शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

कोरोना.. कोरोना करत सरले वर्ष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:13 IST

कोरोना म्हटले तरी धस्स व्हावे, अशी परिस्थिती जळगाव जिल्ह्यात निर्माण झाली होती. चीनमधील हा विषाणू भारतात येईल, महाराष्ट्रात येईल ...

कोरोना म्हटले तरी धस्स व्हावे, अशी परिस्थिती जळगाव जिल्ह्यात निर्माण झाली होती. चीनमधील हा विषाणू भारतात येईल, महाराष्ट्रात येईल आणि जळगावातही येईल, अशी कल्पनाही जानेवारीपर्यंत कोणाला नव्हती. मात्र, मार्चमध्ये या कोरोनाने तर थेट जळगावातच धडक दिली होती आणि अतिशय भयानक आणि दहशतीत पुढील काही महिने गेले. मे महिन्यात जिल्ह्याचा मृत्युदर थेट १२ टक्क्यांवर पोहोचला होता. मध्यंतरी बाधितांचे प्रमाण ३४ टक्क्यांवर गेले होते. अनेक तरुणांचा मृत्यू झाला. त्यानंतर मात्र, कोरोना आटोक्यात आला. मात्र, संपला नाही. त्यामुळे कोरोना कोरोना करत हे वर्ष संपले... एका नव्या विषाणूने मात्र आरोग्याचे महत्त्व सर्वांना पटवून दिले. अनेक स्वच्छतेच्या सवयी लावून दिल्या, अनेक मोठे बदल घडविले. कोरोनाने जिल्ह्यातील १३००वर नागरिक हिरावले.. तर ५५ हजारांपेक्षा अधिक लोकांना त्याची लागण झाली. मध्यंतरी प्रशासनाचे नियोजन, नागरिकांची भीती, वैद्यकीय सेवेचा सुधारलेला दर्जा आणि एकंदरीतच कोरोनाचा कमी झालेला संसर्ग यामुळे वर्षाचा शेवट मात्र दिलासादायक राहिला. मात्र, त्यातच डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून कोरोनाच्या नव्या रूपाचे भूत पुन्हा समोर आले आणि वर्षभरात आपण जो कोरोना अनुभव होतो, त्यापेक्षा हा वेगळा कोरोना एण्ट्री करेल का या भीतीने पुन्हा वातावरण भीतिमय झाले. त्यावर संशोधन, उपाययोजना सुरू असून, नवीन वर्षात लस कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. वर्ष सरत असताना वर्षाच्या शेवटी शेवटी जिल्ह्यात कोरोनाव्यतिरिक्त सुविधा सुरळीत झाल्या, ही एक महत्त्वाची व गरीब, गरजू रुग्णांसाठी दिलासादायक बाब राहिली. जळगाव शहर, अमळनेर, भुसावळ असे काही ठिकाणी हे कोरोनचे हॉटस्पॉट राहिले. या तीन भागांमध्येच जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्णांची नोंद आहे. जळगावपासून सुरुवात आणि अमळनेरपासून उद्रेक असा या कोरोनाने हळूहळू सर्व जिल्हा व्यापला होता... आता मात्र, रुग्ण कमी आणि भीतीही कमी असे चित्र आहे.