शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
4
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
5
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
6
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
7
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
8
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
9
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
10
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
11
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
12
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
13
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
14
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
15
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
16
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
17
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
18
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
19
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
20
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीचा परिणाम : डाळी, धान्याच्या ब्रॅण्डद्वारे ग्राहकांची फसगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 12:56 IST

कोणीही वापरू लागले ब्रॅण्डचे नाव

जळगाव : ब्रॅण्डेड डाळी व धान्यावर पाच टक्के जीएसटी लावण्यात आल्याने अनेकांनी तोच माल ब्रॅण्डविना विक्री करण्यास सुरुवात केल्याने संबंधित ब्रॅण्डचा वापर कोणीही करू लागले आहे. त्यामुळे ब्रॅण्डची विश्वासार्हता गमावली जात असल्याचे चित्र बाजारपेठेत आहे. यामुळे अनेक वर्षांच्या मेहतीने कमावलेला ब्रॅण्ड विक्रेत्यांना गमवावा तर लागलाच आहे सोबतच यामुळे ग्राहकांचीही फसगत होत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.ब्रॅण्डविना मालाची विक्रीवस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू करताना सरकारने धान्यावर हा कर लावला नाही. मात्र ब्रॅण्डेड डाळी व धान्यावर पाच टक्के जीएसटी लावण्यात आल्याने त्याचा भार थेट ग्राहकांवर येऊ लागला. डाळीचे व धान्याचे भाव या मुळे वाढत असल्याने व स्पर्धेत विक्री कमी होऊ लागल्याने विक्रेत्यांनी तोच माल विना ब्रॅण्ड विक्री करणे सुरू केले.ब्रॅण्डचा वापर कोणत्याही मालावरमालाची किंमत वाढत असल्याने अनेकांनी आपला ब्रॅण्ड वापरणे बंद करीत विना ब्रॅण्ड मालाची विक्री सुरू केल्याने सदरचा ब्रॅण्ड इतर विक्रेते आपल्या मालावर वापरू लागल्याचे अनुभव येत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मालाचा दर्जा संबंधित ब्रॅण्डच्या तुलनेत मिळत नसल्याने यातून ग्राहकांची फसगत होऊ लागली आहे.अनेक वर्षांची मेहनत धुळीसमालाचा दर्जा संभाळताना अनेक उत्पादकांनी आपला ब्रॅण्ड विकसित केला. यात ग्राहकांचा विश्वास संपादीत करीत हा ब्रॅण्ड विकसित करण्यासाठी संबंधितास अनेक वर्षे मेहनत करावी लागली. मात्र आता कोणीही हा ब्रॅण्ड आपल्या मालावर वापरु लागल्याने ब्रॅण्ड निर्मात्याची अनेक वर्षांची मेहनत धुळीस मिळाल्याच्या भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.दर्जेदार मालाची शाश्वती नाहीगेल्या अनेक वर्षांपासून मालाचा दर्जा ग्राहकांच्या पसंतीस पडला तरी आता त्या संबंधित नावाच्या ब्रॅण्डचा माल खरेदी केला तरी तो ग्राहकांच्या ‘पचणी’ पडत नसल्याने संबंधित ब्रॅण्डच्या दर्जाबाबत शाश्वती राहिलेली नाही, असेही अनुभव येत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.धान्यावर जीएसटी नसावाधान्य, डाळी जीवनावश्यक वस्तूत येत असल्याने त्यावर जीएसटी नसावा, अशी मागणी ग्राहक तर करीतच आहे, सोबतच विक्रेतेही ही मागणी करीत आहे. जीएसटीमुळे विना ब्रॅण्ड माल विकावा लागत असल्याने व ब्रॅण्डचा कोणीही वापर करू लागल्याने डाळी, धान्यास जीएसटीतून मुक्तता मिळावी, अशीही मागणी होत आहे. यामुळे मालाचे दर कमी होऊन ब्रॅण्डही जपले जाईल व ग्राहकांचीही फसगत थांबेल, असा सूर विक्रेत्यांमधून उमटत आहे.जीएसटीमुळे ब्रॅण्डचा वापर अनेकांनी बंद केल्याने त्या ब्रॅण्डचा वापर इतर विक्रेते करू लागल्याने ग्राहकांना त्या दर्जाचा माल मिळत नाही. सोबतच ब्रॅण्ड विकसित करणाºयाची अनेक वर्षांची मेहनत धुळीस मिळाली आहे.- ललित बरडिया, उपाध्यक्ष, ‘फॅम’.स्पर्धेत टिकण्यासाठी अनेकांनी ब्रॅण्डचा वापर बंद केला आहे. मात्र त्यातून तरीही त्या नावाचा ब्रॅण्ड बाजारात वापरला केला जात आहे. त्यासाठी डाळी, धान्यावर जीएसटी नसावा.- संजय रेदासणी, डाळ, धान्य विक्रेते.

टॅग्स :Jalgaonजळगाव