शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

संतांचे संगति, मनोमार्ग गति ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 12:11 IST

मनुष्य जन्मात परमेश्वराच्या प्राप्तीचा एकमेव सुलभ उपाय सत्संग हाच आहे, असे अनेक संतांनी वर्णन केले आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात- ...

मनुष्य जन्मात परमेश्वराच्या प्राप्तीचा एकमेव सुलभ उपाय सत्संग हाच आहे, असे अनेक संतांनी वर्णन केले आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात- संतांचे संगति मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे संत एकनाथ महाराज म्हणतात. हरि प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पारय । येणे साधती साधने तुटती भवाचि बंधने । संताविण प्राप्ती नाही ऐसे वेद देतो ग्वाही । एका जनदिनी संत । पूर्ण करीती मनोरक्ष संत रामदास यांच्या भाषेत सांगायचे झाले तर.सत्संगतिचा महिमा कळेना ।सत्संग कोठे श्रमल्या मिळेना ।।सत्संगतीने तुटली कुबुद्धी ।सत्संग झाल्या बहुसाल सिद्धी ।।मनुष्याच्या कल्याणाकरिता सर्वांत महत्त्वाची व पहिली गोष्ट म्हणजे त्याला ह्या गोष्टीची जाणीव पाहिजे किंवा त्याला ह्या गोष्टीचे ज्ञान व्हावयास पाहिजे की,कोण मी कुठला कोठूनी आलो ?कुठे जावयाचे मला ।मनुष्याने असा विचार केला पाहिजे की, मला काय करावयाचे होते व मी काय करीत आहे. मनुष्य जीवन सर्वात श्रेष्ठ का आहे. मनुष्य जीवनात आत्मज्ञान व आत्मसाक्षात्कार करणे हेच ह्या जीवनाचे परम ईप्सित आहे. आत्मसुख कशात आहे. ह्या आत्म्याचा असलेला जगाशी संबंध कशा प्रकारचा आहे. गुरू कोणाला म्हणतात आणि मनुष्याला गुरू करणे कसे अनिवार्य आहे. सर्व गोष्टींचे एकमेव उत्तर म्हणजे ‘सत्संग’ करणे हे होय. वरील सर्व प्रश्नांचे निराकरण सत्संग केल्याने आपोआप पूर्ण होत जातात. ह्यासाठी चारवेद, अठरा पुराणे, सहाशास्त्रे यांनी सुद्धा गर्जुन गर्जुन पुन: पुन्हा हे आणि हेच सांगितले आहे की, सत्संग करा कारण ईश्वर प्राप्ती करण्यासाठी सत्संग हीच पहिली पायरी आहे.‘सत्संग’ या शब्दाची सत् = सत्य हाच मुख्य आशय अथवा उद्देश आहे. बहुतेक वेळी बरीच माणसं सत्संग फक्त मनोरंजनासाठीच करतात; पण मनोरंजन करणे म्हणजे सत्संग नव्हे हा सत्संगाचा भावार्थ नाही. सत्संगाचा सत्संग करण्याचा महत्त्वाचा हेतू म्हणजे आत्म्याची उन्नती किंवा कल्याण व आत्म्याचे परमात्म्यात विलीनीकरण आहे. जी माणसे मनोरंजन करण्याच्या हेतूने सत्संग करतात व ज्यांची विचारधारणा फक्त गोडगाणे ऐकणे व मधुर वादन ऐकण्याची असते.पण सत्संगाच्या मुख्य हेतूबद्दल ज्यांना आवड नसते अश्या व्यक्तींना सत्संगाचा परिपूर्ण लाभ प्राप्त होत नाही.- दादा महाराज जोशी, जळगाव

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव