शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

तिसऱ्या रेल्वेमार्गाच्या कामाला ‘कोरोनाची नजर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:15 IST

दिरंगाई : दोन वर्षात जळगाव ते शिरसोली पर्यंतच्या पहिल्या टप्प्याचेही काम पूर्ण नाही लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ...

दिरंगाई : दोन वर्षात जळगाव ते शिरसोली पर्यंतच्या पहिल्या टप्प्याचेही काम पूर्ण नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जळगाव ते मनमाडदरम्यान तिसऱ्या रेल्वेमार्गाचे काम हाती घेतल्यानंतर, जळगाव ते शिरसोलीपर्यंतचा पहिला टप्पा वर्षभरात पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र, कोरोनामुळे हे काम गेल्या वर्षी काही महिने बंद होते. तर सध्या कमी मजुरांअभावी हे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे कोरोनाचा या कामाला चांगलाच अडथळा येत आहे. दोन वर्षांत या कामाचा शिरसोलीपर्यंतचा पहिला टप्प्याही पूर्ण झाला नसल्याचे ‘लोकमत’ प्रतिनिधीने केलेल्या पाहणीतून समोर आले आहे.

रेल्वे बोर्डाने भुसावळ ते मनमाडदरम्यान तिसरा रेल्वेमार्ग उभारण्याच्या कामाला मंजुरी दिल्यानंतर, भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे सुरुवातीला भुसावळ ते भादली व भादली ते जळगावदरम्यान तिसरा रेल्वेमार्ग उभारण्याच्या कामाला प्रथम प्राधान्य दिले. यात दोन वर्षांपूर्वी भुसावळ ते भादलीदरम्यान बहुतांश काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने १ मे २०१९ रोजी पिंप्राळा रेल्वेगेटपासून जळगाव ते मनमाडदरम्यान तिसऱ्या रेल्वेमार्गाचा श्रीगणेशा केला होता. यात पहिला टप्पा जळगाव ते शिरसोलीदरम्यानचा ठरवून, वर्षभरात हे काम पूर्ण करण्यात येणार होते.

सहा महिन्यांतच सपाटीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले होते. त्यानंतर रूळ टाकण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार होती. मात्र, गेल्या वर्षी मार्च २०२० मध्ये कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर सात ते आठ महिने हे काम बंद होते.

इन्फो :

कोरोनामुळे दोन वेळा काम रखडले

१) तिसऱ्या रेल्वेमार्गातील शिरसोलीपर्यंतच्या पहिल्या टप्प्याचे काम १ मे २०१९ रोजी सुरू केले होते. भुसावळमधीलच एका खासगी मक्तेदाराकडून रेल्वे अधिकारी काम करून घेत आहेत. मे महिन्यात या कामाला सुरुवात झाल्यानंतर डिसेंबरपर्यंत बहुतांश ठिकाणी सपाटीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले.

२) ज्या ठिकाणी भूसंपादनाचा योग्य मोबदला न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी जमिनी दिलेल्या नाहीत. त्या ठिकाणी सपाटीकरण करण्यात आलेले नाही. डिसेंबर २०१९ पर्यंत बऱ्याच ठिकाणी सपाटीकरणाचे काम झाल्यानंतर रेल्वे प्रशासनातर्फे लोखंडी रूळ टाकण्यासाठी जागेचे मोजमाप व तांत्रिक बाबींची पूर्तता केली.

३) मार्च २०२० मध्ये रेल्वे प्रशासनातर्फे या मार्गावर रुळ टाकण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार होती. मात्र, मार्चमध्येच कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यातही आल्यानंतर हे काम बंद पडले. कामावरील सर्व परराज्यांतील मजूर गावाकडे परतले. त्यामुळे हे काम गेल्या वर्षी दिवाळीपर्यंत बंदच होते.

४) नोव्हेंबरपासून या ठिकाणी रूळ टाकण्याच्या कामाला पुन्हा सुरुवात झाली. गेल्या महिन्यात मार्चपर्यंत या ठिकाणी फक्त रूळ टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे; तर विद्युत खांब व इतर तांत्रिक काम रखडले आहे.

इन्फो :

... तर आणखी चार महिने लागणार

‘लोकमत’च्या प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत या ठिकाणी रूळ टाकण्याचे काम पूर्ण झाले असून, आता रेल्वे कर्मचाऱ्यांमार्फत रुळांमध्ये खडी टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, विद्युत खांब उभारणे, विद्युतीकरण करणे, सिग्नल यंत्रणा बसविणे, त्यानंतर रेल्वे इंजिन चालवून या मार्गाची चाचणी घेणे व इतर तांत्रिक बरीच कामे बाकी आहेत. त्यामुळे हे सर्व काम पूर्ण होण्यासाठी किमान चार महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

इन्फो :

कोरोनामुळे तिसऱ्या रेल्वेमार्गाच्या कामाला विलंब होत आहे. मात्र, तरीदेखील लवकरात लवकर शिरसोलीपर्यंतचा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

- पंकज ढावरे, उपमुख्य अभियंता, भुसावळ रेल्वे विभाग.