शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
6
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
7
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
8
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
9
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
10
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
11
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
12
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
13
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
14
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
15
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
16
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
17
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
18
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
19
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
20
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट

हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी मनपाची त्रिसूत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:12 IST

केंद्राकडे पाठविण्यात येणार अहवाल : अंमलबजावणीची मात्र प्रतीक्षा लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात गेल्या दोन वर्षांमध्ये प्रदूषणाचा स्तर ...

केंद्राकडे पाठविण्यात येणार अहवाल : अंमलबजावणीची मात्र प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात गेल्या दोन वर्षांमध्ये प्रदूषणाचा स्तर वाढला असून, यामध्ये वातावरणात धूलिकणांचे प्रमाण हे धोकादायक पातळीपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. त्यातच गेल्या आठवड्यात केंद्र शासनाच्या समितीने शहरात पाहणी करून शहरात वाढलेल्या प्रदूषणाच्या स्तराबाबत नाराजी व्यक्त करून, मनपाला ॲक्शन प्लॅन तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मनपा प्रशासनाने शहरातील वाढत जाणारे हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी त्रिसूत्री तयार करण्यात आली असून, याबाबतचा अहवाल केंद्राकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मनपाने जरी ॲक्शन प्लॅन तयार केला असला, तरी मनपाकडून या ॲक्शन प्लॅनची अंमलबजावणी केव्हा होईल, याची प्रतीक्षा मात्र कायम आहे. जळगावकर गेल्या दोन वर्षांपासून धूळ, धूर आणि चिखलाने त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत मनपा प्रशासन केवळ नावालाच ॲक्शन प्लॅन केंद्राकडे सादर करून, अंमलबजावणीपासून पळ तर काढणार नाही ना? असा प्रश्न यामुळे निर्माण होत आहे.

काय आहे ॲक्शन प्लॅन

१. शहरात धुळीचे प्रमाण खूप वाढल्याने शहराच्या हवेच्या गुणवत्तेमध्ये परिणाम झाला आहे. धूलिकणांचे प्रमाण हे ६० टक्क्यांवरून ९० टक्क्यांपर्यंत पोहचले आहे. यासाठी शहरातील खराब रस्तेच कारणीभूत असून, सप्टेंबर महिन्यानंतर शहरात नवीन डांबरी रस्ते तयार करून, ज्या ठिकाणी गरज आहे. त्याठिकाणी फुटपाथ तयार करण्याची संकल्पना मनपाकडून करण्यात आली आहे. तसेच काही उपनगरांमध्ये कॉंक्रिटच्या रस्त्याचेही नियोजन आहे.

२) जळगाव शहरात घाणीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर असल्याची तक्रार केंद्रीय पथकाने केली होती. यावरदेखील महानगरपालिकेने तोडगा काढायचे निश्चित केले आहे. ज्यामध्ये महापालिकेनुसार जळगाव शहरात आता घंटागाड्यांची संख्या वाढविली जाणार आहे. तसेच बंद असलेला घनकचरा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर धुराची समस्यादेखील मार्गी लावण्याची तयारी मनपाने केली आहे.

३) अमृत योजनेअंतर्गत शहरात २६ ठिकाणी ऑक्सिजन पार्क तयार करण्यात आले असून, त्या ठिकाणी आधीच ४ ते ५ फुटांचे वृक्ष लावण्यात आले होते. येत्या वर्षभरात शहरातील अनेक भागात रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लावण्याची तयारी मनपाकडून करण्यात आली आहे. तसेच मोकळ्या जागेवर अजून ऑक्सिजन पार्कची संख्या वाढविण्यावर मनपाचा भर राहणार आहे.