शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

संमेलनाचा निधी आत्महत्याग्रस्त शेतक:यांना

By admin | Updated: November 21, 2015 00:40 IST

अखिल भारतीय साहित्य संमेलनात गोळा होणारा 50-60 लाख रुपये निधी आत्महत्याग्रस्त शेतक:यांच्या कुटुंबीयांना दिला जाईल, अशी घोषणा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केली.

धुळे : कोणाच्या भ्रष्टतेबद्दल मला कधीच आदर वाटणार नाही. कागदावर धरणे बांधून शेतक:यांना पाणी मिळणार नाही. शेतक:यांचे दु:खाचे अश्रू पुसण्यासाठी अखिल भारतीय साहित्य संमेलनात गोळा होणारा 50-60 लाख रुपये निधी आत्महत्याग्रस्त शेतक:यांच्या कुटुंबीयांना दिला जाईल, अशी घोषणा पिंपरी-चिंचवड येथे होणा:या 89 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केली.

मराठी

 

श्रीपाल सबनीस यांची धुळे ही कर्मभूमी असल्यामुळे अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शहरातील शाहू नाटय़गृह येथे धुळेकरांच्या वतीने भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी ते बोलत होते.

ही चूक मी करणार नाही..

सबनीस म्हणाले की, महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा विच्छिन्न झालेली आहे. याकडे डोळेझाकपणा करण्याचा बेशरमपणा मी करणार नाही. महाराष्ट्राची विस्कटलेली घडी बसविणे हे माङो कर्तव्य राहिल

खान्देश सुख-दु:खाचा साक्षीदार

खान्देशाचे आशीर्वाद असल्यामुळेच मी एवढय़ा मोठय़ा पदार्पयत पोहचू शकलो. धुळेकर जनता ही माङया सुख-दु:खांची साक्षीदार आहे. सगळ्या संघर्षातून विद्याथ्र्यानी मला वाचविले. पहिली भाकरी विद्यावर्धिनी कॉलेजने दिली. 11 कोटी जनतेचा मानबिंदू म्हणून सर्वाचे प्रतिनिधित्व करणार आहे. असेही सबनीस म्हणाले.

गाणे म्हणून शिक्षण..

माङया आयुष्यात वैचारिक मतभेद नेहमी होत गेले. त्यामुळे वडिलांचे व माङोही जास्त पटले नाही. वडील हैद्राबाद मुक्ती संग्रामातील सेनानी होते. घरची 100-150 एकर जमीन होती, परंतु वडिलांमध्येही जमीनदारांचे काही गुण-अवगुण होते. त्यामुळे घर सोडले. रस्त्यावर गाणे गाऊन शिक्षण घेतले, परंतु विचारांशी तडतोड कधी केली नाही.

साहित्यिकांनी एकत्र यावे.

मोदी विदेश दौ:यात आपल्या हिंदुत्ववादाचा कुठे उल्लेखही करत नाहीत. ते गौतम बुद्ध, गांधींच्या विचारांचा प्रसार करत आहेत. विकासाच्या मुद्यावर शरद पवार, गडकरी यांची मैत्री होऊ शकते तर डाव्या व उजव्या विचारश्रेणीच्या साहित्यिकांनी का एकत्र येऊ नये. प्रत्येक जातीत ब्राrाण्यवाद आहे हे कुठेतरी थांबले पाहिजे.‘भारतीय प्रबोधन आणि आंबेडकर’ यात काही वाद नाही.

जळगाव कोर्टाचे वॉरंट..

एका पुस्तकात आंबेडकरी विचारांची बदनामी झाली म्हणून जळगावच्या एका रिक्षावाल्याने माङयाविरुद्ध कोर्टात याचिका दाखल केली. त्यामुळे सत्कार समारंभास येण्यास थोडा उशीर झाला. स्वत: आंबेडकरवाद्यांनी हे पुस्तक वाचले तर त्यांना कुठे अवमानना वाटली नाही.

खान्देशच्या मातीचे संस्कार.

खान्देशच्या मातीचे अन्न मी खाल्ले आहेत. या मातीचे संस्कार माङयावर आहेत. पंतप्रधान मोदींचा विरोधक किंवा समर्थक मी नाही. काँग्रेसचा नाकर्तेपणा व भ्रष्टाचार माजल्याने सत्तांतर झाले. प्रत्येकाने माणसाच्या प्रामाणिकपणावर भरोसा ठेवला पाहिजे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री हेमंत देशमुख होते. या वेळी जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ, आमदार डी.एस.अहिरे, पोलीस अधीक्षक साहेबराव पाटील, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, एम.जी. धिवरे, गोपाल केले, रमेश श्रीखंडे, माजी आमदार सदाशिव माळी, लखन भतवाल, जगदीश गायकवाड, विनोद मोरणकर, माजी आमदार शरद पाटील, माजी आमदार पी.डी.दलाल, जगदीश देवपूरकर, राजू भावसार, भूपेंद्र लहामगे तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

पा्रस्ताविक माजी आमदार शरद पाटील यांनी केले. सूत्रसंचालन जगदीश देवपूरकर यांनी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष हेमंत देशमुख म्हणाले की, सबनीस यांना साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळणे म्हणजे धुळ्याच्या दृष्टीने खूप अभिमानाची गोष्ट आहे. साहित्य हे मनोरंजानासाठी नाही तर सर्वसामान्यांचे अश्रू पुसणारे असले पाहिजे. धर्मग्रंथ हे उत्तम साहित्याचे नमुने आहेत. लोकशाहीच्या मजबुतीसाठी साहित्यिकांनी योगदान द्यावे.

यांनी मांडले विचार..

या वेळी बाळू सोनवणे, पोलीस अधीक्षक साहेबराव पाटील, दिलीप पाटील, एम.जी.धिवरे, माजी आमदार पी.डी.दलाल, डी.बी.जगत्पुरिया, अण्णासाहेब मिसाळ, डी.एस.अहिरे, दिलीप पाटील यांनी विचार मांडले.