शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
6
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
8
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
9
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
10
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
11
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
12
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
13
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
15
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
16
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
17
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
18
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
19
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
20
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!

दुषित पाणी पुरवठ्यामुळे  उभा राहिला आरोग्याचा प्रश्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 10:50 PM

जोंधनखेड्याची समस्या : दुर्लक्ष होत असल्याने नाराजी 

मुक्ताईंनगर :     तालुक्यातील जोंधनखेडा येथे गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामस्थांना दूषित पाणीपुरवठा केला जात असून या संदर्भात वारंवार तक्रार करून देखील ग्रामपंचायत स्तरावर कोणतेही प्रयत्न केले जात नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.   तालुक्यातील जोंधनखेडा हे जवळपास चार ते पाच हजार लोकवस्ती असलेले कुऱ्हा  परिसरातील अतिशय महत्त्वपूर्ण व मुक्ताईनगर तालुक्यातील शेवटचे गाव आहे. गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी एक विहीर असून या विहिरी वरूनच पाणीपुरवठा योजना राबवली जात आहे. संपूर्ण गावात पाईपलाईन करण्यात आलेली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून जोंधनखेडा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या या एकमेव विहिरीचे पाणी अशुद्ध झाले असून घाण या पाण्यात साचलेली आहे , तसेच पाणी ग्रामस्थांना प्यावे लागत आहे. विशेष म्हणजे गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन देखील ठिकाणी फुटलेली असून पाणी गळती तर होतच आहे. परंतु त्यासोबतच पाण्यामध्ये पाईपलाईन द्वारेही घाण शिरत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना मुतखड्याचे आजार झाले आहेत. या संदर्भात ग्रामस्थांनी वारंवार ग्रामपंचायतीकडे तक्रार केल्यानंतर सुद्धा कोणत्याही प्रकारे उपाययोजना होत नाही, अशी ओरड आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याकडेही तक्रार केलेली आहे.  त्यांनी याप्रकरणी लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.