शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
3
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
4
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
5
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
6
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
7
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
8
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
9
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
10
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
11
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
12
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
13
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
14
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
15
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
16
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
17
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
18
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
19
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
20
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर

शहराचे प्रदूषण रोखण्यासाठी ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:12 IST

केंद्राच्या समितीने मनपा प्रशासनाला दिल्या सूचना : शहराच्या प्रदूषणाबाबत व्यक्त केली नाराजी लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील वातावरणात ...

केंद्राच्या समितीने मनपा प्रशासनाला दिल्या सूचना : शहराच्या प्रदूषणाबाबत व्यक्त केली नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील वातावरणात मोठ्या प्रमाणात धूलिकणांचे प्रमाण वाढत असून, हवेची गुणवत्तादेखील खराब होत आहे. यावर आता केंद्राच्या समितीनेदेखील नाराजी व्यक्त केली असून, शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी लवकरात लवकर ॲक्शन प्लॅन तयार करण्याचा सूचना केंद्राच्या समितीने मनपा प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच लवकरात लवकर हवेचे प्रदूषण कसे कमी होईल यावर चांगल्या पद्धतीने काम करण्याचा सूचनाही या समितीच्या सदस्यांनी मनपा प्रशासनाला दिल्या आहेत.

केंद्राच्या शहरी विकास मंत्रालयाकडून समितीने मंगळवार व बुधवार हे दोन दिवस मनपाला भेट दिली. या समितीमध्ये केंद्र शासनाच्या शहरी विकास मंत्रालयातील एका नोडल अधिकाऱ्यासह प्रदूषण महामंडळ व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या काही प्राध्यापकांचादेखील समावेश होता. या समितीच्या सदस्यांनी मंगळवारी मनपा उपायुक्त प्रशांत पाटील यांच्याशीदेखील चर्चा केल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली आहे.

हवेची गुणवत्ता सुधारा, केंद्राकडून फंड घ्या

जळगाव शहरातील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत आहे. यावर मनपा प्रशासनाने काम करण्याची गरज आहे, अशा सूचना या समितीच्या सदस्यांनी दिल्या. तसेच मनपा प्रशासनाने हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी चांगले काम केले व येत्या काही महिन्यांत तसे बदल जाणवले तर शासनाकडून मिळणाऱ्या वेगवेगळ्या फंडाचा लाभदेखील महापालिकेला मिळू शकतो, असेही या समितीतील सदस्यांनी मनपा अधिकाऱ्यांना सांगितले आहे.

हवेची गुणवत्ता या कारणांमुळे झाली खराब

१. शहरात गेल्या काही वर्षांपासून अमृत अंतर्गत पाणीपुरवठा व भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. यामुळे उडणाऱ्या धुळीमुळे झाला परिणाम.

२. शहरातील रस्त्यांची स्थिती अतिशय खराब झाली असून, या खराब रस्त्यांमुळे धूलिकणांच्या प्रमाणात झाली वाढ.

३. शहरात गेल्या काही वर्षांत नवीन बांधकामे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. त्याचाही झाला परिणाम.

४. यासह मनपाचा घनकचरा प्रकल्पाचे कामदेखील ९ वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे या ठिकाणच्या लाखो टन कचऱ्याला आग लागत असून, आगीतून निघणाऱ्या धुरामुळे हवेची गुणवत्ता खराब होत आहे.

घनकचरा प्रकल्पाची केली पाहणी

समितीच्या सदस्यांनी बुधवारी मनपाच्या आव्हाणे शिवारातील बंद पडलेल्या घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. तसेच अनेक वर्षांपासून हे काम बंद असल्याचे कळल्यानंतर समितीच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. लवकरात लवकर हे काम सुरू करण्याचा सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या.