शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

दुबार पेरणीचे संकट

By admin | Updated: June 21, 2014 16:16 IST

अद्याप पेरणीलायक पाऊस न झाल्याने खते, बियाण्याचा बाजार ठप्प झाला आहे. अन्नधान्याचे दर मात्र अजून स्थिर आहेत. जिल्ह्यातील काही शेतकर्‍यांवर दुबारपेरणीचे संकट ओढविले आहे.

जळगाव : अद्याप पेरणीलायक पाऊस न झाल्याने खते, बियाण्याचा बाजार ठप्प झाला आहे. अन्नधान्याचे दर मात्र अजून स्थिर आहेत. जिल्ह्यातील काही शेतकर्‍यांवर दुबारपेरणीचे संकट ओढविले आहे.

शहरात दोन दिवसाआड २६00 मे.टन खते येतात. ती लागलीच वितरकांकडून गाव पातळीवरील किरकोळ विक्रेत्यांकडे पोहोचतात. अर्थातच आठवड्याला चार कोटी रुपयांची होणारी खत बाजारातील उलाढाल आजघडीला थांबली आहे. 
कापूस वाचविण्याची धडपड
जामनेर, बोदवड, चाळीसगाव, भडगाव, पारोळा भागात अनेक विहिरी, कूपनलिकांचे पाणी उन्हाळ्य़ाच्या अखेरीस कमी होऊ लागते. जूनपर्यंत तर बिकट स्थिती असते. या भागात लागवड केलेल्या पूर्वहंगामी (बागायती) कापसाला वाचविण्याचे आव्हान सध्या आहे. 
जिल्हाभरात या हंगामात चार लाख ४१ हजार हेक्टरवर कापसाची लागवड होण्याचे संकेत होते. आतापर्यंत २३ हजार हेक्टरवर क्षेत्रात पूर्वहंगामी कापसाची लागवड झाली आहे. या कापसालादेखील पावसाची गरज आहे. 
रोपे पिवळी पडण्याचे प्रकार
पाऊस नसल्याने पूर्वहंगामी कापूस उभारीवर नाही. चोपडा, यावल, जळगाव भागात पूर्वहंगामी कापसातील काही रोपे पिवळसर होऊन त्यांची वाढ खुंटत आहे. अतिउष्णतेमुळे या रोपांना बाधा पोहोचत असल्याचे संशोधक भूषण पाटील म्हणाले. 
हंगामी म्हणजेच कोरडवाहू कापसाची लागवड अजून झालेली नाही. जुलैच्या मध्यापर्यंत लागवड करणे योग्य असते. यापुढे पाऊस किती ताण देतो आणि कापूस लागवड होते की नाही? अशी भीती आहे. 
उत्पादकता अशक्य
एकूण सात लाख ७८ हजार हेक्टरवर कापसासह तृणधान्य, कडधान्य, तेलबिया पिकांची लागवड करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. 
या पिकांची उत्पादकता गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिक राहील, असे भाकीत करण्यात आले होते. त्यात ज्वारीची हेक्टरी २0 क्विंटल, मका ३५, उडीद हेक्टरी २0, मूग १२, सोयाबीन १६, तूर १५, कापूस ३00 किलो रुई, अशी उत्पादकता राहील, असे कृषी विभागाने म्हटले होते. पण मान्सून उशिराने येण्याची स्थिती असल्याने ही उत्पादकता गाठणे आता कठीण होत आहे. याचा अर्थ उत्पादनामध्ये मोठी घट येण्याची शक्यता आहे. 
साठा करण्याची तयारी 
पाऊस जसजसा लांबत आहे तसे धान्य बाजारातील गणितेही चुकत आहेत. सद्य:स्थितीमध्ये व्यापार्‍यांनी साठा करण्याची तयारी केली आहे. माल मागविणे आणि लागलीच तो विक्री करणे ही प्रक्रिया मंद होत आहे. माल मागविण्याचे प्रमाण कमी आहे. जी व्यापारी मंडळी माल मागवित आहे ती त्याचा काही प्रमाणात साठाही करू लागली आहे. तूर्त धान्य बाजारात हवी तेवढी तेजी नाही. बाजार स्थिर आहे. हरभरा, तूर, उडीद, तूर डाळी, गव्हाचे दर स्थिर आहेत. आठवडाभरात पाऊस यायला हवा. अन्यथा पुढे अन्नधान्याचे दर वाढू शकतात, असे दाणा बाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया म्हणाले. 
दुबार पेरणीचे सावट
चाळीसगाव, धरणगाव, अमळनेर, जळगाव या तालुक्यांमध्ये सोयाबीन, कापूस या पिकांची अल्प पावसाच्या आधारावर पेरणी व लागवड करण्यात आली. त्यावर पाऊस नाही. कमी पावसामुळे कोंब करपून बियाणे वाया जाईल. यामुळे दुबार पेरणी करावी लागेल. धूळ पेरणीदेखील झाली होती. तीदेखील यशस्वी झालेली नाही. धूळ पेरणी व अल्प पावसाच्या आधारावर झालेल्या पेरणीखाली १७00 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र आहे. दुबार पेरणीसाठी बियाण्याची गरज पडेल. सोयाबीन, मूग व उडीदाच्या बियाण्याची गरज असेल. यामुळे हे बियाणे अधिक प्रमाणात मागविण्याची तयारी कृषी विभागाने केली आहे.
खते घेण्यासाठी शेतकर्‍यांना रांगा लावण्याची वेळ आली होती. काळाबाजारही झाला होता. पण पाऊस लांबत असल्याने खत बाजारात शुकशुकाट आहे. उधारीवर खते देण्याची वेळ कंपन्यांवर आली आहे. तर मोठय़ा शेतकर्‍यांना दुकानदारही उधारीने खते देत आहेत.
 डाळींचे दर 
(दर प्रतिक्विंटल रुपयात)
हरभरा- ३000 ते ३६00
मूग- ८000 ते ८५00
उडीद- ६७00 ते ७१00
तूर- ६000 ते ६४00
 
तांदूळ व गव्हाचे दर 
(दर प्रतिक्विंटल रुपयात)
चिनोर- ३000 ते ३२00
कालिमूछ- ३८00 ते ४000
बासमती- १२000 ते १६000
गहू- १९00 ते २000