शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
3
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
4
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
5
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
6
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
7
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
8
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
9
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
10
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
11
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
12
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
13
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
14
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
15
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
16
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
17
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
18
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
19
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
20
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम

तिसऱ्या रेल्वेमार्गाच्या कामाला ‘कोरोनाची नजर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:15 IST

दिरंगाई : दोन वर्षात जळगाव ते शिरसोली पर्यंतच्या पहिल्या टप्प्याचेही काम पूर्ण नाही लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ...

दिरंगाई : दोन वर्षात जळगाव ते शिरसोली पर्यंतच्या पहिल्या टप्प्याचेही काम पूर्ण नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जळगाव ते मनमाडदरम्यान तिसऱ्या रेल्वेमार्गाचे काम हाती घेतल्यानंतर, जळगाव ते शिरसोलीपर्यंतचा पहिला टप्पा वर्षभरात पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र, कोरोनामुळे हे काम गेल्या वर्षी काही महिने बंद होते. तर सध्या कमी मजुरांअभावी हे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे कोरोनाचा या कामाला चांगलाच अडथळा येत आहे. दोन वर्षांत या कामाचा शिरसोलीपर्यंतचा पहिला टप्प्याही पूर्ण झाला नसल्याचे ‘लोकमत’ प्रतिनिधीने केलेल्या पाहणीतून समोर आले आहे.

रेल्वे बोर्डाने भुसावळ ते मनमाडदरम्यान तिसरा रेल्वेमार्ग उभारण्याच्या कामाला मंजुरी दिल्यानंतर, भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे सुरुवातीला भुसावळ ते भादली व भादली ते जळगावदरम्यान तिसरा रेल्वेमार्ग उभारण्याच्या कामाला प्रथम प्राधान्य दिले. यात दोन वर्षांपूर्वी भुसावळ ते भादलीदरम्यान बहुतांश काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने १ मे २०१९ रोजी पिंप्राळा रेल्वेगेटपासून जळगाव ते मनमाडदरम्यान तिसऱ्या रेल्वेमार्गाचा श्रीगणेशा केला होता. यात पहिला टप्पा जळगाव ते शिरसोलीदरम्यानचा ठरवून, वर्षभरात हे काम पूर्ण करण्यात येणार होते.

सहा महिन्यांतच सपाटीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले होते. त्यानंतर रूळ टाकण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार होती. मात्र, गेल्या वर्षी मार्च २०२० मध्ये कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर सात ते आठ महिने हे काम बंद होते.

इन्फो :

कोरोनामुळे दोन वेळा काम रखडले

१) तिसऱ्या रेल्वेमार्गातील शिरसोलीपर्यंतच्या पहिल्या टप्प्याचे काम १ मे २०१९ रोजी सुरू केले होते. भुसावळमधीलच एका खासगी मक्तेदाराकडून रेल्वे अधिकारी काम करून घेत आहेत. मे महिन्यात या कामाला सुरुवात झाल्यानंतर डिसेंबरपर्यंत बहुतांश ठिकाणी सपाटीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले.

२) ज्या ठिकाणी भूसंपादनाचा योग्य मोबदला न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी जमिनी दिलेल्या नाहीत. त्या ठिकाणी सपाटीकरण करण्यात आलेले नाही. डिसेंबर २०१९ पर्यंत बऱ्याच ठिकाणी सपाटीकरणाचे काम झाल्यानंतर रेल्वे प्रशासनातर्फे लोखंडी रूळ टाकण्यासाठी जागेचे मोजमाप व तांत्रिक बाबींची पूर्तता केली.

३) मार्च २०२० मध्ये रेल्वे प्रशासनातर्फे या मार्गावर रुळ टाकण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार होती. मात्र, मार्चमध्येच कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यातही आल्यानंतर हे काम बंद पडले. कामावरील सर्व परराज्यांतील मजूर गावाकडे परतले. त्यामुळे हे काम गेल्या वर्षी दिवाळीपर्यंत बंदच होते.

४) नोव्हेंबरपासून या ठिकाणी रूळ टाकण्याच्या कामाला पुन्हा सुरुवात झाली. गेल्या महिन्यात मार्चपर्यंत या ठिकाणी फक्त रूळ टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे; तर विद्युत खांब व इतर तांत्रिक काम रखडले आहे.

इन्फो :

... तर आणखी चार महिने लागणार

‘लोकमत’च्या प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत या ठिकाणी रूळ टाकण्याचे काम पूर्ण झाले असून, आता रेल्वे कर्मचाऱ्यांमार्फत रुळांमध्ये खडी टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, विद्युत खांब उभारणे, विद्युतीकरण करणे, सिग्नल यंत्रणा बसविणे, त्यानंतर रेल्वे इंजिन चालवून या मार्गाची चाचणी घेणे व इतर तांत्रिक बरीच कामे बाकी आहेत. त्यामुळे हे सर्व काम पूर्ण होण्यासाठी किमान चार महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

इन्फो :

कोरोनामुळे तिसऱ्या रेल्वेमार्गाच्या कामाला विलंब होत आहे. मात्र, तरीदेखील लवकरात लवकर शिरसोलीपर्यंतचा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

- पंकज ढावरे, उपमुख्य अभियंता, भुसावळ रेल्वे विभाग.