शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

स्वाक्षरी न दिल्याने कंत्राटदाराने अभियंत्यावर फेकली फाईल, मनपात गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 12:43 IST

काम झाल्यावरही स्वाक्षरी करण्यास टाळाटाळ

जळगाव : मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या २५ कोटी रुपयांच्या निधीतून गोपाळपुरा भागातील नाल्याच्या पुलाचे काम होवून महिना झाल्यावरही बिलावर स्वाक्षरी होत नसल्याने, गुरुवारी मनपात शासकीय कंत्राटदार राहुल धांडे व शहर अभियंता डी.एस.खडके यांच्यात वाद झाला. स्वाक्षरीसाठी तब्बल २ तास बसवून ठेवल्यामुळे धांडे यांनी संतापात शहर अभियंत्यांवर फाईल फेकून दिली. त्यानंतर मनपा अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यावर हा वाद शांत मिटविण्यात आला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेला २५ कोटी रुपयांचा निधी दिला होता. त्यातून शहरात तीन महिन्यांपासून कामे सुरु झाले आहेत. त्यातून गोपाळपुरा भागातील नाल्यालगत असलेल्या पुलाचे काम शासकीय कंत्राटदार राहुल धांडे यांनी घेतले होते. हे काम होवून एक महिना झााल्याची माहिती कंत्राटदार धांडे यांनी दिली. त्या कामाच्या साडे सात लाख रुपयाच्या बिलावर शहर अभियंत्यांची स्वाक्षरी आवश्यक असल्याने धांडे गुरुवारी शहर अभियंत्यांचा कार्यालयात दुपारी १ वाजेच्या सुमारास गेले. मात्र, शहर अभियंत्यांनी सायंकाळी स्वाक्षरी करु असे सांगितले. धांडे यांनी आपल्याकडे शुक्रवारी लग्न असल्याने स्वाक्षरी आताच करावी अशी विनंती केली. मात्र, स्वाक्षरी देण्यास खडके यांनी नकार दिला.पायºयांवर झाला शाब्दिक वादस्वाक्षरी न देताच शहर अभियंते डी.एस.खडके हे आपल्या कार्यालयातून बाहेर आले. धांडे यांनी त्यांचा पाठलाग करून नवव्या मजल्यावरील पायºयांवर येवून स्वाक्षरी करण्याची विनंती केली. त्यावर खडके यांनी फाईल आपल्या दालनात ठेवा अशा सूचना धांडे यांना दिल्या. त्यामुळे धांडे यांनी संताप व्यक्त करत आजच स्वाक्षरी करा असे सांगितले. मात्र, खडके यांनी नकार दिल्यामुळे धांडे यांनी आपल्या हातातील फाईली व कागदपत्रे खडके यांच्या दिशेने फेकली. त्यानंतर शहर अभियंते सुनील भोळे व मनपाच्या काही अधिकाºयांनी धांडे यांची समजूत घालत हा वाद शांत केला.कंत्राटदार धांडे हे याआधी दोन वेळा बिलांवर स्वाक्षरी घेण्यास आले होते व दोन्हीही वेळा त्यांच्या बिलांवर स्वाक्षरी केली आहे. गुरुवारी देखील त्यांनी बिले आणल्यानंतर त्यांना बिलांची फाईल टेबलवर ठेवण्यास सांगितली व सायंकाळी स्वाक्षरी करण्याचे त्यांना सांगितले. मात्र, त्यांनी काहीही ऐकून न घेता वाद घातला.-डी.एस.खडके, शहर अभियंता, मनपामहिनाभरापासून नाल्यावरील पुलाचे काम झाले आहे. शुक्रवारी बहिणीचे लग्न असल्याने पैशांची गरज असल्याने शहर अभियंत्यांकडून बिलांवर स्वाक्षरी करण्याची मागणी केली. मात्र, त्यांच्याकडून टाळाटाळ केली जात आहे. काही बिलांवर आयुक्तांच्या स्वाक्षरीची गरज होती. आयुक्तांनी एका मिनीटात बिलांवर स्वाक्षरी केली. मात्र, शहर अभियंता स्वाक्षरी देण्यास टाळाटाळ करत आहेत.-राहुल धांडे, कंत्राटदार

टॅग्स :Jalgaonजळगाव