शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

अर्थव्यवस्थेवरील संकट तात्पुरते - रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 12:06 IST

बाहेरील आव्हानांचा परिणाम

ठळक मुद्देजिल्हा बँकांना नोटा बदलाचे अधिकार नव्हतेसहकारी पतसंस्थांमधील गैरव्यवहारांना आळा

जळगाव : भारतीय अर्थव्यवस्थेवरील संकट हा अंतर्गत नव्हे तर बाहेरील आव्हानांचा परिणाम आहे. परंतु हा तात्कालिक परिणाम असल्याचा दावा भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांनी केला.सहकार भारती व जळगाव जनता बँकेतर्फे मराठे यांचा सत्कार कार्यक्रम शनिवारी झाला. तत्पूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. जळगाव जनता बँकेचे अध्यक्ष अनिल राव, संजय बिर्ला उपस्थित होते.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरु केलेले व्यापारयुध्द, अमेरिकन भांडवल बाजारातून चिनने काढून घेतलेली मोठी गुंतवणूक, भारताने रशियाशी केलेला संरक्षण सामग्रीचा करार याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर झाला आहे. २००८ सारखी परिस्थिती उद्भवेल, अशी व्यक्त होणारी भीती अनाठायी आहे. त्याचे दीर्घ परिणाम दिसणर नाही. खरीप हंगामानंतर अर्थव्यवस्था सुधारेल, असा विश्वास मराठे यांनी व्यक्त केला.हमीभाव वाढवून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाही, तर कृषीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारण्याला प्राधान्य द्यायला हवे. सध्या कापूस, उस आणि तेलबिया यासारख्या कृषी उत्पादनांवर प्रक्रिया होते. त्याचे प्रमाण केवळ २० टक्के आहे, अशी माहिती त्यांनी दिली.नोटबंदीचा दीर्घकालीन फायदानोटबंदी, जीएसटी, रेरासारख्या निर्णयांचे परिणाम दिसायला पाच वर्षांचा कालावधी लागेल, त्याचा अर्थव्यवस्थेला दीर्घकालीन फायदा होईल, असा दावा मराठे यांनी केला. बँकांवरील सायबर हल्ले हा प्रकार फारसा गंभीर नाही. सुरक्षा उपायांमध्ये वाढ करणे हाच त्यावर मार्ग आहे.बँकींग व्यवस्थेच्या पुनर्रचनेविषयी ते म्हणाले की, आंतरराष्टÑीय, राष्टÑीय आणि विभागीय पातळीवरील अशा तीन प्रकारच्या बँका यापुढे कार्यरत असतील. त्यांची उद्दिष्टये निश्चित करुन देण्यात येतील.कर्जमाफीपेक्षा विविध कार्यकारी सहकारी संस्थांना मजबूत करुन त्यांना कृषक व अकृषक कर्ज देण्यास परवानगी देणे आणि तेथील ठेवींना संरक्षण देणे हे उपाय अवलंबण्याची सूचना सहकार भारतीने केलेली आहे.सहकारी पतसंस्थांमधील गैरव्यवहारांना आळागेल्या काही वर्षांपूर्वी पतसंस्थांमध्ये झालेल्या गैरव्यवहाराबाबत बोलताना सतीश मराठे म्हणाले की, त्या वेळी प्रणाली मजबूत (स्ट्राँग सिस्टीम) नव्हती, त्यामुळे गैरव्यवहारसारखे प्रकार घडले. मात्र आता वर्ष-दोन वर्षात यास आळा बसला असल्याचा दावा त्यांनी केला.जिल्हा बँकांना नोटा बदलाचे अधिकार नव्हतेजिल्हा बँकेचे पैसे रिझर्व्ह बँकेने अडकवून ठेवले, हे चुकीचे विधान असल्याचे सतीश मराठे म्हणाले. नोटाबंदी काळात जिल्हा बँकांना नोटा बदलून देण्याचे अधिकार नव्हते तरीदेखील त्यांनी तसे व्यवहार केले. यात सर्व बँकांचे व्यवहार सुरळीत केले असून केवळ सात ते आठ बँकांचे व्यवहार बाकी असल्याचे मराठे यांनी स्पष्ट केले.मल्टीस्टेट बँकांचा दुरुपयोग होऊ लागल्याचे लक्षात येऊ लागल्याने आता केंद्र सरकार या बँकांना मंजुरीच देत नसल्याचेही त्यांनी सांगितले.‘कॅलिबेरेट रिस्पॉन्स’मुळे केव्हाही व्याजदरात बदलरिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर करताना गेल्या काही महिन्यांपासून कर्जांवरील व्याजदरात बदल नसल्याच्या मुद्याबाबत बोलताना ते म्हणाले की, पतधोरणाबाबत रिझर्व्ह बँक ‘कॅलिबेरेट रिस्पॉन्स’चा वापर करीत आहे. याचा अर्थ म्हणजे केवळ पतधोरणावेळीच व्याजदरात बदल होणार नाही तर मध्यंतरी तो केव्हाही करता येऊ शकतो, असा असून त्यानुसार हे दर बदलू शकतात, असेही सतीश मराठे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Jalgaonजळगाव