शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

विद्युतखांब हटविण्यासाठी मनपाचाच निधी होणार खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामासाठी अडथळा ठरत असलेले विद्युतखांब हटविण्यासाठी लागणारा निधी मनपाकडूनच दिला जाणार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामासाठी अडथळा ठरत असलेले विद्युतखांब हटविण्यासाठी लागणारा निधी मनपाकडूनच दिला जाणार आहे. २५ कोटी रुपयांच्या निधीतून शिल्लक असलेल्या ३ कोटींपैकी दीड कोटी रुपयांचा निधी विद्युतखांब हटविण्यासाठी महावितरणकडे वर्ग केला जाणार आहे. यासाठी राज्य शासनाची मंजुरी आवश्यक आहे. त्यासाठी मनपाकडून गेल्याच आठवड्यात राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी दिली आहे.

विद्युतखांबांचे स्थलांतर गेल्या आठ महिन्यांपासून रखडले आहे. हे काम होत नसल्याने पुलाचे पुढील कामदेखील थांबले आहे. मात्र, हे काम करण्यासाठी निधी कोण देईल, यावर अनेक महिने विचारमंथन, टोलवाटोलवी सुरू होती. अखेर आता मनपा प्रशासनाकडूनच हा निधी दिला जाणार आहे. हा पूल जरी बांधकाम विभागाच्या अखत्यारित येत असला तरी मनपाकडे असलेला निधीदेखील राज्य शासनाकडूनच प्राप्त झाला होता म्हणून आता २५ कोटी रुपयांमधील शिल्लक रकमेतूनच हा निधी दिला जाणार आहे. दरम्यान, राज्य शासनाकडे मनपाने पाठविलेल्या प्रस्तावाला लवकरात लवकर मंजुरी मिळावी यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री अशोक चव्हाण यांचीदेखील भेट घेणार आहेत. पुढील आठवड्यापर्यंत या निधीला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. मंजुरी मिळाल्यानंतर महावितरणमार्फत विद्युतखांब हटविण्याचा कामाला सुरुवात होणार आहे.