आता मोठ्या शहरांमध्ये कावळे दिसत नाहीत. मग अशी दुकाने सुरू झाली. कावळ्याचे मानगूट पकडून त्याला बळजबरी खीर- वडे खायला लावायचे. तो घास आपले स्वर्गस्त आप्त स्वीकारतील का? व्रत, वैकल्ये, धार्मिक कार्य करताना पत्नी नसेल, तर पूजा करताना सुपारी ठेवतात, तसेच श्राद्धाच्या दिवशी कावळा नाही आला, तर दर्भाचा कावळा करून काकस्पर्श विधी पार पाडतात. मग नेहमीच असा दर्भाचा कावळा करावा, जिवंत कावळ्यांना कशासाठी त्रास द्यावा? या विधीसाठी आपल्या पूर्वजांनी कावळ्याचीच निवड करण्यामागे काय कारण असावे? यासंदर्भात असे एक कारण सांगितले जाते की, कावळे वड-पिंपळ या झाडांच्या बीज प्रसाराचे अनमोल काम करतात व पर्यावरणाला हातभार लावतात. हे ओळखून पितृपक्षात कावळ्यालाच घास घालायचा. हे पूर्णतः नाही पटले.

आपले पूर्वज द्रष्टे होतेच. त्यांनी सुरू केलेले अनेक सण-उत्सव आहेत, जे पर्यावरणाचे संरक्षण करणारे आहेत; पण बीज प्रसाराचे काम फक्त कावळेच करतात असे नाही. अनेक पक्षीच नाहीत, तर पशुपण आहेत बीजप्रसार करणारे. कडुनिंब, पिंपळ, वड याशिवाय अनेक वृक्षांच्या फळांच्या बिया या कठीण कवचाच्या असतात. अशी फळे- बिया जेव्हा पशू-पक्षी खातात तेव्हा त्याच्यावर त्यांच्या पोटात काहीतरी रासायनिक प्रक्रिया होऊन त्यांचे कठीण कवच मऊ होण्यास मदत होते. त्यांच्या विष्ठेतून बाहेर आलेल्या अशा बिया लवकर रुजतात. अनेक पक्षी त्यात धनेश (हॉर्न बिल)आहे, जो वड, पिंपळाची फळे आवडीने खातो. वटवाघूळसुद्धा बीज प्रसाराचे काम करतो. त्यामुळे कावळ्याला घास देण्याचा उद्देश बीज प्रसार आहे, पर्यावरणपूरक आहे. असा दावा पूर्वजांच्या माथी मारू नये. असे असताना घास मात्र कावळ्यालाच का? या बाबतीत निरीक्षण असे आहे की, कावळा हा बारा महिने आणि सर्व ऋतूंमध्ये हमखास आढळणारा, उपलब्ध असणारा आणि सर्वपरिचित असा पक्षी आहे. माणसाच्या अस्तित्वाला सरावलेला असल्याने तो न भिता जवळ येण्याची हिंमत करतो. शिवाय घास खाणारे अनेक पक्षी आहेत; पण चिमणीसारख्या लहान पक्ष्यांपेक्षा यांची भूक मोठी, थवा मोठा त्यामुळे त्यांना घास देत असावेत. आपल्याला कावळा जवळचा वाटला म्हणून पिंडाला काकस्पर्श महत्त्वाचा मानला गेला असावा. मानवी मनोव्यापार आणि पशू-पक्षी यांची सांगड काही ठिकाणी संयुक्तिक असेलही; पण कावळा हा सृष्टीतील अन्नसाखळीचा एक भाग, विशिष्ट परिसंस्थेशी निगडित एक सजीव म्हणून त्याच्याकडे बघायला हवे. मुळात हा आक्रमक असतोच. वेळ आली तर दुसऱ्याच्या चोचीतला घास पळवायलाही तो कमी करीत नाही. गायबगळ्याची जिवंत पिले घरट्यातून पळवून नेऊन त्यावर ताव मारणारे कावळे दरवर्षी दिसतात.

आपल्या संस्कृतीत कावळा महत्त्वाचा आहे. शुभ- अशुभ शकुनाची चाहूल देणारा. एकीकडे याची कावकाव पाहुणा येणार असे सांगते, तर कोलाहल मृत्यूचा संदेश देतो, असे म्हणतात. अनेक म्हणी- वाक्प्रचार याच्या नावावर आहेत. कावळा शिवला,

काकदृष्टी. अनेक गैरसमजही आहेत. यांनी बांधलेल्या घरट्याच्या उंचीवरून पर्जन्यमान कमी की जास्त, याचे अनुमान. पिंडाला कावळा शिवला नाही म्हणजे आत्मा अतृप्त राहतो वगैरे. कावळा काय किंवा अन्य पशू यांचे जीवनचक्र ठरावीक असते. दिवसभर अन्नाचा शोध, रात्री विश्रांती (निशाचर सोडून) माणसाच्या शुभ- अशुभाची त्यांना जाणीव नसते. माझे म्हणणे आहे की, प्रथा पाळायची; पण मूक जिवांना का त्रास? मूक प्राण्यांवर प्रेम करा, असे आपली संस्कृती सांगते, त्याचा आपल्याला का विसर पडतो? मूळ आशियाई असलेली ही जात आता जगभर पसरली आहे. ती जतन करण्याची गरज आहे. त्यांचा नैसर्गिक अधिवास, त्यांचे अन्न, त्यांचे प्रजनन बिनधोक व्हावे यासाठी प्रयत्न करायचे सोडून, जो दिसेल त्याला दावणीला बांधायचे, हे ब्रीद. प्रत्येक वेळी पूर्वजांनी सांगितले म्हणून ते योग्य, असा दाखला देतो. पूर्वजांनी बऱ्याच हितकारी गोष्टी सांगितल्या, त्यातल्या किती पाळतो? हाही एक प्रश्नच आहे.