शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

विकास होण्यासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:11 IST

कुऱ्हा काकोडा, ता. मुक्ताईनगर : गट ग्रामपंचायत असल्यामुळे लालगोटा येथे अनेक वर्षांपासून विविध विकास कामे खोळंबली आहेत. शासकीय योजनांचा ...

कुऱ्हा काकोडा, ता. मुक्ताईनगर : गट ग्रामपंचायत असल्यामुळे लालगोटा येथे अनेक वर्षांपासून विविध विकास कामे खोळंबली आहेत. शासकीय योजनांचा लाभ सुद्धा योग्य प्रमाणात मिळत नसल्याने गावाचा विकास थांबला आहे. विकासाचा प्रवाह पुन्हा आदिवासी समाजापर्यंत पोहचण्यासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी, अशी मागणी लालगोटा येथील आदिवासी बांधवांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.

मुक्ताईनगर मतदार संघातील विकासापासून वंचित असलेल्या आदिवासी, भटक्या विमुक्तांच्या गावांना भेट देऊन तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि तत्काळ समस्यांचे निराकरण करण्यासाठी आमदार आपल्या दारी हा उपक्रम आमदार चंद्रकांत पाटील यांच्यामार्फत सुरू आहे. यावेळी ही मागणी करण्यात आली.

या उपक्रमांतर्गत आमदार पाटील यांनी मदापुरी, जोंधनखेडा, राजुरा पावरी वाडा, धुळे पाडा, लालगोटा, हलखेडा आदी आदिवासी गावांना भेटी देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. लालगोटा भेटीत तेथील फासेपारधी आदिवासी बांधवांनीसुद्धा गावातील समस्यांचा पाढा वाचला. लालगोटा व हलखेडा ही दोन गावे मिळून एक ग्रामपंचायत आहे. दोन्ही गावांमधील अंतर सुमारे साडेचार ते पाच किमी आहे. ग्रामपंचायत कार्यालय हलखेडा येथे असून दाखले, उतारे घेण्यासाठी लालगोट्याच्या नागरिकांची पायपीट होते. अपंग आणि वृद्धांचे तर फारच हाल होतात.

विशाल पवार, केवळदास पवार, जोगिंदर भोसले, बल्लू भोसले, भगवान भोसले, केनसिंग भोसले, शरबतलाल पवार, इजानन पवार, मोंटूस पवार, शेरसिंग भोसले, रंजित पवार, सोद्यासिंग पवार, वडल चव्हाण, बबूआ भोसले, फुटास भोसले, डॉन पवार, दुर्योधन पवार, अक्काबाई भोसले, फायलनबाई पवार, पठूडाबाई भोसले, पांडा भोसले, रामद्याबाई पवार, लस्कामाम भोसले, शर्मिला भोसले, किशोर चव्हाण, तिगडी भोसले, नेकुल चव्हाण, आचेलाल भोसले, शिकर पवार, आदेश पवार यांच्यासह अनेक आदिवासींनी आमदार पाटील यांच्याकडे स्वतंत्र ग्राम पंचायतची मागणी केली

गावात आहेत अनेक समस्या

विकास कामांचा निधी या दोन्ही गावांमध्ये विभाजित होतो त्यामुळे लालगोटा गावावर नेहमीच अन्याय होतो. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. रस्ते, गटारी नाहीत. दिवाबत्तीची समस्या आहे. लालगोट्यात आजही शौचालये खूप कमी आहेत. घरकुल लाभापासून अनेक कुटुंब वंचित आहेत. शिक्षणाची वाटसुद्धा बिकट आहे.