शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

पाच लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर होणार कपाशीची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : यंदादेखील मान्सून सरासरी एवढा राहणार असल्याचा अंदाज असल्याने बळीराजा खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : यंदादेखील मान्सून सरासरी एवढा राहणार असल्याचा अंदाज असल्याने बळीराजा खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. यावर्षी कापसाच्या लागवड क्षेत्रात पाच टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज असून, पाच लाख ३५ हजार क्षेत्रावर कपाशीची लागवड होऊ शकते. यासोबतच सोयाबीनच्या क्षेत्रातदेखील वाढ‌ होण्याचा अंदाज आहे.

कृषी विभागाने खरीप हंगामासाठी पीक पेरणी, बी- बियाणे आणि खत नियोजन पूर्ण केले आहे. यंदाच्या खरीप हंगामात गतवर्षाच्या तुलनेत चार ते पाच टक्के पिकाखालील क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात खरिपाचे मुख्य पीक हे कापसाचे आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात पाच लाख २० हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली होती. यंदा यात वाढ होऊन हे क्षेत्र पाच लाख ३४ हजार हेक्टरपर्यंत कपाशीची लागवड होण्याचा अंदाज आहे.

जिल्ह्यात यंदा ९८ टक्के पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे कृषी विभागाने खरिपाच्या नियोजनात लागवडीखालील क्षेत्रात पाच टक्के वाढ केली आहे. खरिपासाठी गेल्या वर्षी सात लाख ७५ हजार ५५० हेक्टरमध्ये वाढ करून हे क्षेत्र यावर्षी सात लाख ७८ हजार ६०० हेक्टरवर पेरणीचे नियोजन केले आहे.

२६ लाखांवर कपाशी बियाणाची पाकिटे

जिल्ह्यात २६ लाख ५२ हजार ६०० पाकिटे कपाशी बियाणाचे नियोजन असून, १ लाख ३३ हजार मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध आहे. शिवाय ११ हजार ९४५ मे. टन खतांचा बफर स्टॉक करण्यात येणार आहे.

१६ भरारी पथकांची स्थापना

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व निविष्ठांची सुलभ वाहतूक आणि पुरवठा करण्यासाठी नियंत्रण कक्ष सक्रिय ठेवणे, बियाणे, खते व कीटकनाशके यांची गुणवत्ता व पुरवठ्याच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणीचे तत्काळ निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. यासोबतच जिल्हा स्तरावर एक व प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे एकूण १६ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.