शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

‘त्या’ २० किमीच्या रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्याची मनपाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:20 IST

अंदाज समितीच्या आदेशानंतर मनपा प्रशासन लागले कामाला : हॉकर्ससह पक्क्या बांधकामाबाबतचेही होणार मोजमाप लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातून ...

अंदाज समितीच्या आदेशानंतर मनपा प्रशासन लागले कामाला : हॉकर्ससह पक्क्या बांधकामाबाबतचेही होणार मोजमाप

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातून गेलेले २० किमीचे रस्ते महापालिकेकडेच असल्याचे शासनाच्या अंदाज समितीने निश्चित केल्यानंतर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मागणीनुसार या रस्त्यांवरचे अतिक्रमण काढण्यासाठी मनपा प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. लवकरच हे अतिक्रमण काढून हे रस्ते बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

४ मे २०१७ रोजी राज्य शासनाच्या मनपाने केलेल्या ठरावानुसार शहरातून गेलेले २० किमीचे रस्ते बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या रस्त्यांवरील अतिक्रमण मनपाने काढले नसल्याने बांधकाम विभागाने हे रस्ते वर्ग केले नव्हते. शिवाजीनगर उड्डाणपुलालगत असलेले विद्युत खांब हटविण्यावरून मनपाकडून निधी देण्याचा प्रस्ताव महासभेत आल्यानंतर हे रस्ते बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असल्याचे कारण देत मनपा प्रशासनाचा प्रस्ताव महासभेत रद्द करण्यात आला होता. तेव्हापर्यंत मनपा प्रशासनाला हे रस्ते मनपा की बांधकाम विभागाच्या ताब्यात आहेत याबाबतची माहितीदेखील नव्हती. दरम्यान, आता अंदाज समितीने स्पष्ट केल्यानंतर मनपा प्रशासनाकडून या रस्त्यांवरच्या अतिक्रमणाचे मोजमाप केले जाणार आहे, या रस्त्यावर जे काही हॉकर्स व पक्के बांधकाम असेल ते काढण्यात येणार आहे.

मनपाला दिलेल्या पत्राची माहिती बांधकाम विभागाकडे नाहीच

बांधकाम विभागाने अतिक्रमण काढण्याबाबत मनपा प्रशासनाकडे पत्र पाठविल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, याबाबत बांधकाम विभागाकडून पत्र मागितल्यावर बांधकाम विभागाकडून टाळाटाळ केली जात आहे. विशेष म्हणजे मनपाच्या अधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाने अतिक्रमण काढण्यासंदर्भात कोणतेही पत्र मनपाकडे पाठविले नसल्याची माहिती दिली आहे, तर मनपाने मात्र बांधकाम विभागाला दिलेल्या पत्राची माहिती ‘लोकमत’ला दिली आहे. बांधकाम विभागाकडून पत्राची प्रत देण्याबाबत टाळटाळ का केली जात आहे? याबाबत शंका उपस्थित होत आहे.

कोणते अतिक्रमण बांधकाम विभागाने ठरविले कसे?

बांधकाम विभागाने मनपाला त्या २० किमीच्या रस्त्यावरचे अतिक्रमण काढण्यास सांगितले होते, असा दावा बांधकाम विभागाकडून केला जात आहे. मात्र, या रस्त्यांवर कोणते अतिक्रमण आहे याबाबतची कोणतीही माहिती बांधकाम विभागाने मनपाला दिलेली नाही. तसेच रस्त्यांवर अतिक्रमण आहे हे बांधकाम विभागाने कसे ठरविले हेदेखील स्पष्ट होत नाही. अंदाज समितीने जरी हा रस्ता अजूनही मनपाच्या हद्दीत असल्याचे सांगितले. मात्र, बांधकाम विभागाच्या भूमिकेवरून अजूनही हे स्पष्ट होताना दिसून येत नाही.

कोट..

याबाबत आधीही स्पष्ट केले आहे. की रस्त्यांच्या सुरुवातीपासूनचे आदेश, निर्णय याची तपासणी केल्यावरच या रस्त्यांबाबतची भूमिका स्पष्ट केली जाईल. त्याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

- सतीश कुलकर्णी, आयुक्त