शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
3
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
4
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
5
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
6
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
7
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
8
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
9
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
10
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
11
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
13
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
14
प्रेमासाठी काय पण...! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
15
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
16
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
17
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
18
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
19
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
20
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!

‘ट्रीपल टी’च्या माध्यमातून मिळविणार कोरोनावर नियंत्रण - जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 12:49 IST

संशयित रुग्ण तपासणी पंधरवाड्यात मृत्यूदरही कमी करण्यासाठी उपाययोजना

जळगाव : जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या संशयित रुग्ण शोध पंधरवाड्यात त्वरित निदान, त्वरीत तपासणी त्वरित उपचार (ट्रेस, टेस्ट व ट्रीट अशा ट्रीपल ‘टी’) या तत्वांचा अवलंब करीत कोरोनावर नियंत्रण मिळविले जाईल, असा विश्वास जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.कोरोनाचा वाढता संसर्ग व मृत्यूचे प्रमाण घटविण्यासाठी जिल्ह्यात ८ जुलैपर्यंत संशयित रुग्ण शोध पंधरवाडा राबविण्यात येत आहे. यामध्ये करावयाच्या उपाययोजनांबाबत माहिती देण्यासाठी बुधवारी संध्याकाळी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, त्या वेळी जिल्हाधिकारी राऊत यांनी ही माहिती दिली.मृत्यूदर होईल कमीरुग्णाचे लवकर निदान झाले नाही तर त्याच्या मृत्यूची शक्यता बळावते. त्यामुळे या पंधरवाड्यामध्ये मृत्यूदर कमी करण्यावर भर राहणार असल्याने तत्काळ निदान होण्यासाठी तपासण्या वाढविण्यात येणार आहे. यात निदान लवकर झाल्यास त्वरीत तपासणी करण्यात येऊन त्यावर काय उपचार करणे आवश्यक आहे हे समोर येईल व त्यानुसार त्वरित उपचार मिळतील. त्यामुळे त्वरीत निदान, त्वरीत तपासणी, त्वरित उपचार (ट्रीपल टी) यावर भर दिला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.रुग्णालयात सुविधांवर भर व रुग्णांची काळजीकोरोना रोखणे व मृत्यूदर कमी करण्यासाठी कोरोना रुग्णालयांमध्ये सुविधा उपलब्ध करून देत रुग्णालयाची कार्यक्षमता वाढविण्यात येत असून यात वेगाने सुधारणा होत असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. या सोबतच तेथे डॉक्टरांची नियुक्ती, त्यांनी तेथे हजर राहून रुग्णांजवळ थांबणे गरजेचे असल्याचे सांगत तशा उपाययोजना यंत्रणेमार्फत राबविल्या जात असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.रुग्णांची माहिती घेणारया पंधरवाड्यामध्ये मनपाची रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे येणारे वेगवेगळ््या आजाराच्या रुग्णांची माहिती घेण्यासह प्रतिबंधित क्षेत्रातील हाय रिस्क, लो रिस्कमध्ये असणाऱ्यांसह संशयितांचे स्वॅब घेतले जातील. यात खाजगी डॉक्टरांचीही मदत घेणार असल्याचे जिल्हाधिकारी राऊत म्हणाले.लॅबची क्षमता ५०० अहवालांपर्यंत नेणारसध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या लॅबमधून १७० अहवाल दररोज येत आहेत. ही क्षमता शनिवारपर्यंत ५०० पर्यंत वाढविणार असून यासाठी वाढीव उपकरणांचा वापर केला जाऊन जास्तीत जास्त अहवाल व तेदेखील वेळेत येण्यासाठी नियोजन केले जात असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. यात २४ तासात अहवाल आला पाहिजे असे उद्दीष्ट असून काही कारणास्तव उशिर झाल्यास तो अहवाल ४८ तासात आलाच पाहिजे, यावर भर राहणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

टॅग्स :Jalgaonजळगाव