शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

खान्देशात मध्य प्रदेशातील कापसाची आयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 18:40 IST

यंदा गणेशोत्सवात कापसाचा मुहूर्त साधणाऱ्या कापसाच्या खासगी बाजारपेठेत कापसाची आवक नसल्याने मुहूर्तावर जीनिंग सुरू करणाºया व्यापाºयांना कापसाची तीव्र टंचाई जाणवत आहे. परिणामी मध्य प्रदेशातील कापसाचा आधार घेतला जात आहे.

ठळक मुद्देजिनिंगचालकांना कापसाची टंचाईअपूर्ण उत्पादनाचा बसणार फटकाकापसाची अजूनही प्रतीक्षाच

मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : यंदा गणेशोत्सवात कापसाचा मुहूर्त साधणाऱ्या कापसाच्या खासगी बाजारपेठेत कापसाची आवक नसल्याने मुहूर्तावर जीनिंग सुरू करणाºया व्यापाºयांना कापसाची तीव्र टंचाई जाणवत आहे. परिणामी मध्य प्रदेशातील कापसाचा आधार घेतला जात आहे. दररोज चार हजार क्विंटलपेक्षा अधिक प्रमाणात मध्य प्रदेशातून कापूस जळगाव जिल्ह्यात आयात केला जात आहे.खान्देशातील कापसाच्या खासगी बाजारपेठेत काही निवडक व्यापारी वगळता जवळपास संपूर्ण बाजारपेठेत दुर्गाेत्सव व दसºयाला मुहूर्त साधून कापसाची खरेदी सुरू होते आणि येथूनच कापूस प्रक्रिया उद्योगात जिनिग व प्रेसिंग सुरू होतात. यंदा गणेशोत्सवातच अनेकांनी मुहूर्त साधल्याने जिनिंग ही लवकर सुरू झाल्या, परंतु बाजारपेठेत शेतकºयांच्या कापसाची आवक नसल्याने कापसाची बाजारपेठ मुहूर्तावरच मंदावली आहे.खान्देशात कापूस उत्पादनात घटखान्देशात पावसाअभावी दुष्काळाचे सावट आहे. पाऊस नसल्याने कापसाच्या पिकाला मार बसला व उत्पन्न लांबले, तर बोंडअळी संकटाने उत्पन्न घटण्याचे चिन्हे आहेत तर अद्यापही पावसाची निकड कायम आहे.जाणकारांच्या म्हणण्यानुसार, वेळेवर पाऊस झाला नसल्याने पाण्याअभावी पूर्ण पोषण अगोदरच कैºया फुटत असल्याने यंदा कापसाच्या उत्पादनात २० ते २५ टक्के घट राहणार आहे. अशात हंगामाच्या प्रारंभी कापसाची आवक नसल्याने जिनिंगवर कापसाची टंचाई जाणवू लागली आहे. किमान १० ते १२ दिवस अशी परिस्थिती राहण्याचे भाकीत जाणकार व्यक्त करीत आहेत.सीसीआई व पणनच्या शासकीय खरेदीची वाट पाहणाºया शेतकºयांना कापूस खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.नर्मदा काठावर कापूस जोरातमध्य प्रदेशात सेंधवा, खरगोन, बडवाह, सनावद अशा नर्मदाकाठच्या भागात खान्देशपेक्षा १५ दिवस अगोदर कापूस जोमाने निघाला आहे, परंतु या कापसाची आर्द्रता सामान्यापेक्षा दुप्पट व तिप्पट आहे.पाठोपाठ उत्पादन जोमात असल्याने दिवसाला ४० हजार क्विंटल तेथील बाजारपेठेत आवक गाठत आहे. मध्य प्रदेशातही अद्याप सीसीआयची कापूस खरेदी सुरू झालेली नाही आणि अधिकच्या आर्द्रतेचा कापूस शासन घेत नाही. वरतून आवक जास्त असल्याने जास्त मॉइश्चर (आद्रता) असलेल्या कापसाला घट जोरात बसते. यामुळे या भागात चार हजार दोनशे ते साडेचार हजार रुपये क्विंटल भाव मिळत आहे. इकडे जळगाव जिल्ह्यात कास्तकारांकडे अद्याप कापूस आला नाही. ज्या शेतकºयांकडे आहे ते शासकीय कापूस खरेदीची वाट पाहत आहे. परिणामी बाजारपेठेत कापसाची आवक रोडवल्याने जिनिंग बंद ठेवण्यापेक्षा नाईलाजाने मध्य प्रदेशातील हा जास्त मॉइश्चर असलेला कापूस खरेदी करून वेळ भागविली जात आहे व त्यास अठ्ठेचाळीसशे ते पाच हजारांचा भाव दिला जात आहे. दररोज तीन ते चार हजार क्विंटल कापूस मध्य प्रदेशातून बोदवड, जामनेर, मलकापूर, धरणगाव, भुसावळ तालुक्यांसह खान्देशातील जिनिंगवर येत आहे. हाच कापूस वाळवून जिनिंगवर वापरला जात आहे.मध्य प्रदेशातील नर्मदा काठच्या पट्ट्यात १५ दिवस अगोदर कापूस येतो व त्याचा आर्द्रता वजा ओलावा सामन्यापेक्षा बरीच जास्त आहे. यंदा तेथे मागणीपेक्षा अधिक उत्पादन दिसून येत आहे आणि आपल्याकडे सध्या आवक कमी आहे. जीनिंग बंद ठेवण्यापेक्षा हा कापूस वापरून तुटीतून मार्ग काढत कामकाज पुढे रेटले जात आहे.-ललित कुमार भुरडजिनिंगचालक, कुºहे पानाचे, ता.भुसावळ 

टॅग्स :cottonकापूसMuktainagarमुक्ताईनगर