शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
4
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
5
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७,७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
7
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
8
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
9
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
10
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
11
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
12
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
13
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
14
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
15
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
16
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
17
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
18
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
19
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
20
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण

लेखनाचं श्रेय आई-वडिलांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 00:12 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘माझी लेखन प्रेरणा’ या सदरात चाळीसगाव येथील विश्वास देशपांडे यांनी सांगितलेली आपल्या लेखनामागील प्रेरणा.

लेखन प्रेरणेचे श्रेय मी माझ्या आईवडिलांना देईन. त्यांनी लहानपणापासून मला वाचनाची गोडी लावली. माझे प्राथमिक शिक्षण एका अगदी छोट्याशा खेडेगावात झाले. तिथे रोजचे वर्तमानपत्रसुद्धा येत नव्हते. पण मी ज्या शाळेत शिकत होतो त्या शाळेला माझ्या काकांनी त्या काळात म्हणजे सुमारे ५५ वर्षांपूर्वी पुस्तके घेण्यासाठी एक हजार रुपये दिले होते. त्या काळात एक हजार रुपयात भरपूर पुस्तके आली. तशी आधीचीही काही पुस्तके त्या वाचनालयात होती. मी दररोज तेथून एक पुस्तक घेऊन वाचत असे. सातवी होईपर्यंत त्या शाळेतील जवळपास सर्व पुस्तके माझी वाचून झाली होती.पुढे शिक्षणासाठी चाळीसगावला आलो. तेव्हा वडिलांनी शेती सोडून येथील कॉलेजमध्ये लायब्ररीत उपजीविकेसाठी नोकरी धरली. त्यांनाही वाचनाची आवड होती. त्यामुळे मी हायस्कूलमध्ये असतानाच मला विविध लेखकांची पुस्तके वाचायला मिळू लागले. तेव्हा विविध ऐतिहासिक, सामाजिक, धार्मिक कादंबऱ्या, चरित्रे आदींचे वाचन होऊ लागले. पुढे कॉलेजला गेल्यानंतर वाचनात अधिक भर पडत गेली. मग दरवर्षी प्रकाशित होणाºया कॉलेजच्या नियतकालिकात लिहू लागलो. काही कविता लिहिल्या. त्यातील काही वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या. पुढे शिक्षक म्हणून काम करीत असताना अनेक विषयांवर बोलण्याचा प्रसंग आला. त्यानिमित्ताने पुन्हा वाचन होत गेले. असे वाचनाने मला समृद्ध केले. पुस्तके माझी जीवलग मित्र झाली. कोठेही गेलो आणि चांगले पुस्तक दिसले की मी ते विकत घेत असे.सेवानिवृत्तीनंतर मला लिहिण्यासाठी अधिक वेळ उपलब्ध झाला. भोवताली घडणाºया काही घटना, सामाजिक प्रश्न मला अस्वस्थ करीत होते. त्यावर वाचकांशी संवाद साधावा असे वाटू लागले. मग व्हॉटसअ‍ॅप, फेसबुक यासारख्या सोशल मीडियाचा आधार घेऊन माझे लेख प्रभातपुष्प या शीर्षकाखाली वाचकांपुढे ठेवू लागलो. वाचकांना ते आवडू लागले. लवकरच माझा एक वाचकवर्ग तयार झाला. काही लेख वर्तमानपत्रातही प्रसिद्ध झाले. पुढे लवकरच माझ्या वाचकांच्या आग्रहाखातर ते लेख पुस्तक रूपाने प्रसिद्ध करायचे ठरवले. पुण्यातील विश्वकर्मा प्रकाशनाने त्यांचे पुस्तक ‘कवडसे सोनेरी..अंतरीचे’ या नावाने प्रसिद्ध केले. या पुस्तकाला प्रा.प्रवीण दवणे यांची प्रस्तावना आहे. नुकतेच हे पुस्तक दीपस्तंभचे यजुर्वेंद्र महाजन आणि प्रसिद्ध वक्ते प्रा.प्रकाश पाठक यांच्या हस्ते प्रकाशित झाले.- विश्वास देशपांडे