शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

ओलाव्याचे कारण सांगत कापसाची खरेदी थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 12:17 IST

गरजू शेतकऱ्यांना नाईलाजास्तव कमी दरात विकावा लागतोय माल : निर्यात थांबल्याने भावही स्थिर

अजय पाटील जळगाव : राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे सध्या बाजारात आलेल्या कापसात काही अंशी ओलावा आढळत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून एकतर शेतकºयांचा कापूस खरेदी केला जात नाही किंवा केला तर हमीभावापेक्षा तब्बल एक ते दीड हजार रुपये कमी दराने खरेदी केला जात आहे.यंदा खान्देशात ७ लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. सप्टेंबरपर्यंत मान्सून चांगला झाल्यामुळे उत्पादनात वाढ होवून शेतकºयांना यंदा ‘अच्छे दिन’ येतील अशी अपेक्षा होती. मात्र, आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले.पावसामुळे कापूस ओला झाला असून, शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे कापूस वेचणी देखील थांबली होती. आता काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्यामुळे कापूस वेचणी सुरु झाली असली तरी मात्र कापसात काही प्रमाणात ओलावा पहायला मिळत आहे.कमी भावात विक्री करावा लागतोय कापूससध्या लग्नसराईचे दिवस आहेत. त्यामुळे अनेक शेतकºयांना कमी दरात कापूस विक्री करावा लागत आहे. कापसात ओलावा असल्याने एकतर जीनचालक कापूस खरेदी करण्यास नकार देत आहेत.अन्यथा कमी दराने हा कापूस खरेदी करत आहेत. कमी दरात कापूस विक्री करण्याची शेतकºयांची यंदा मजबुरी आहे.ओल्या कापसामुळे सीसीआयची पिछेहाटसीसीआयकडून राज्यात ९० खरेदी केंद्र सुरु करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, नोव्हेंबर महिना अर्धा संपून देखील खरेदी केंद्र सुरु करण्यात आलेले नाहीत. सीसीआयच्या अधिकाºयांकडून जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील जिनींगवर येणाºया मालाची पाहणी केली असता, कापसात ओलावा जास्त असल्याने सीसीआयच्या निकषात कापूस बसत नाही. त्यामुळे जोपर्यंत १० टक्क्यांपेक्षा आर्द्रतामुक्त कापूस बाजारात येत नाही तो पर्यंत खरेदी केंद्र सुरु करणार नसल्याची माहिती सीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे.मूग, उडीदसाठी शासकीय केंद्रापेक्षा खासगी व्यापाºयांना शेतकºयांची पसंतीजिल्ह्यात मूग व उडीद खरेदीसाठी १५ खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहेत. मात्र, या केंद्रावर केवळ नाममात्र खरेदी सुरु असल्याची माहिती प्रकल्प संचालक परिमल साळुंखे यांनी दिली. खासगी व्यापाºयांकडे हमीभावापेक्षा जास्त भावाने खरेदी होत असल्याने शेतकरी शासकीय खरेदीपेक्षा खासगी व्यापाºयांकडेच माल विक्री करत आहेत. दरम्यान, ज्वारी, मका व सोयाबीनसाठीही शासकीय खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार आहे. यासाठी नावनोंदणी सुरु झाल्याची माहिती त्यांनी दिली.निर्यातही थांबली, भावातही वाढ नाहीआंतरराष्टÑीय बाजारात भारत हा मुख्य कापूस निर्यातदार देश आहे. दक्षिण आशियातील व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशियासह, शेजारील चीन व बांग्लादेश या देशांना भारताकडूनच कापसाची निर्यात केली जाते. मात्र, या देशांना सध्या भारताचा कापूस महाग पडत असल्याने या देशांनी भारताकडून होणारी आवक थांबवली आहे. त्याऐवजी ब्राझील व , आॅस्ट्रेलिया, अमेरिकेकडून कापूस आयात केला जात आहे.आंतरराष्टÑीय बाजारात खंडीचे भाव ३८ हजार इतके सुरु आहेत. त्या तुलनेत भारतात खंडीचे दर ३९ हजार इतके आहेत. कापूस निर्यात करताना निर्यातदार ४२ हजार रुपयांच्या पुढे दर लावतात. मात्र, इतर देशांचे खंडीचे दर ३८ हजार किंवा त्यापेक्षा कमी असल्याने भारताच्या कापसाऐवजी इतर देशाच्या कापसाला प्रमुख निर्यातदार देश प्राधान्य देत आहेत.भारतात देखील कापसाची आवक कमी आहे. ओलावा असल्याने शेतकरी कापूस विक्रीसाठी आणत नाही किंवा जिनर्स ते खरेदी करत नाही. त्यामुळे कापसाची आवकच नसल्याने खंडीचे दर देखील कमी होत नाही. खंडीचे दर कमी झाले निर्यात वाढेल व कापसाची मागणी वाढल्यास भावातही वाढ होईल. मात्र, सध्या तरी हे चित्र पहायला मिळत नसल्याने भावात अजून डिसेंबर अखेरपर्यंत वाढ होण्याची शक्यता कमीच आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव