शहरं
Join us  
Trending Stories
1
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
2
Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ
3
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
4
कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेणार; खलिस्तान समर्थकांची भारताला खुली धमकी...
5
२० वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छा निवृत्ती, पण पूर्ण पेन्शनसाठी एवढ्या वर्षांची असणार अट
6
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
7
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
8
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
9
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
10
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
11
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
12
Astro Tips: शुभ मुहूर्त पाहून मूल जन्माला घालणे शक्य आहे का? त्रेतायुगात सापडते उत्तर!
13
सगळे सलमानची बाजू घेत होते, ब्रेकअपनंतर ऐश्वर्याची इंडस्ट्रीनं सोडली साथ, दिग्दर्शकाचा खुलासा
14
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
15
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
16
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
17
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
18
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
19
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
20
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?

संमेलनाचा निधी आत्महत्याग्रस्त शेतक:यांना

By admin | Updated: November 21, 2015 00:40 IST

अखिल भारतीय साहित्य संमेलनात गोळा होणारा 50-60 लाख रुपये निधी आत्महत्याग्रस्त शेतक:यांच्या कुटुंबीयांना दिला जाईल, अशी घोषणा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केली.

धुळे : कोणाच्या भ्रष्टतेबद्दल मला कधीच आदर वाटणार नाही. कागदावर धरणे बांधून शेतक:यांना पाणी मिळणार नाही. शेतक:यांचे दु:खाचे अश्रू पुसण्यासाठी अखिल भारतीय साहित्य संमेलनात गोळा होणारा 50-60 लाख रुपये निधी आत्महत्याग्रस्त शेतक:यांच्या कुटुंबीयांना दिला जाईल, अशी घोषणा पिंपरी-चिंचवड येथे होणा:या 89 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केली.

मराठी

 

श्रीपाल सबनीस यांची धुळे ही कर्मभूमी असल्यामुळे अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शहरातील शाहू नाटय़गृह येथे धुळेकरांच्या वतीने भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी ते बोलत होते.

ही चूक मी करणार नाही..

सबनीस म्हणाले की, महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा विच्छिन्न झालेली आहे. याकडे डोळेझाकपणा करण्याचा बेशरमपणा मी करणार नाही. महाराष्ट्राची विस्कटलेली घडी बसविणे हे माङो कर्तव्य राहिल

खान्देश सुख-दु:खाचा साक्षीदार

खान्देशाचे आशीर्वाद असल्यामुळेच मी एवढय़ा मोठय़ा पदार्पयत पोहचू शकलो. धुळेकर जनता ही माङया सुख-दु:खांची साक्षीदार आहे. सगळ्या संघर्षातून विद्याथ्र्यानी मला वाचविले. पहिली भाकरी विद्यावर्धिनी कॉलेजने दिली. 11 कोटी जनतेचा मानबिंदू म्हणून सर्वाचे प्रतिनिधित्व करणार आहे. असेही सबनीस म्हणाले.

गाणे म्हणून शिक्षण..

माङया आयुष्यात वैचारिक मतभेद नेहमी होत गेले. त्यामुळे वडिलांचे व माङोही जास्त पटले नाही. वडील हैद्राबाद मुक्ती संग्रामातील सेनानी होते. घरची 100-150 एकर जमीन होती, परंतु वडिलांमध्येही जमीनदारांचे काही गुण-अवगुण होते. त्यामुळे घर सोडले. रस्त्यावर गाणे गाऊन शिक्षण घेतले, परंतु विचारांशी तडतोड कधी केली नाही.

साहित्यिकांनी एकत्र यावे.

मोदी विदेश दौ:यात आपल्या हिंदुत्ववादाचा कुठे उल्लेखही करत नाहीत. ते गौतम बुद्ध, गांधींच्या विचारांचा प्रसार करत आहेत. विकासाच्या मुद्यावर शरद पवार, गडकरी यांची मैत्री होऊ शकते तर डाव्या व उजव्या विचारश्रेणीच्या साहित्यिकांनी का एकत्र येऊ नये. प्रत्येक जातीत ब्राrाण्यवाद आहे हे कुठेतरी थांबले पाहिजे.‘भारतीय प्रबोधन आणि आंबेडकर’ यात काही वाद नाही.

जळगाव कोर्टाचे वॉरंट..

एका पुस्तकात आंबेडकरी विचारांची बदनामी झाली म्हणून जळगावच्या एका रिक्षावाल्याने माङयाविरुद्ध कोर्टात याचिका दाखल केली. त्यामुळे सत्कार समारंभास येण्यास थोडा उशीर झाला. स्वत: आंबेडकरवाद्यांनी हे पुस्तक वाचले तर त्यांना कुठे अवमानना वाटली नाही.

खान्देशच्या मातीचे संस्कार.

खान्देशच्या मातीचे अन्न मी खाल्ले आहेत. या मातीचे संस्कार माङयावर आहेत. पंतप्रधान मोदींचा विरोधक किंवा समर्थक मी नाही. काँग्रेसचा नाकर्तेपणा व भ्रष्टाचार माजल्याने सत्तांतर झाले. प्रत्येकाने माणसाच्या प्रामाणिकपणावर भरोसा ठेवला पाहिजे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री हेमंत देशमुख होते. या वेळी जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ, आमदार डी.एस.अहिरे, पोलीस अधीक्षक साहेबराव पाटील, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, एम.जी. धिवरे, गोपाल केले, रमेश श्रीखंडे, माजी आमदार सदाशिव माळी, लखन भतवाल, जगदीश गायकवाड, विनोद मोरणकर, माजी आमदार शरद पाटील, माजी आमदार पी.डी.दलाल, जगदीश देवपूरकर, राजू भावसार, भूपेंद्र लहामगे तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

पा्रस्ताविक माजी आमदार शरद पाटील यांनी केले. सूत्रसंचालन जगदीश देवपूरकर यांनी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष हेमंत देशमुख म्हणाले की, सबनीस यांना साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळणे म्हणजे धुळ्याच्या दृष्टीने खूप अभिमानाची गोष्ट आहे. साहित्य हे मनोरंजानासाठी नाही तर सर्वसामान्यांचे अश्रू पुसणारे असले पाहिजे. धर्मग्रंथ हे उत्तम साहित्याचे नमुने आहेत. लोकशाहीच्या मजबुतीसाठी साहित्यिकांनी योगदान द्यावे.

यांनी मांडले विचार..

या वेळी बाळू सोनवणे, पोलीस अधीक्षक साहेबराव पाटील, दिलीप पाटील, एम.जी.धिवरे, माजी आमदार पी.डी.दलाल, डी.बी.जगत्पुरिया, अण्णासाहेब मिसाळ, डी.एस.अहिरे, दिलीप पाटील यांनी विचार मांडले.