शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 23:38 IST

एरंडोल तालुक्यात अतिवृष्टी : चाळीसगावात गाय मृत्यूमुखी, गिरणा नदीला प्रथमच पूर, एरंडोल तालुक्यात बैल, वासराचा मृत्यू

ठळक मुद्देकाही गावांचा संपर्क तुटलाअग्नावती, भोकरबारी, बोरी, मन्याड या प्रकल्पांमध्ये शून्य साठाअधून-मधून पडतोय पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : जिल्ह्यात गेल्या २० दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने बुधवारी संध्याकाळपासून ते गुरुवारी सकाळपर्यंत जोरदार हजेरी लावल्याने केळी व कपाशीचे नुकसान झाले असून महसूल विभागाकडून पंचनामे सुरू करण्यात आले आहे. गेल्या २४ तासात विक्रमी ४४१.४ मि.मी.इतका एकूण पाऊस जिल्ह्यात झाला. एरंडोल तालुक्यात सर्वाधिक ७८ मि.मी. पाऊस झाला.चाळीसगाव तालुक्यात गाय तर एरंडोल तालुक्यात बैल व वासराचा या परतीच्या पावसामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, दमदार पावसामुळे यंदाच्या मोसमात प्रथमच गिरणा नदीला पूर आला असून दापोरा तसेच कांताई बंधारा ओसंडून वाहत आहे.एरंडोल तालुक्यात अतिवृष्टी झाली असून या तालुक्याची सरासरी शंभरीपर्यंत पोहचण्यास केवळ २.१ टक्के पावसाची गरज असल्याचेही चित्र आहे. तर धरणसाठ्यातही वाढ झाली आहे.बुधवार, २० सप्टेंबर संध्याकाळपासून परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली व तो अधून-मधून सकाळपर्यंत सुरूच होता. यंदाच्या मोसमात गिरणा नदीला पहिल्यांदा पूर आल्याने सर्वांना दिलासा मिळाला आहे.पिकांचे नुकसानजिल्ह्यात या परतीच्या पावसाने केळी, कपाशी पिकाचे नुकसान केले असून त्याचे महसूल विभागाकडून पंचनामे करण्यात येत आहे. हे पंचनामे पूर्ण झालेले नसल्याने नुकसानीचा आकडा समजू शकला नाही. एरंडोल तालुक्यात सर्वाधिक ७८ मि.मी. पाऊस झाला तर सर्वात कमी ९.२ मि.मी. पाऊस पारोळा तालुक्यात झाला.चार प्रकल्पांमध्ये शून्य टक्के जलसाठाजिल्ह्यातील मोठ्या जलसाठ्यांमध्ये वाढ झाली असली तरी चार प्रकल्पांमध्ये शून्य टक्के जलसाठा आहे. हतनूर धरणात ८१.१८, गिरणा धरणात ६४.३३ तर वाघूर धरणात ६९.३१ टक्के जलसाठा आहे. अग्नावती, भोकरबारी, बोरी, मन्याड या प्रकल्पांमध्ये शून्य टक्के जलसाठा आहे. गेल्या आठवड्यात शून्य टक्के असलेल्या हिवरा, बहुळा प्रकल्पामध्ये अनुक्रमे १६.३१ व ३.७९ टक्के जलसाठा झाला आहे. अंजनी प्रकल्पातील साठा केवळ ४.२८ टक्केच आहे.धुळ्यात अर्ज भरणाºयांवर पाऊसशिरपूर तालुक्यात बुधवारी रात्री जोरदार पाऊस झाला. एकाच दिवसात ६६ मि.मी. पावसाची नोंद झाली. शिरपुरात रात्री साडेआठ वाजेपासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले होते़ तहसील कार्यालयासमोरही पाणी साचले़ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरणाºयांनी तोबा गर्दी केली होती़ पाणी साचल्यामुळे इच्छुक उमेदवारांना ये-जा करण्यासाठी त्रास सहन करावा लागला़नंदुरबार चारशे हेक्टरचे नुकसानजिल्ह्यात तळोदा, शहादा आणि नंदुरबार तालुक्यातील काही भागात ऊस व मका पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. साधारणत: साडेतीनशे ते चारशे हेक्टवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.धडगाव तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे तर नंदुरबार व तळोदा तालुकादेखील सरासरीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील चार मध्यम व ३७ लघु प्रकल्पांमध्ये सरासरी ७० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा झाला आहे.गावांचा संपर्क तुटलागिरणा नदी दुथडी भरून वाहू लागल्याने दापोरी, रवंजा, खर्ची या परिसरातून जळगावला येण्यासाठी सोयीचा असलेला मार्ग बंद झाल्याने या गावांचा संपर्क तुटला.रावेर तालुक्यात संततधाररावेर शहरासह तालुक्यात बुधवारी रात्री पासून सुरू असलेल्या पावसाची संततधार गुरुवारी सुरू होती. दरम्यान ४४. ४२ मि.मी. पाऊस झाला. आता ८९.७८ टक्के पर्जन्यमान गाठले आहे. सुकी धरण ९६.६४ टक्के भरले आहे. ०.९४ मिटरचा अनुशेष बाकी आहे. आभोडा ८५.४२ टक्के भरले. ते ०.८० मीटरने खाली आहे. दोन्ही धरणे भरण्यासाठी दमदार पावसाची गरज आहे. गुरुवारी पहाटेपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने कमी अधिक जोराने हजेरी लावली आहे.यावलला ५० लाखांचे नुकसानतालुक्यात बुधवारी सांयकाळी झालेल्या एक तास वादळी पावसाने यावल शहरासह तालुक्यातील निमगाव येथील सुमारे १ हजार हेक्टर शेतीतील ज्वारी, कपाशी, मका, व केळी पिकाचे सुमारे ५० लाखांचे नुकसान झाले आहे. नुकसान ग्रस्त भागात पंचनामे करण्यास सुरवात झाली आहे. येथे एका तासात ४० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.टेंभी शिवारात असलेल्या राजकुमार पाटील व काशीनाथ पाटील यांच्या ६ हजार केळीच्या खोडांचे नुकसान झाले आहे. त्यांच्यासह इतरही १२ ते १५ शेतकºयांच्या कपाशीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या भागातील बळीराजाचा पुन्हा बळी गेला आहे. शेतकºयांकडून पंचनामे करण्याची मागणी होत आहे़पंचनाम्यासाठी तलाठी व कृषी सहायक जात आहेत़ शेतकºयांनी पीकविमा कंपनीकडे तक्रार नोंदवून पंचनामा करवून घ्यावा. आम्हीही प्रयत्न करितच आहोत.- कुंदन हिरे, तहसीलदार, यावल.हतनूरचे २० दरवाजे उघडलेभुसावळ : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने तापीनदीवरील हतनूर धरणाचे ४१ पैकी वीस दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहे.