शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

पोस्टाची विश्वासार्हता पोस्टमनच्या शिलेदारांमुळे टिकून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 20:08 IST

इंटरनेटच्या काळातही आजही लोक टपालसेवेचा वापर करतात आणि त्यावर विश्वास कायम आहे.

ठळक मुद्देटपाल दिन विशेषतंत्रज्ञानामुळे लोकांचे आयुष्य सोशल मीडियापुरतेच मर्यादित

संजय सोनारचाळीसगाव, जि.जळगाव : प्रत्येकाच्या घरी पत्र वाटत फिरणारे खाकी कपड्यातील पोस्टमन काळाच्या ओघात कुठे तरी हरवल्याची जाणीव होत असली तरी आजमितीसही हे पोस्टमन दररोज शहरातल्या गल्लोगल्ली चढ-उतार करून पत्र पोहोचवण्यासाठी पोस्टमनला दूरदूर सायकलचीही रपेट मारावी लागते. त्यामुळे जागतिक टपाल दिनानिमित्ताने व्हॉट्सअ‍ॅपच्या जमान्यातही पोस्टाची विश्वासार्हता याच त्यांच्या शिलेदारांमुळे टिकून असल्याची प्रचिती येते. इंटरनेटच्या काळातही आजही लोक टपालसेवेचा वापर करतात आणि त्यावर विश्वास कायम आहे.‘डाकिया डाक लाया, खुशी का पैगाम कही दर्दनाक लाया’ हे गाणे प्रत्येकाला पोस्टाच्या काळात घेऊन जाते. परंतु, पोस्टाचा काळ हवाहवासा वाटला तरीही याची दुसरी बाजू म्हणजे अजूनही टपाल विभागाने कात टाकलेली नाही. आजही उन्हातान्हात, पाऊस-पाण्यात पोस्टमन्सना पत्र पोहोचवण्यासाठी दारोदारी फिरण्याशिवाय गत्यंतर नाही. एकीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी देश-विदेशात ‘डिजिटल इंडिया’चा नारा देत असताना दुसरीकडे टपाल विभाग मात्र माहिती तंत्रज्ञान क्षेत्रापासून अद्यापही कोसो दूर असल्याचे चित्र आहे.रेल्वे गाड्या बंद असल्यामुळे दररोज जा-ये करणाऱ्या टपालामुळे विलंब लागत आहे. रेल्वेऐवजी आता खाजगी वाहनातून स्वखर्चाने टपाल पाठविला जात आहे. परिणामी एक ते दोन दिवसाआड टपाल जातो.चाळीसगाव मुख्य पोस्ट कार्यालयात एकूण १० पोस्टमन आहेत. शहरात पाडलेल्या झोननुसार नियमित वाटप केले जाते. तसेच एकूण ३५ कर्मचारी कार्यरत आहे. पुरेसे मनुष्यबळ असल्याने कामात अडचण भासत नाही.सध्याचा जमाना हा इंटरनेट, ई-मेल आणि सोशल नेटवर्किंगचा आहे. प्रिय व्यक्तीशी संपर्क करणे अगदी एका क्लिकवर आले आहे. मात्र हा संपर्क सोपा झाला असला तरी त्यातला जिव्हाळा कमी झाल्याचे जाणवते. त्यामुळे टपाल विभागाला आता कात टाकण्याची गरज आहे.व्हाट्सएपच्या ग्रुपमुळे अनेकांची झाली सोयपोस्टमास्तर शिवदास बडगुजर यांनी ग्राहकांचा व्हाट्सएपचा ग्रुप तयार केला आहे. ज्येष्ठ नागरिक, कोविड रुग्णांना पोस्ट खात्यातून रक्कम काढावयाची असल्यास त्यांनी ग्रुपवर मेसेस टाकल्यास त्या ग्राहकांना पोस्टमनच्या माध्यमातून घरपोच पैसे पाठविण्याची उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचा अनेक ग्राहक लाभ घेत आहेत. पोस्टमास्तर बडगुजर यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.वडीलधाऱ्यांना नमस्कार व घरातील छोट्यांना गोड गोड पापा..कबूतर जा जा... कबूतर जा जा... असे म्हणत चिठ्ठी पाठवणे. तसेच घोड्यावरून विशेष दूतामार्फत निरोप पाठवणे ही प्रथा कालबाह्य ठरुन टपालसेवेचा जन्म झाला. सध्याच्या युगात तर मोबाईल सेवा व तंत्रज्ञानाच्या वापरामुळे जग आगदी जवळ आले आहे व टपाल सेवेचा विसरच पडून गेला. सध्याचे चित्र असे आहे की टपाल कार्यालयाऐवजी सर्व व्यवहार मेल व इतर तंत्रज्ञानाचा वापर करून केले जातात.सद्य:स्थितीत पोस्टकार्ड, आंतरदेशीय पत्रे कमी झाले असले तरी रजिस्टर, स्पीडपोस्ट व पार्सलची संख्या वाढली आहे. आवश्यक टपाल बंद झालेला नाही. याबरोबरच पोस्टात अनेक सुविधा उपलब्ध झाल्यामुळे ग्राहकांचा विश्वास अधिकाधिक वाढला आहे.-शिवदास एकनाथ बडगुजर, पोस्टमास्तर, मुख्य पोस्ट, चाळीसगाव 

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसChalisgaonचाळीसगाव