शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

कोरोनाला ११११ गावांनी वेशीवरच रोखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 13:04 IST

जिल्ह्यातील ६०२ गावांमध्ये कमी अधिक रुग्ण : प्रतिबंधात्मक उपाययोजना ठरल्या प्रभावशाली, लोकप्रतिनिधींसह अनेकांचे सहकार्य

जळगाव : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाने जिल्ह्यातील ६०२ गावांमध्ये कमी अधिक प्रमाणात शिरकाव केला आहे़ मात्र, अद्यापही अनेक बड्या गावांनी कोरोनाला वेशिवरच रोखून धरले आहेत़ जिल्ह्यातील छोटी- मोठी ११११ गावे कोरोनापासून आतापर्यंत दूर आहेत़ मास्क बंधनकारक, सोशल डिस्टन्सिंगचे पालन, बाहेरून आलेल्यांना सक्तिचे क्वॉरंटाईन, प्रतिबंधात्मक औषधी व साहित्याचे वाटप, जनजागृती अशा विविध पातळ्यांवर योग्य पद्धतीने कामे करून या गावांनी कोरोनाला रोखून धरले आहे.

जिल्ह्यातील पंधराच्या पंधरा तालुक्यांमध्ये कोरोनाने धडक दिली़ यात जळगाव शहरापासून सुरूवात होऊन अमळनेर, भुसावळ, चोपडा, पाचोरा असे क्रमाने रुग्ण आढळून आले व अखेर मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यात कोरोनाने शिरकाव केला़ धानोरा़ ता़ चोपडा या १५ हजार लोकसंख्या असलेल्या गावानेही कोरोनला चार महिन्यांपर्यंत रोखून धरले होते़ मात्र, दोन दिवसांपूर्वीच या गावात रुग्ण आढळून आले़ आरोग्य विभागाकडून सर्वच गावांमध्ये सर्वच पातळ्यांवर उपाययोजना राबविल्या जात आहे़ ज्या गावांमध्ये कोरोना नाही, त्या गावांमध्ये बाहेरून आलेल्यांची संख्याही कमी असेल असेही एक समिकरण मांडले जात आहे़ मात्र, आलेल्यांवर विशेष लक्ष ठेवून बाहेर जाणाऱ्यांना हटकले, अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त बाहेर पडू नका, असे प्रबोधन हे अत्यंत महत्त्वाचे ठरल्याचे कोरोनापासून लांब असलेल्या या गावांच्या सरपंचानी ‘लोकमत’ला सांगितले़ कोरोनाचा शिरकाव असला तरी अनेक मोठ्या गावांमध्ये सक्रीय रुग्ण शून्य असूनही गावे कोरोनामुक्त झालेली आहे़ यासह काही गावांमध्ये १ किंवा २ रुग्णांवर बे्रक लागल्याने दिलासा मिळाला आहे़ अमळनेर तालुकयातील मुंगसे गावात जिल्ह्यातील दुसरा रुग्ण आढळून आला़ मात्र, या गावातही कोरोना नियंत्रणात राहिला़ भुसावळ तालुक्यातील वराडसीम या मोठ्या गावतही कोरोनाला अटकाव होता़ मात्र, काहीच दिवसांपूर्वी या ठिकाणी रुग्ण आढळून आला़ आधीची चार महिने हे गाव कोरोनापासून दूर होते़ कोरोच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून देण्यात येणाºया सूचनांचे काटेकोरपणे पालन व्हावे, असे आवाहन करण्यात येते, अनेक गावांमध्ये हे नियम अतिशय सक्तिने पाळले जातात, असेही चित्र आहे़ यात ग्रा.प.ंची भूमिका महत्त्वाची ठरते.आरोग्य केंद्राची भूमिका महत्त्वाचीगावांमध्ये बाहेरून आलेल्यांना शाळा, किंवा समाजमंदिरामध्ये क्वारंटाईन केले जात होते़ या सर्वांवर लक्ष ठेवणे, लक्षणे असलेल्यांना वेगळे ठेवणे, २८ दिवस त्यांचा पाठपुरावा करणे आदी बाबी आरोग्य केंद्रांमार्फत झाल्या़ नॉन कोविडसाठीही या केंद्राची महत्त्वाची भूमिका राहिली.आशा वर्कर्सने पिंजून काढला जिल्हाजिल्हाभरात सर्व्हेक्षणाची प्रमुख जबाबदारी ही आरोग्य कर्मचाºयाची तर आहेच मात्र, त्यांच्या हाताला हात देत आशा वर्कर्सने यात मोलाची भूमिका बजावली आहे़ ज्या गावात कोरोना नाहीत त्या गावातही मागर्दशक सूचनांनुसार सर्व्हेक्षण करण्यात आले़ ५० वर्षांवरील व्यक्तिंचा नियमित पाठपुरावा होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव