शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

‘ट्रीपल टी’च्या माध्यमातून मिळविणार कोरोनावर नियंत्रण - जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 12:49 IST

संशयित रुग्ण तपासणी पंधरवाड्यात मृत्यूदरही कमी करण्यासाठी उपाययोजना

जळगाव : जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या संशयित रुग्ण शोध पंधरवाड्यात त्वरित निदान, त्वरीत तपासणी त्वरित उपचार (ट्रेस, टेस्ट व ट्रीट अशा ट्रीपल ‘टी’) या तत्वांचा अवलंब करीत कोरोनावर नियंत्रण मिळविले जाईल, असा विश्वास जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.कोरोनाचा वाढता संसर्ग व मृत्यूचे प्रमाण घटविण्यासाठी जिल्ह्यात ८ जुलैपर्यंत संशयित रुग्ण शोध पंधरवाडा राबविण्यात येत आहे. यामध्ये करावयाच्या उपाययोजनांबाबत माहिती देण्यासाठी बुधवारी संध्याकाळी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, त्या वेळी जिल्हाधिकारी राऊत यांनी ही माहिती दिली.मृत्यूदर होईल कमीरुग्णाचे लवकर निदान झाले नाही तर त्याच्या मृत्यूची शक्यता बळावते. त्यामुळे या पंधरवाड्यामध्ये मृत्यूदर कमी करण्यावर भर राहणार असल्याने तत्काळ निदान होण्यासाठी तपासण्या वाढविण्यात येणार आहे. यात निदान लवकर झाल्यास त्वरीत तपासणी करण्यात येऊन त्यावर काय उपचार करणे आवश्यक आहे हे समोर येईल व त्यानुसार त्वरित उपचार मिळतील. त्यामुळे त्वरीत निदान, त्वरीत तपासणी, त्वरित उपचार (ट्रीपल टी) यावर भर दिला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.रुग्णालयात सुविधांवर भर व रुग्णांची काळजीकोरोना रोखणे व मृत्यूदर कमी करण्यासाठी कोरोना रुग्णालयांमध्ये सुविधा उपलब्ध करून देत रुग्णालयाची कार्यक्षमता वाढविण्यात येत असून यात वेगाने सुधारणा होत असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. या सोबतच तेथे डॉक्टरांची नियुक्ती, त्यांनी तेथे हजर राहून रुग्णांजवळ थांबणे गरजेचे असल्याचे सांगत तशा उपाययोजना यंत्रणेमार्फत राबविल्या जात असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.रुग्णांची माहिती घेणारया पंधरवाड्यामध्ये मनपाची रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे येणारे वेगवेगळ््या आजाराच्या रुग्णांची माहिती घेण्यासह प्रतिबंधित क्षेत्रातील हाय रिस्क, लो रिस्कमध्ये असणाऱ्यांसह संशयितांचे स्वॅब घेतले जातील. यात खाजगी डॉक्टरांचीही मदत घेणार असल्याचे जिल्हाधिकारी राऊत म्हणाले.लॅबची क्षमता ५०० अहवालांपर्यंत नेणारसध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या लॅबमधून १७० अहवाल दररोज येत आहेत. ही क्षमता शनिवारपर्यंत ५०० पर्यंत वाढविणार असून यासाठी वाढीव उपकरणांचा वापर केला जाऊन जास्तीत जास्त अहवाल व तेदेखील वेळेत येण्यासाठी नियोजन केले जात असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. यात २४ तासात अहवाल आला पाहिजे असे उद्दीष्ट असून काही कारणास्तव उशिर झाल्यास तो अहवाल ४८ तासात आलाच पाहिजे, यावर भर राहणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

टॅग्स :Jalgaonजळगाव