शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

लेखनाचं श्रेय आई-वडिलांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 00:12 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘माझी लेखन प्रेरणा’ या सदरात चाळीसगाव येथील विश्वास देशपांडे यांनी सांगितलेली आपल्या लेखनामागील प्रेरणा.

लेखन प्रेरणेचे श्रेय मी माझ्या आईवडिलांना देईन. त्यांनी लहानपणापासून मला वाचनाची गोडी लावली. माझे प्राथमिक शिक्षण एका अगदी छोट्याशा खेडेगावात झाले. तिथे रोजचे वर्तमानपत्रसुद्धा येत नव्हते. पण मी ज्या शाळेत शिकत होतो त्या शाळेला माझ्या काकांनी त्या काळात म्हणजे सुमारे ५५ वर्षांपूर्वी पुस्तके घेण्यासाठी एक हजार रुपये दिले होते. त्या काळात एक हजार रुपयात भरपूर पुस्तके आली. तशी आधीचीही काही पुस्तके त्या वाचनालयात होती. मी दररोज तेथून एक पुस्तक घेऊन वाचत असे. सातवी होईपर्यंत त्या शाळेतील जवळपास सर्व पुस्तके माझी वाचून झाली होती.पुढे शिक्षणासाठी चाळीसगावला आलो. तेव्हा वडिलांनी शेती सोडून येथील कॉलेजमध्ये लायब्ररीत उपजीविकेसाठी नोकरी धरली. त्यांनाही वाचनाची आवड होती. त्यामुळे मी हायस्कूलमध्ये असतानाच मला विविध लेखकांची पुस्तके वाचायला मिळू लागले. तेव्हा विविध ऐतिहासिक, सामाजिक, धार्मिक कादंबऱ्या, चरित्रे आदींचे वाचन होऊ लागले. पुढे कॉलेजला गेल्यानंतर वाचनात अधिक भर पडत गेली. मग दरवर्षी प्रकाशित होणाºया कॉलेजच्या नियतकालिकात लिहू लागलो. काही कविता लिहिल्या. त्यातील काही वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या. पुढे शिक्षक म्हणून काम करीत असताना अनेक विषयांवर बोलण्याचा प्रसंग आला. त्यानिमित्ताने पुन्हा वाचन होत गेले. असे वाचनाने मला समृद्ध केले. पुस्तके माझी जीवलग मित्र झाली. कोठेही गेलो आणि चांगले पुस्तक दिसले की मी ते विकत घेत असे.सेवानिवृत्तीनंतर मला लिहिण्यासाठी अधिक वेळ उपलब्ध झाला. भोवताली घडणाºया काही घटना, सामाजिक प्रश्न मला अस्वस्थ करीत होते. त्यावर वाचकांशी संवाद साधावा असे वाटू लागले. मग व्हॉटसअ‍ॅप, फेसबुक यासारख्या सोशल मीडियाचा आधार घेऊन माझे लेख प्रभातपुष्प या शीर्षकाखाली वाचकांपुढे ठेवू लागलो. वाचकांना ते आवडू लागले. लवकरच माझा एक वाचकवर्ग तयार झाला. काही लेख वर्तमानपत्रातही प्रसिद्ध झाले. पुढे लवकरच माझ्या वाचकांच्या आग्रहाखातर ते लेख पुस्तक रूपाने प्रसिद्ध करायचे ठरवले. पुण्यातील विश्वकर्मा प्रकाशनाने त्यांचे पुस्तक ‘कवडसे सोनेरी..अंतरीचे’ या नावाने प्रसिद्ध केले. या पुस्तकाला प्रा.प्रवीण दवणे यांची प्रस्तावना आहे. नुकतेच हे पुस्तक दीपस्तंभचे यजुर्वेंद्र महाजन आणि प्रसिद्ध वक्ते प्रा.प्रकाश पाठक यांच्या हस्ते प्रकाशित झाले.- विश्वास देशपांडे