शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पोस्टाची विश्वासार्हता पोस्टमनच्या शिलेदारांमुळे टिकून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 20:08 IST

इंटरनेटच्या काळातही आजही लोक टपालसेवेचा वापर करतात आणि त्यावर विश्वास कायम आहे.

ठळक मुद्देटपाल दिन विशेषतंत्रज्ञानामुळे लोकांचे आयुष्य सोशल मीडियापुरतेच मर्यादित

संजय सोनारचाळीसगाव, जि.जळगाव : प्रत्येकाच्या घरी पत्र वाटत फिरणारे खाकी कपड्यातील पोस्टमन काळाच्या ओघात कुठे तरी हरवल्याची जाणीव होत असली तरी आजमितीसही हे पोस्टमन दररोज शहरातल्या गल्लोगल्ली चढ-उतार करून पत्र पोहोचवण्यासाठी पोस्टमनला दूरदूर सायकलचीही रपेट मारावी लागते. त्यामुळे जागतिक टपाल दिनानिमित्ताने व्हॉट्सअ‍ॅपच्या जमान्यातही पोस्टाची विश्वासार्हता याच त्यांच्या शिलेदारांमुळे टिकून असल्याची प्रचिती येते. इंटरनेटच्या काळातही आजही लोक टपालसेवेचा वापर करतात आणि त्यावर विश्वास कायम आहे.‘डाकिया डाक लाया, खुशी का पैगाम कही दर्दनाक लाया’ हे गाणे प्रत्येकाला पोस्टाच्या काळात घेऊन जाते. परंतु, पोस्टाचा काळ हवाहवासा वाटला तरीही याची दुसरी बाजू म्हणजे अजूनही टपाल विभागाने कात टाकलेली नाही. आजही उन्हातान्हात, पाऊस-पाण्यात पोस्टमन्सना पत्र पोहोचवण्यासाठी दारोदारी फिरण्याशिवाय गत्यंतर नाही. एकीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी देश-विदेशात ‘डिजिटल इंडिया’चा नारा देत असताना दुसरीकडे टपाल विभाग मात्र माहिती तंत्रज्ञान क्षेत्रापासून अद्यापही कोसो दूर असल्याचे चित्र आहे.रेल्वे गाड्या बंद असल्यामुळे दररोज जा-ये करणाऱ्या टपालामुळे विलंब लागत आहे. रेल्वेऐवजी आता खाजगी वाहनातून स्वखर्चाने टपाल पाठविला जात आहे. परिणामी एक ते दोन दिवसाआड टपाल जातो.चाळीसगाव मुख्य पोस्ट कार्यालयात एकूण १० पोस्टमन आहेत. शहरात पाडलेल्या झोननुसार नियमित वाटप केले जाते. तसेच एकूण ३५ कर्मचारी कार्यरत आहे. पुरेसे मनुष्यबळ असल्याने कामात अडचण भासत नाही.सध्याचा जमाना हा इंटरनेट, ई-मेल आणि सोशल नेटवर्किंगचा आहे. प्रिय व्यक्तीशी संपर्क करणे अगदी एका क्लिकवर आले आहे. मात्र हा संपर्क सोपा झाला असला तरी त्यातला जिव्हाळा कमी झाल्याचे जाणवते. त्यामुळे टपाल विभागाला आता कात टाकण्याची गरज आहे.व्हाट्सएपच्या ग्रुपमुळे अनेकांची झाली सोयपोस्टमास्तर शिवदास बडगुजर यांनी ग्राहकांचा व्हाट्सएपचा ग्रुप तयार केला आहे. ज्येष्ठ नागरिक, कोविड रुग्णांना पोस्ट खात्यातून रक्कम काढावयाची असल्यास त्यांनी ग्रुपवर मेसेस टाकल्यास त्या ग्राहकांना पोस्टमनच्या माध्यमातून घरपोच पैसे पाठविण्याची उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचा अनेक ग्राहक लाभ घेत आहेत. पोस्टमास्तर बडगुजर यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.वडीलधाऱ्यांना नमस्कार व घरातील छोट्यांना गोड गोड पापा..कबूतर जा जा... कबूतर जा जा... असे म्हणत चिठ्ठी पाठवणे. तसेच घोड्यावरून विशेष दूतामार्फत निरोप पाठवणे ही प्रथा कालबाह्य ठरुन टपालसेवेचा जन्म झाला. सध्याच्या युगात तर मोबाईल सेवा व तंत्रज्ञानाच्या वापरामुळे जग आगदी जवळ आले आहे व टपाल सेवेचा विसरच पडून गेला. सध्याचे चित्र असे आहे की टपाल कार्यालयाऐवजी सर्व व्यवहार मेल व इतर तंत्रज्ञानाचा वापर करून केले जातात.सद्य:स्थितीत पोस्टकार्ड, आंतरदेशीय पत्रे कमी झाले असले तरी रजिस्टर, स्पीडपोस्ट व पार्सलची संख्या वाढली आहे. आवश्यक टपाल बंद झालेला नाही. याबरोबरच पोस्टात अनेक सुविधा उपलब्ध झाल्यामुळे ग्राहकांचा विश्वास अधिकाधिक वाढला आहे.-शिवदास एकनाथ बडगुजर, पोस्टमास्तर, मुख्य पोस्ट, चाळीसगाव 

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसChalisgaonचाळीसगाव