शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

खान्देशात मध्य प्रदेशातील कापसाची आयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 18:40 IST

यंदा गणेशोत्सवात कापसाचा मुहूर्त साधणाऱ्या कापसाच्या खासगी बाजारपेठेत कापसाची आवक नसल्याने मुहूर्तावर जीनिंग सुरू करणाºया व्यापाºयांना कापसाची तीव्र टंचाई जाणवत आहे. परिणामी मध्य प्रदेशातील कापसाचा आधार घेतला जात आहे.

ठळक मुद्देजिनिंगचालकांना कापसाची टंचाईअपूर्ण उत्पादनाचा बसणार फटकाकापसाची अजूनही प्रतीक्षाच

मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : यंदा गणेशोत्सवात कापसाचा मुहूर्त साधणाऱ्या कापसाच्या खासगी बाजारपेठेत कापसाची आवक नसल्याने मुहूर्तावर जीनिंग सुरू करणाºया व्यापाºयांना कापसाची तीव्र टंचाई जाणवत आहे. परिणामी मध्य प्रदेशातील कापसाचा आधार घेतला जात आहे. दररोज चार हजार क्विंटलपेक्षा अधिक प्रमाणात मध्य प्रदेशातून कापूस जळगाव जिल्ह्यात आयात केला जात आहे.खान्देशातील कापसाच्या खासगी बाजारपेठेत काही निवडक व्यापारी वगळता जवळपास संपूर्ण बाजारपेठेत दुर्गाेत्सव व दसºयाला मुहूर्त साधून कापसाची खरेदी सुरू होते आणि येथूनच कापूस प्रक्रिया उद्योगात जिनिग व प्रेसिंग सुरू होतात. यंदा गणेशोत्सवातच अनेकांनी मुहूर्त साधल्याने जिनिंग ही लवकर सुरू झाल्या, परंतु बाजारपेठेत शेतकºयांच्या कापसाची आवक नसल्याने कापसाची बाजारपेठ मुहूर्तावरच मंदावली आहे.खान्देशात कापूस उत्पादनात घटखान्देशात पावसाअभावी दुष्काळाचे सावट आहे. पाऊस नसल्याने कापसाच्या पिकाला मार बसला व उत्पन्न लांबले, तर बोंडअळी संकटाने उत्पन्न घटण्याचे चिन्हे आहेत तर अद्यापही पावसाची निकड कायम आहे.जाणकारांच्या म्हणण्यानुसार, वेळेवर पाऊस झाला नसल्याने पाण्याअभावी पूर्ण पोषण अगोदरच कैºया फुटत असल्याने यंदा कापसाच्या उत्पादनात २० ते २५ टक्के घट राहणार आहे. अशात हंगामाच्या प्रारंभी कापसाची आवक नसल्याने जिनिंगवर कापसाची टंचाई जाणवू लागली आहे. किमान १० ते १२ दिवस अशी परिस्थिती राहण्याचे भाकीत जाणकार व्यक्त करीत आहेत.सीसीआई व पणनच्या शासकीय खरेदीची वाट पाहणाºया शेतकºयांना कापूस खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.नर्मदा काठावर कापूस जोरातमध्य प्रदेशात सेंधवा, खरगोन, बडवाह, सनावद अशा नर्मदाकाठच्या भागात खान्देशपेक्षा १५ दिवस अगोदर कापूस जोमाने निघाला आहे, परंतु या कापसाची आर्द्रता सामान्यापेक्षा दुप्पट व तिप्पट आहे.पाठोपाठ उत्पादन जोमात असल्याने दिवसाला ४० हजार क्विंटल तेथील बाजारपेठेत आवक गाठत आहे. मध्य प्रदेशातही अद्याप सीसीआयची कापूस खरेदी सुरू झालेली नाही आणि अधिकच्या आर्द्रतेचा कापूस शासन घेत नाही. वरतून आवक जास्त असल्याने जास्त मॉइश्चर (आद्रता) असलेल्या कापसाला घट जोरात बसते. यामुळे या भागात चार हजार दोनशे ते साडेचार हजार रुपये क्विंटल भाव मिळत आहे. इकडे जळगाव जिल्ह्यात कास्तकारांकडे अद्याप कापूस आला नाही. ज्या शेतकºयांकडे आहे ते शासकीय कापूस खरेदीची वाट पाहत आहे. परिणामी बाजारपेठेत कापसाची आवक रोडवल्याने जिनिंग बंद ठेवण्यापेक्षा नाईलाजाने मध्य प्रदेशातील हा जास्त मॉइश्चर असलेला कापूस खरेदी करून वेळ भागविली जात आहे व त्यास अठ्ठेचाळीसशे ते पाच हजारांचा भाव दिला जात आहे. दररोज तीन ते चार हजार क्विंटल कापूस मध्य प्रदेशातून बोदवड, जामनेर, मलकापूर, धरणगाव, भुसावळ तालुक्यांसह खान्देशातील जिनिंगवर येत आहे. हाच कापूस वाळवून जिनिंगवर वापरला जात आहे.मध्य प्रदेशातील नर्मदा काठच्या पट्ट्यात १५ दिवस अगोदर कापूस येतो व त्याचा आर्द्रता वजा ओलावा सामन्यापेक्षा बरीच जास्त आहे. यंदा तेथे मागणीपेक्षा अधिक उत्पादन दिसून येत आहे आणि आपल्याकडे सध्या आवक कमी आहे. जीनिंग बंद ठेवण्यापेक्षा हा कापूस वापरून तुटीतून मार्ग काढत कामकाज पुढे रेटले जात आहे.-ललित कुमार भुरडजिनिंगचालक, कुºहे पानाचे, ता.भुसावळ 

टॅग्स :cottonकापूसMuktainagarमुक्ताईनगर