शहरं
Join us  
Trending Stories
1
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
2
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
3
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
4
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
5
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
7
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
8
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
9
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
10
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
11
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
12
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
13
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
14
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
15
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
16
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
17
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
18
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
19
नवऱ्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगवर भडकली ऐश्वर्या; म्हणाली, "साखरपुड्यापासूनच..."
20
Hyundai Creta चं टेन्शन वाढणार, येतायेत दोन 'धाकड' SUV; जाणून घ्या फीचर्स, काय असेल खास?
Daily Top 2Weekly Top 5

लेखनाचं श्रेय आई-वडिलांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 00:12 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘माझी लेखन प्रेरणा’ या सदरात चाळीसगाव येथील विश्वास देशपांडे यांनी सांगितलेली आपल्या लेखनामागील प्रेरणा.

लेखन प्रेरणेचे श्रेय मी माझ्या आईवडिलांना देईन. त्यांनी लहानपणापासून मला वाचनाची गोडी लावली. माझे प्राथमिक शिक्षण एका अगदी छोट्याशा खेडेगावात झाले. तिथे रोजचे वर्तमानपत्रसुद्धा येत नव्हते. पण मी ज्या शाळेत शिकत होतो त्या शाळेला माझ्या काकांनी त्या काळात म्हणजे सुमारे ५५ वर्षांपूर्वी पुस्तके घेण्यासाठी एक हजार रुपये दिले होते. त्या काळात एक हजार रुपयात भरपूर पुस्तके आली. तशी आधीचीही काही पुस्तके त्या वाचनालयात होती. मी दररोज तेथून एक पुस्तक घेऊन वाचत असे. सातवी होईपर्यंत त्या शाळेतील जवळपास सर्व पुस्तके माझी वाचून झाली होती.पुढे शिक्षणासाठी चाळीसगावला आलो. तेव्हा वडिलांनी शेती सोडून येथील कॉलेजमध्ये लायब्ररीत उपजीविकेसाठी नोकरी धरली. त्यांनाही वाचनाची आवड होती. त्यामुळे मी हायस्कूलमध्ये असतानाच मला विविध लेखकांची पुस्तके वाचायला मिळू लागले. तेव्हा विविध ऐतिहासिक, सामाजिक, धार्मिक कादंबऱ्या, चरित्रे आदींचे वाचन होऊ लागले. पुढे कॉलेजला गेल्यानंतर वाचनात अधिक भर पडत गेली. मग दरवर्षी प्रकाशित होणाºया कॉलेजच्या नियतकालिकात लिहू लागलो. काही कविता लिहिल्या. त्यातील काही वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या. पुढे शिक्षक म्हणून काम करीत असताना अनेक विषयांवर बोलण्याचा प्रसंग आला. त्यानिमित्ताने पुन्हा वाचन होत गेले. असे वाचनाने मला समृद्ध केले. पुस्तके माझी जीवलग मित्र झाली. कोठेही गेलो आणि चांगले पुस्तक दिसले की मी ते विकत घेत असे.सेवानिवृत्तीनंतर मला लिहिण्यासाठी अधिक वेळ उपलब्ध झाला. भोवताली घडणाºया काही घटना, सामाजिक प्रश्न मला अस्वस्थ करीत होते. त्यावर वाचकांशी संवाद साधावा असे वाटू लागले. मग व्हॉटसअ‍ॅप, फेसबुक यासारख्या सोशल मीडियाचा आधार घेऊन माझे लेख प्रभातपुष्प या शीर्षकाखाली वाचकांपुढे ठेवू लागलो. वाचकांना ते आवडू लागले. लवकरच माझा एक वाचकवर्ग तयार झाला. काही लेख वर्तमानपत्रातही प्रसिद्ध झाले. पुढे लवकरच माझ्या वाचकांच्या आग्रहाखातर ते लेख पुस्तक रूपाने प्रसिद्ध करायचे ठरवले. पुण्यातील विश्वकर्मा प्रकाशनाने त्यांचे पुस्तक ‘कवडसे सोनेरी..अंतरीचे’ या नावाने प्रसिद्ध केले. या पुस्तकाला प्रा.प्रवीण दवणे यांची प्रस्तावना आहे. नुकतेच हे पुस्तक दीपस्तंभचे यजुर्वेंद्र महाजन आणि प्रसिद्ध वक्ते प्रा.प्रकाश पाठक यांच्या हस्ते प्रकाशित झाले.- विश्वास देशपांडे