शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

पिकांची झाली लाही लाही, विहिरीतही पाणी नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 15:39 IST

महिंदळे परिसरातील स्थिती बिकट: पाझर तलाव, केटीवेअर, नाले, विहिरी अजूनही कोरडेठाकच

महिंदळे, ता.भडगाव : अर्धा पावसाळ्यातच जिल्ह्यातील अनेक धरणे शंभर टक्के भरली आहेत. नदी काठावरच्या जनतेचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. जिल्ह्यातील नदी नाले खळाळून वाहत आहेत.  परंतु महिंदळे परिसर मात्र याला पूर्णपणे अपवाद ठरत आहे. पावसाच्या सुरुवातीपासून परिसरावर पावसाची अवकृपा झाली आहे. आजतागायत एकही दमदार पाऊस पडला नाही. त्यामुळे परिसरातील नाले अजून वाहिले नाहीत. परिणामी पाझर तलाव, केटीवेअर, विहिरी अजूनही कोरडे ठाक आहेत. त्यामुळे पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. पिकांची अवस्था पाहून शेतकरी हवालदिल झाले आहेत. पावसाची सुरुवातच परिसरात अडखळत झाली. शेतकºयांनी तुरळक  पावसाच्या भरवशावर पिकांची पेरणी केली. तुरळक पावसामुळे  पिकेही जोमदार होती. आता मात्र पिके मोठी झाल्यामुळे पिकांना दमदार पावसाची गरज आहे. पावसाने परिसरात गेल्या महिनाभरापासून डोळे वटारल्यामुळे पिकांनी पूर्ण माना टाकल्या आहेत. परिसरात एकही दमदार पाऊस नसल्यामुळे पिकांची पूर्ण वाढ खुंटली आहे. पाऊस नसल्यामुळे खते घरात पडून परिसरात अनेक शेतकºयांनी विहिरींच्या पाण्यावर ठिबक सिंचनाच्या माध्यमाने उन्हाळी कपाशी लागवड केली व काहींनी पावसाच्या पाण्यावर कपाशी, मका, ज्वारी, बाजरी, भेंडी, व कडधान्ये लागवड केली आहे. पिके आता मोठी झाल्यामुळे त्यांना दमदार पावसाची आवश्यकता आहे. पिकांना वेळेवर खते व पाणी मिळत नसल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. दमदार पाऊस येत नसल्यामुळे  खते घरातच पडून आहेत. श्रावण सरींनीही दाखवली पाठ  परिसरात श्रावण महिना अर्धा संपला तरी श्रावण सरी बरसल्या नाहीत. श्रावणात वातावरणात गारवा असतो परंतु सूर्यदेव कडक उन्हाच्या झळा ओकत आहे. पिकांची लाही लाही झाली आहे. परिणामी पिकांनी माना टाकल्या आहेत.