शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
4
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
5
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
6
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
7
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
8
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
9
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
10
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
11
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
12
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
13
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
14
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
15
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
16
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
17
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
18
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
19
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
20
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."

अर्थव्यवस्थेवरील संकट तात्पुरते - रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 12:06 IST

बाहेरील आव्हानांचा परिणाम

ठळक मुद्देजिल्हा बँकांना नोटा बदलाचे अधिकार नव्हतेसहकारी पतसंस्थांमधील गैरव्यवहारांना आळा

जळगाव : भारतीय अर्थव्यवस्थेवरील संकट हा अंतर्गत नव्हे तर बाहेरील आव्हानांचा परिणाम आहे. परंतु हा तात्कालिक परिणाम असल्याचा दावा भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांनी केला.सहकार भारती व जळगाव जनता बँकेतर्फे मराठे यांचा सत्कार कार्यक्रम शनिवारी झाला. तत्पूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. जळगाव जनता बँकेचे अध्यक्ष अनिल राव, संजय बिर्ला उपस्थित होते.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरु केलेले व्यापारयुध्द, अमेरिकन भांडवल बाजारातून चिनने काढून घेतलेली मोठी गुंतवणूक, भारताने रशियाशी केलेला संरक्षण सामग्रीचा करार याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर झाला आहे. २००८ सारखी परिस्थिती उद्भवेल, अशी व्यक्त होणारी भीती अनाठायी आहे. त्याचे दीर्घ परिणाम दिसणर नाही. खरीप हंगामानंतर अर्थव्यवस्था सुधारेल, असा विश्वास मराठे यांनी व्यक्त केला.हमीभाव वाढवून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाही, तर कृषीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारण्याला प्राधान्य द्यायला हवे. सध्या कापूस, उस आणि तेलबिया यासारख्या कृषी उत्पादनांवर प्रक्रिया होते. त्याचे प्रमाण केवळ २० टक्के आहे, अशी माहिती त्यांनी दिली.नोटबंदीचा दीर्घकालीन फायदानोटबंदी, जीएसटी, रेरासारख्या निर्णयांचे परिणाम दिसायला पाच वर्षांचा कालावधी लागेल, त्याचा अर्थव्यवस्थेला दीर्घकालीन फायदा होईल, असा दावा मराठे यांनी केला. बँकांवरील सायबर हल्ले हा प्रकार फारसा गंभीर नाही. सुरक्षा उपायांमध्ये वाढ करणे हाच त्यावर मार्ग आहे.बँकींग व्यवस्थेच्या पुनर्रचनेविषयी ते म्हणाले की, आंतरराष्टÑीय, राष्टÑीय आणि विभागीय पातळीवरील अशा तीन प्रकारच्या बँका यापुढे कार्यरत असतील. त्यांची उद्दिष्टये निश्चित करुन देण्यात येतील.कर्जमाफीपेक्षा विविध कार्यकारी सहकारी संस्थांना मजबूत करुन त्यांना कृषक व अकृषक कर्ज देण्यास परवानगी देणे आणि तेथील ठेवींना संरक्षण देणे हे उपाय अवलंबण्याची सूचना सहकार भारतीने केलेली आहे.सहकारी पतसंस्थांमधील गैरव्यवहारांना आळागेल्या काही वर्षांपूर्वी पतसंस्थांमध्ये झालेल्या गैरव्यवहाराबाबत बोलताना सतीश मराठे म्हणाले की, त्या वेळी प्रणाली मजबूत (स्ट्राँग सिस्टीम) नव्हती, त्यामुळे गैरव्यवहारसारखे प्रकार घडले. मात्र आता वर्ष-दोन वर्षात यास आळा बसला असल्याचा दावा त्यांनी केला.जिल्हा बँकांना नोटा बदलाचे अधिकार नव्हतेजिल्हा बँकेचे पैसे रिझर्व्ह बँकेने अडकवून ठेवले, हे चुकीचे विधान असल्याचे सतीश मराठे म्हणाले. नोटाबंदी काळात जिल्हा बँकांना नोटा बदलून देण्याचे अधिकार नव्हते तरीदेखील त्यांनी तसे व्यवहार केले. यात सर्व बँकांचे व्यवहार सुरळीत केले असून केवळ सात ते आठ बँकांचे व्यवहार बाकी असल्याचे मराठे यांनी स्पष्ट केले.मल्टीस्टेट बँकांचा दुरुपयोग होऊ लागल्याचे लक्षात येऊ लागल्याने आता केंद्र सरकार या बँकांना मंजुरीच देत नसल्याचेही त्यांनी सांगितले.‘कॅलिबेरेट रिस्पॉन्स’मुळे केव्हाही व्याजदरात बदलरिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर करताना गेल्या काही महिन्यांपासून कर्जांवरील व्याजदरात बदल नसल्याच्या मुद्याबाबत बोलताना ते म्हणाले की, पतधोरणाबाबत रिझर्व्ह बँक ‘कॅलिबेरेट रिस्पॉन्स’चा वापर करीत आहे. याचा अर्थ म्हणजे केवळ पतधोरणावेळीच व्याजदरात बदल होणार नाही तर मध्यंतरी तो केव्हाही करता येऊ शकतो, असा असून त्यानुसार हे दर बदलू शकतात, असेही सतीश मराठे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Jalgaonजळगाव