शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

संतांचे संगति, मनोमार्ग गति ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 12:11 IST

मनुष्य जन्मात परमेश्वराच्या प्राप्तीचा एकमेव सुलभ उपाय सत्संग हाच आहे, असे अनेक संतांनी वर्णन केले आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात- ...

मनुष्य जन्मात परमेश्वराच्या प्राप्तीचा एकमेव सुलभ उपाय सत्संग हाच आहे, असे अनेक संतांनी वर्णन केले आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात- संतांचे संगति मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे संत एकनाथ महाराज म्हणतात. हरि प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पारय । येणे साधती साधने तुटती भवाचि बंधने । संताविण प्राप्ती नाही ऐसे वेद देतो ग्वाही । एका जनदिनी संत । पूर्ण करीती मनोरक्ष संत रामदास यांच्या भाषेत सांगायचे झाले तर.सत्संगतिचा महिमा कळेना ।सत्संग कोठे श्रमल्या मिळेना ।।सत्संगतीने तुटली कुबुद्धी ।सत्संग झाल्या बहुसाल सिद्धी ।।मनुष्याच्या कल्याणाकरिता सर्वांत महत्त्वाची व पहिली गोष्ट म्हणजे त्याला ह्या गोष्टीची जाणीव पाहिजे किंवा त्याला ह्या गोष्टीचे ज्ञान व्हावयास पाहिजे की,कोण मी कुठला कोठूनी आलो ?कुठे जावयाचे मला ।मनुष्याने असा विचार केला पाहिजे की, मला काय करावयाचे होते व मी काय करीत आहे. मनुष्य जीवन सर्वात श्रेष्ठ का आहे. मनुष्य जीवनात आत्मज्ञान व आत्मसाक्षात्कार करणे हेच ह्या जीवनाचे परम ईप्सित आहे. आत्मसुख कशात आहे. ह्या आत्म्याचा असलेला जगाशी संबंध कशा प्रकारचा आहे. गुरू कोणाला म्हणतात आणि मनुष्याला गुरू करणे कसे अनिवार्य आहे. सर्व गोष्टींचे एकमेव उत्तर म्हणजे ‘सत्संग’ करणे हे होय. वरील सर्व प्रश्नांचे निराकरण सत्संग केल्याने आपोआप पूर्ण होत जातात. ह्यासाठी चारवेद, अठरा पुराणे, सहाशास्त्रे यांनी सुद्धा गर्जुन गर्जुन पुन: पुन्हा हे आणि हेच सांगितले आहे की, सत्संग करा कारण ईश्वर प्राप्ती करण्यासाठी सत्संग हीच पहिली पायरी आहे.‘सत्संग’ या शब्दाची सत् = सत्य हाच मुख्य आशय अथवा उद्देश आहे. बहुतेक वेळी बरीच माणसं सत्संग फक्त मनोरंजनासाठीच करतात; पण मनोरंजन करणे म्हणजे सत्संग नव्हे हा सत्संगाचा भावार्थ नाही. सत्संगाचा सत्संग करण्याचा महत्त्वाचा हेतू म्हणजे आत्म्याची उन्नती किंवा कल्याण व आत्म्याचे परमात्म्यात विलीनीकरण आहे. जी माणसे मनोरंजन करण्याच्या हेतूने सत्संग करतात व ज्यांची विचारधारणा फक्त गोडगाणे ऐकणे व मधुर वादन ऐकण्याची असते.पण सत्संगाच्या मुख्य हेतूबद्दल ज्यांना आवड नसते अश्या व्यक्तींना सत्संगाचा परिपूर्ण लाभ प्राप्त होत नाही.- दादा महाराज जोशी, जळगाव

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव