शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
3
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
4
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
5
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
6
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
7
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
8
भटक्या कुत्र्यांबाबतीत कोर्टाच्या निर्णयाची चर्चा, तिकडे आर्चीने शेअर केला क्युट व्हिडिओ; म्हणाली...
9
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
10
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
11
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
12
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
13
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
14
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
15
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
16
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
17
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
18
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
19
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला

परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 23:38 IST

एरंडोल तालुक्यात अतिवृष्टी : चाळीसगावात गाय मृत्यूमुखी, गिरणा नदीला प्रथमच पूर, एरंडोल तालुक्यात बैल, वासराचा मृत्यू

ठळक मुद्देकाही गावांचा संपर्क तुटलाअग्नावती, भोकरबारी, बोरी, मन्याड या प्रकल्पांमध्ये शून्य साठाअधून-मधून पडतोय पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : जिल्ह्यात गेल्या २० दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने बुधवारी संध्याकाळपासून ते गुरुवारी सकाळपर्यंत जोरदार हजेरी लावल्याने केळी व कपाशीचे नुकसान झाले असून महसूल विभागाकडून पंचनामे सुरू करण्यात आले आहे. गेल्या २४ तासात विक्रमी ४४१.४ मि.मी.इतका एकूण पाऊस जिल्ह्यात झाला. एरंडोल तालुक्यात सर्वाधिक ७८ मि.मी. पाऊस झाला.चाळीसगाव तालुक्यात गाय तर एरंडोल तालुक्यात बैल व वासराचा या परतीच्या पावसामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, दमदार पावसामुळे यंदाच्या मोसमात प्रथमच गिरणा नदीला पूर आला असून दापोरा तसेच कांताई बंधारा ओसंडून वाहत आहे.एरंडोल तालुक्यात अतिवृष्टी झाली असून या तालुक्याची सरासरी शंभरीपर्यंत पोहचण्यास केवळ २.१ टक्के पावसाची गरज असल्याचेही चित्र आहे. तर धरणसाठ्यातही वाढ झाली आहे.बुधवार, २० सप्टेंबर संध्याकाळपासून परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली व तो अधून-मधून सकाळपर्यंत सुरूच होता. यंदाच्या मोसमात गिरणा नदीला पहिल्यांदा पूर आल्याने सर्वांना दिलासा मिळाला आहे.पिकांचे नुकसानजिल्ह्यात या परतीच्या पावसाने केळी, कपाशी पिकाचे नुकसान केले असून त्याचे महसूल विभागाकडून पंचनामे करण्यात येत आहे. हे पंचनामे पूर्ण झालेले नसल्याने नुकसानीचा आकडा समजू शकला नाही. एरंडोल तालुक्यात सर्वाधिक ७८ मि.मी. पाऊस झाला तर सर्वात कमी ९.२ मि.मी. पाऊस पारोळा तालुक्यात झाला.चार प्रकल्पांमध्ये शून्य टक्के जलसाठाजिल्ह्यातील मोठ्या जलसाठ्यांमध्ये वाढ झाली असली तरी चार प्रकल्पांमध्ये शून्य टक्के जलसाठा आहे. हतनूर धरणात ८१.१८, गिरणा धरणात ६४.३३ तर वाघूर धरणात ६९.३१ टक्के जलसाठा आहे. अग्नावती, भोकरबारी, बोरी, मन्याड या प्रकल्पांमध्ये शून्य टक्के जलसाठा आहे. गेल्या आठवड्यात शून्य टक्के असलेल्या हिवरा, बहुळा प्रकल्पामध्ये अनुक्रमे १६.३१ व ३.७९ टक्के जलसाठा झाला आहे. अंजनी प्रकल्पातील साठा केवळ ४.२८ टक्केच आहे.धुळ्यात अर्ज भरणाºयांवर पाऊसशिरपूर तालुक्यात बुधवारी रात्री जोरदार पाऊस झाला. एकाच दिवसात ६६ मि.मी. पावसाची नोंद झाली. शिरपुरात रात्री साडेआठ वाजेपासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले होते़ तहसील कार्यालयासमोरही पाणी साचले़ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरणाºयांनी तोबा गर्दी केली होती़ पाणी साचल्यामुळे इच्छुक उमेदवारांना ये-जा करण्यासाठी त्रास सहन करावा लागला़नंदुरबार चारशे हेक्टरचे नुकसानजिल्ह्यात तळोदा, शहादा आणि नंदुरबार तालुक्यातील काही भागात ऊस व मका पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. साधारणत: साडेतीनशे ते चारशे हेक्टवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.धडगाव तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे तर नंदुरबार व तळोदा तालुकादेखील सरासरीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील चार मध्यम व ३७ लघु प्रकल्पांमध्ये सरासरी ७० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा झाला आहे.गावांचा संपर्क तुटलागिरणा नदी दुथडी भरून वाहू लागल्याने दापोरी, रवंजा, खर्ची या परिसरातून जळगावला येण्यासाठी सोयीचा असलेला मार्ग बंद झाल्याने या गावांचा संपर्क तुटला.रावेर तालुक्यात संततधाररावेर शहरासह तालुक्यात बुधवारी रात्री पासून सुरू असलेल्या पावसाची संततधार गुरुवारी सुरू होती. दरम्यान ४४. ४२ मि.मी. पाऊस झाला. आता ८९.७८ टक्के पर्जन्यमान गाठले आहे. सुकी धरण ९६.६४ टक्के भरले आहे. ०.९४ मिटरचा अनुशेष बाकी आहे. आभोडा ८५.४२ टक्के भरले. ते ०.८० मीटरने खाली आहे. दोन्ही धरणे भरण्यासाठी दमदार पावसाची गरज आहे. गुरुवारी पहाटेपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने कमी अधिक जोराने हजेरी लावली आहे.यावलला ५० लाखांचे नुकसानतालुक्यात बुधवारी सांयकाळी झालेल्या एक तास वादळी पावसाने यावल शहरासह तालुक्यातील निमगाव येथील सुमारे १ हजार हेक्टर शेतीतील ज्वारी, कपाशी, मका, व केळी पिकाचे सुमारे ५० लाखांचे नुकसान झाले आहे. नुकसान ग्रस्त भागात पंचनामे करण्यास सुरवात झाली आहे. येथे एका तासात ४० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.टेंभी शिवारात असलेल्या राजकुमार पाटील व काशीनाथ पाटील यांच्या ६ हजार केळीच्या खोडांचे नुकसान झाले आहे. त्यांच्यासह इतरही १२ ते १५ शेतकºयांच्या कपाशीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या भागातील बळीराजाचा पुन्हा बळी गेला आहे. शेतकºयांकडून पंचनामे करण्याची मागणी होत आहे़पंचनाम्यासाठी तलाठी व कृषी सहायक जात आहेत़ शेतकºयांनी पीकविमा कंपनीकडे तक्रार नोंदवून पंचनामा करवून घ्यावा. आम्हीही प्रयत्न करितच आहोत.- कुंदन हिरे, तहसीलदार, यावल.हतनूरचे २० दरवाजे उघडलेभुसावळ : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने तापीनदीवरील हतनूर धरणाचे ४१ पैकी वीस दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहे.