शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कोरोना.. कोरोना करत सरले वर्ष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:13 IST

कोरोना म्हटले तरी धस्स व्हावे, अशी परिस्थिती जळगाव जिल्ह्यात निर्माण झाली होती. चीनमधील हा विषाणू भारतात येईल, महाराष्ट्रात येईल ...

कोरोना म्हटले तरी धस्स व्हावे, अशी परिस्थिती जळगाव जिल्ह्यात निर्माण झाली होती. चीनमधील हा विषाणू भारतात येईल, महाराष्ट्रात येईल आणि जळगावातही येईल, अशी कल्पनाही जानेवारीपर्यंत कोणाला नव्हती. मात्र, मार्चमध्ये या कोरोनाने तर थेट जळगावातच धडक दिली होती आणि अतिशय भयानक आणि दहशतीत पुढील काही महिने गेले. मे महिन्यात जिल्ह्याचा मृत्युदर थेट १२ टक्क्यांवर पोहोचला होता. मध्यंतरी बाधितांचे प्रमाण ३४ टक्क्यांवर गेले होते. अनेक तरुणांचा मृत्यू झाला. त्यानंतर मात्र, कोरोना आटोक्यात आला. मात्र, संपला नाही. त्यामुळे कोरोना कोरोना करत हे वर्ष संपले... एका नव्या विषाणूने मात्र आरोग्याचे महत्त्व सर्वांना पटवून दिले. अनेक स्वच्छतेच्या सवयी लावून दिल्या, अनेक मोठे बदल घडविले. कोरोनाने जिल्ह्यातील १३००वर नागरिक हिरावले.. तर ५५ हजारांपेक्षा अधिक लोकांना त्याची लागण झाली. मध्यंतरी प्रशासनाचे नियोजन, नागरिकांची भीती, वैद्यकीय सेवेचा सुधारलेला दर्जा आणि एकंदरीतच कोरोनाचा कमी झालेला संसर्ग यामुळे वर्षाचा शेवट मात्र दिलासादायक राहिला. मात्र, त्यातच डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून कोरोनाच्या नव्या रूपाचे भूत पुन्हा समोर आले आणि वर्षभरात आपण जो कोरोना अनुभव होतो, त्यापेक्षा हा वेगळा कोरोना एण्ट्री करेल का या भीतीने पुन्हा वातावरण भीतिमय झाले. त्यावर संशोधन, उपाययोजना सुरू असून, नवीन वर्षात लस कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. वर्ष सरत असताना वर्षाच्या शेवटी शेवटी जिल्ह्यात कोरोनाव्यतिरिक्त सुविधा सुरळीत झाल्या, ही एक महत्त्वाची व गरीब, गरजू रुग्णांसाठी दिलासादायक बाब राहिली. जळगाव शहर, अमळनेर, भुसावळ असे काही ठिकाणी हे कोरोनचे हॉटस्पॉट राहिले. या तीन भागांमध्येच जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्णांची नोंद आहे. जळगावपासून सुरुवात आणि अमळनेरपासून उद्रेक असा या कोरोनाने हळूहळू सर्व जिल्हा व्यापला होता... आता मात्र, रुग्ण कमी आणि भीतीही कमी असे चित्र आहे.