शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

पोस्टाची विश्वासार्हता पोस्टमनच्या शिलेदारांमुळे टिकून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 20:08 IST

इंटरनेटच्या काळातही आजही लोक टपालसेवेचा वापर करतात आणि त्यावर विश्वास कायम आहे.

ठळक मुद्देटपाल दिन विशेषतंत्रज्ञानामुळे लोकांचे आयुष्य सोशल मीडियापुरतेच मर्यादित

संजय सोनारचाळीसगाव, जि.जळगाव : प्रत्येकाच्या घरी पत्र वाटत फिरणारे खाकी कपड्यातील पोस्टमन काळाच्या ओघात कुठे तरी हरवल्याची जाणीव होत असली तरी आजमितीसही हे पोस्टमन दररोज शहरातल्या गल्लोगल्ली चढ-उतार करून पत्र पोहोचवण्यासाठी पोस्टमनला दूरदूर सायकलचीही रपेट मारावी लागते. त्यामुळे जागतिक टपाल दिनानिमित्ताने व्हॉट्सअ‍ॅपच्या जमान्यातही पोस्टाची विश्वासार्हता याच त्यांच्या शिलेदारांमुळे टिकून असल्याची प्रचिती येते. इंटरनेटच्या काळातही आजही लोक टपालसेवेचा वापर करतात आणि त्यावर विश्वास कायम आहे.‘डाकिया डाक लाया, खुशी का पैगाम कही दर्दनाक लाया’ हे गाणे प्रत्येकाला पोस्टाच्या काळात घेऊन जाते. परंतु, पोस्टाचा काळ हवाहवासा वाटला तरीही याची दुसरी बाजू म्हणजे अजूनही टपाल विभागाने कात टाकलेली नाही. आजही उन्हातान्हात, पाऊस-पाण्यात पोस्टमन्सना पत्र पोहोचवण्यासाठी दारोदारी फिरण्याशिवाय गत्यंतर नाही. एकीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी देश-विदेशात ‘डिजिटल इंडिया’चा नारा देत असताना दुसरीकडे टपाल विभाग मात्र माहिती तंत्रज्ञान क्षेत्रापासून अद्यापही कोसो दूर असल्याचे चित्र आहे.रेल्वे गाड्या बंद असल्यामुळे दररोज जा-ये करणाऱ्या टपालामुळे विलंब लागत आहे. रेल्वेऐवजी आता खाजगी वाहनातून स्वखर्चाने टपाल पाठविला जात आहे. परिणामी एक ते दोन दिवसाआड टपाल जातो.चाळीसगाव मुख्य पोस्ट कार्यालयात एकूण १० पोस्टमन आहेत. शहरात पाडलेल्या झोननुसार नियमित वाटप केले जाते. तसेच एकूण ३५ कर्मचारी कार्यरत आहे. पुरेसे मनुष्यबळ असल्याने कामात अडचण भासत नाही.सध्याचा जमाना हा इंटरनेट, ई-मेल आणि सोशल नेटवर्किंगचा आहे. प्रिय व्यक्तीशी संपर्क करणे अगदी एका क्लिकवर आले आहे. मात्र हा संपर्क सोपा झाला असला तरी त्यातला जिव्हाळा कमी झाल्याचे जाणवते. त्यामुळे टपाल विभागाला आता कात टाकण्याची गरज आहे.व्हाट्सएपच्या ग्रुपमुळे अनेकांची झाली सोयपोस्टमास्तर शिवदास बडगुजर यांनी ग्राहकांचा व्हाट्सएपचा ग्रुप तयार केला आहे. ज्येष्ठ नागरिक, कोविड रुग्णांना पोस्ट खात्यातून रक्कम काढावयाची असल्यास त्यांनी ग्रुपवर मेसेस टाकल्यास त्या ग्राहकांना पोस्टमनच्या माध्यमातून घरपोच पैसे पाठविण्याची उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचा अनेक ग्राहक लाभ घेत आहेत. पोस्टमास्तर बडगुजर यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.वडीलधाऱ्यांना नमस्कार व घरातील छोट्यांना गोड गोड पापा..कबूतर जा जा... कबूतर जा जा... असे म्हणत चिठ्ठी पाठवणे. तसेच घोड्यावरून विशेष दूतामार्फत निरोप पाठवणे ही प्रथा कालबाह्य ठरुन टपालसेवेचा जन्म झाला. सध्याच्या युगात तर मोबाईल सेवा व तंत्रज्ञानाच्या वापरामुळे जग आगदी जवळ आले आहे व टपाल सेवेचा विसरच पडून गेला. सध्याचे चित्र असे आहे की टपाल कार्यालयाऐवजी सर्व व्यवहार मेल व इतर तंत्रज्ञानाचा वापर करून केले जातात.सद्य:स्थितीत पोस्टकार्ड, आंतरदेशीय पत्रे कमी झाले असले तरी रजिस्टर, स्पीडपोस्ट व पार्सलची संख्या वाढली आहे. आवश्यक टपाल बंद झालेला नाही. याबरोबरच पोस्टात अनेक सुविधा उपलब्ध झाल्यामुळे ग्राहकांचा विश्वास अधिकाधिक वाढला आहे.-शिवदास एकनाथ बडगुजर, पोस्टमास्तर, मुख्य पोस्ट, चाळीसगाव 

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसChalisgaonचाळीसगाव