शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

स्वाक्षरी न दिल्याने कंत्राटदाराने अभियंत्यावर फेकली फाईल, मनपात गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 12:43 IST

काम झाल्यावरही स्वाक्षरी करण्यास टाळाटाळ

जळगाव : मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या २५ कोटी रुपयांच्या निधीतून गोपाळपुरा भागातील नाल्याच्या पुलाचे काम होवून महिना झाल्यावरही बिलावर स्वाक्षरी होत नसल्याने, गुरुवारी मनपात शासकीय कंत्राटदार राहुल धांडे व शहर अभियंता डी.एस.खडके यांच्यात वाद झाला. स्वाक्षरीसाठी तब्बल २ तास बसवून ठेवल्यामुळे धांडे यांनी संतापात शहर अभियंत्यांवर फाईल फेकून दिली. त्यानंतर मनपा अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यावर हा वाद शांत मिटविण्यात आला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेला २५ कोटी रुपयांचा निधी दिला होता. त्यातून शहरात तीन महिन्यांपासून कामे सुरु झाले आहेत. त्यातून गोपाळपुरा भागातील नाल्यालगत असलेल्या पुलाचे काम शासकीय कंत्राटदार राहुल धांडे यांनी घेतले होते. हे काम होवून एक महिना झााल्याची माहिती कंत्राटदार धांडे यांनी दिली. त्या कामाच्या साडे सात लाख रुपयाच्या बिलावर शहर अभियंत्यांची स्वाक्षरी आवश्यक असल्याने धांडे गुरुवारी शहर अभियंत्यांचा कार्यालयात दुपारी १ वाजेच्या सुमारास गेले. मात्र, शहर अभियंत्यांनी सायंकाळी स्वाक्षरी करु असे सांगितले. धांडे यांनी आपल्याकडे शुक्रवारी लग्न असल्याने स्वाक्षरी आताच करावी अशी विनंती केली. मात्र, स्वाक्षरी देण्यास खडके यांनी नकार दिला.पायºयांवर झाला शाब्दिक वादस्वाक्षरी न देताच शहर अभियंते डी.एस.खडके हे आपल्या कार्यालयातून बाहेर आले. धांडे यांनी त्यांचा पाठलाग करून नवव्या मजल्यावरील पायºयांवर येवून स्वाक्षरी करण्याची विनंती केली. त्यावर खडके यांनी फाईल आपल्या दालनात ठेवा अशा सूचना धांडे यांना दिल्या. त्यामुळे धांडे यांनी संताप व्यक्त करत आजच स्वाक्षरी करा असे सांगितले. मात्र, खडके यांनी नकार दिल्यामुळे धांडे यांनी आपल्या हातातील फाईली व कागदपत्रे खडके यांच्या दिशेने फेकली. त्यानंतर शहर अभियंते सुनील भोळे व मनपाच्या काही अधिकाºयांनी धांडे यांची समजूत घालत हा वाद शांत केला.कंत्राटदार धांडे हे याआधी दोन वेळा बिलांवर स्वाक्षरी घेण्यास आले होते व दोन्हीही वेळा त्यांच्या बिलांवर स्वाक्षरी केली आहे. गुरुवारी देखील त्यांनी बिले आणल्यानंतर त्यांना बिलांची फाईल टेबलवर ठेवण्यास सांगितली व सायंकाळी स्वाक्षरी करण्याचे त्यांना सांगितले. मात्र, त्यांनी काहीही ऐकून न घेता वाद घातला.-डी.एस.खडके, शहर अभियंता, मनपामहिनाभरापासून नाल्यावरील पुलाचे काम झाले आहे. शुक्रवारी बहिणीचे लग्न असल्याने पैशांची गरज असल्याने शहर अभियंत्यांकडून बिलांवर स्वाक्षरी करण्याची मागणी केली. मात्र, त्यांच्याकडून टाळाटाळ केली जात आहे. काही बिलांवर आयुक्तांच्या स्वाक्षरीची गरज होती. आयुक्तांनी एका मिनीटात बिलांवर स्वाक्षरी केली. मात्र, शहर अभियंता स्वाक्षरी देण्यास टाळाटाळ करत आहेत.-राहुल धांडे, कंत्राटदार

टॅग्स :Jalgaonजळगाव